शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

ग्रामीण भागात गुडमॉर्निंग पथक कोमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गुडमॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, गावात आलेल्या पथकास स्थानिक ...

तालुक्यातील ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गुडमॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, गावात आलेल्या पथकास स्थानिक लोकांचा विरोध असल्याने व बऱ्याच ठिकाणी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागला. प्रशासनाच्यावतीने ही मोहीम गुंडाळण्यात आल्याचे चित्र ग्रामीण भागातील परिस्थितीवरून दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्याचबरोबर साथीच्या आजारांचा समूळ नाश व्हावा, याकरिता देशव्यापी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्याकरिता अनुदान दिले. ज्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्यात आले. परंतु, त्याचा वापर होणे आवश्यक असताना मात्र, बहुतांश ग्रामस्थांकडून त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.

अनेक गावांत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा हागणदारीचे साम्राज्य पसरले असल्याने गावात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्या सुरुवातीला ज्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या मनात गुडमॉर्निंग पथकाची धास्ती बसली असल्याकारणाने ग्रामस्थ शौचालयाचा वापर करीत होते. परंतु, आता अशाप्रकारची भीती ग्रामस्थांच्या मनात राहिली नसल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याहीप्रकारची दखल घेतली जात नसल्याने उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरी पूर्वीप्रमाणेच गुडमॉर्निंग पथकाकडून अशा ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बॉक्स

गावात प्रवेश करताच सुटते दुर्गंधी

पावसाळा सुरू झाला असून, आता ग्रामीण भागात सद्यस्थितीत बाहेरून गावात प्रवेश करताना किंवा गावातून बाहेर जात असताना दुर्गंधी सुटत असल्याने गावकऱ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागत असल्याचे चित्र आहे. काही लोकांमुळे गावात दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरीच मंडळी उघड्यावर शौच करीत आहेत.

बॉक्स

शौचालयांमध्ये भरतात भंगार

वैयक्‍तिक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. अनेकांनी हे अनुदान मिळवण्यासाठी नुसत्याच शौचालयांच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारण्याचे काम दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवण्याचे काम केले, असे असल्यानंतरदेखील अनेकजण शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असतात. तर बांधलेल्या शौचालयांचा वापर लाकडांचे सरपण तसेच भंगार ठेवण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे.