शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

गुडमॉर्निंग पथक झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:44 IST

स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले.

ठळक मुद्देसाकोली तालुका : स्वच्छ भारत अभियान कागदावरच

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले. या प्रयोगाने नागरिकांच्या मानसिकतेत बदल होऊन शौचालयाचा वापर वाढू लागला होता. मात्र आता अलीकडे या उपक्रमाकडे प्रशासनाने पाठ फिरविली आणि स्वच्छता अभियान केवळ कागदावर राबविले जात आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात गुडमॉर्निंग पथक आता बेपत्ता झाले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील गावे ३१ मार्च पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या. घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. त्यातीलच महत्वाचा घटक म्हणजे गुडमॉर्निंग पथक होय. या पथकात सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक अशा व्यक्तींचा समावेश होता. हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळात उघड्यावर शौचास जाणाºयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत होते. या प्रयोगामुळे काहींची गैरसोय झाली होती. मात्र हा प्रयोग काही दिवसाचाच ठरला. त्यानंतर पथकाने पाठ फिरविली आणि नागरिक पुन्हा उघड्यावर जाऊ लागले. नागरिकांच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही. काही गावात तर शौचालय केवळ कागदोपत्री असून काहींच्या बांधकामाचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे गुडमॉर्निंग पथक आता लुप्त झाल्याचे दिसत आहे.प्रशासनाचे तोकडे प्रयत्ननागरिकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाने जोरकस प्रयत्न करणे गरजेचे होते. वैयक्तिक लाभाच्या शौचालयाचे बांधकाम दर्जेदार करून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु प्रत्येक योजना राबविताना संबंधित मंडळी अर्थकारण विचारात घेत असल्याचे दिसून आले. शासकीय योजनेचे कुणालाही काही देणे घेणे दिसत नाही. त्यामुळे ही कल्याणकारी योजना फसली असून गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.सार्वजनिक शौचालयाचा अभावसाकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायतीच्या काळातील सार्वजनिक शौचालय आहे. तीन वर्षात नगरपरिषदेने एकही नवीन सार्वजनिक शौचालय बांधले नाही. परिणामी नागरिक उघड्यावर जात आहे.