शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

गुडमॉर्निंग पथक झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:44 IST

स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले.

ठळक मुद्देसाकोली तालुका : स्वच्छ भारत अभियान कागदावरच

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत साकोली तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाने निर्धार केला. त्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होऊ लागले. या प्रयोगाने नागरिकांच्या मानसिकतेत बदल होऊन शौचालयाचा वापर वाढू लागला होता. मात्र आता अलीकडे या उपक्रमाकडे प्रशासनाने पाठ फिरविली आणि स्वच्छता अभियान केवळ कागदावर राबविले जात आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात गुडमॉर्निंग पथक आता बेपत्ता झाले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील गावे ३१ मार्च पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या. घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. त्यातीलच महत्वाचा घटक म्हणजे गुडमॉर्निंग पथक होय. या पथकात सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक अशा व्यक्तींचा समावेश होता. हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळात उघड्यावर शौचास जाणाºयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत होते. या प्रयोगामुळे काहींची गैरसोय झाली होती. मात्र हा प्रयोग काही दिवसाचाच ठरला. त्यानंतर पथकाने पाठ फिरविली आणि नागरिक पुन्हा उघड्यावर जाऊ लागले. नागरिकांच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही. काही गावात तर शौचालय केवळ कागदोपत्री असून काहींच्या बांधकामाचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे गुडमॉर्निंग पथक आता लुप्त झाल्याचे दिसत आहे.प्रशासनाचे तोकडे प्रयत्ननागरिकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाने जोरकस प्रयत्न करणे गरजेचे होते. वैयक्तिक लाभाच्या शौचालयाचे बांधकाम दर्जेदार करून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु प्रत्येक योजना राबविताना संबंधित मंडळी अर्थकारण विचारात घेत असल्याचे दिसून आले. शासकीय योजनेचे कुणालाही काही देणे घेणे दिसत नाही. त्यामुळे ही कल्याणकारी योजना फसली असून गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.सार्वजनिक शौचालयाचा अभावसाकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायतीच्या काळातील सार्वजनिक शौचालय आहे. तीन वर्षात नगरपरिषदेने एकही नवीन सार्वजनिक शौचालय बांधले नाही. परिणामी नागरिक उघड्यावर जात आहे.