शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

हे ईश्वरा, आमच्याही आयुष्याला घडव रे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:32 IST

जन्माष्टमीच्या पर्वावर पालांदुरातील कुंभारपुरीत श्रीकृष्णाला घडविण्याचे काम मागील आठवडाभरापासून अहोरात्र सुरू आहे.

ठळक मुद्देकुंभार समाजाचे श्रीकृष्णाला साकडे : कुंभारपुरीत घरोघरी घडतात कान्होबा

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जन्माष्टमीच्या पर्वावर पालांदुरातील कुंभारपुरीत श्रीकृष्णाला घडविण्याचे काम मागील आठवडाभरापासून अहोरात्र सुरू आहे. शंभर ते पाचशे रूपयापर्यंत मोल घेत संस्कृतीशी प्रामाणिकता कुंभार समाज जोपासत आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य हातभार लावत देवाच्या मूर्त्या आकाराला आणण्यासाठी राबत आहे. रंगरंगोटीलाही जीएसटीने सोडले नाही, देवा तरीही मोल वाढवून मिळत नाही. तेच किमान देवा तुझी कृपादृष्टी ठेवत आमच्याही आयुष्याला घडव अशी आर्त विनवणी कुंभार समाज श्रीकृष्णाला करीत असावा....पालांदुरातील कुंभार ४०-४५ कुटुंबाने कित्येक वर्षापासून इथेच स्थायिक आहेत. शेतीवाडी नसल्याने हातावर आणून पानावर खाणेच सुरू असल्याचे आजही हा समाज आर्थिक खाईत खितपत जीवन जगत आहे. अठराविश्व दारिद्रयामुळे शैक्षणिक गंगा प्रवाहीत नाही. अज्ञानामुळे शैक्षणिक क्रांती नाही व शैक्षणिकांनी घरात नसल्याने वडिलोपार्जीत काम आजची पिढी उद्याच्या पिढीला देत आहे. शासनाचे साधे घरकुलसुद्धा मिळू शकत नाही. २०११ च्या आर्थिक सर्व्हेतून कुंभारपुरा सुटल्याने व त्याचाच आधार घरकुलाला असल्याने समाजावर संकट ओढवले आहे. कच्चा माल पक्का करण्याकरिता वेगळी जागा नसल्याने घरासमोर भट्टी लावीत धुरांच्या साक्षीने जीवन जगत आहे. अल्पावधीतच इंद्रिय निकामी होतात. हक्काची मातीची खान नाही, लाकडे, कोळशा मिळत नाही अद्यावत (यांत्रिक) कलाकुसरीकरिता साधने शासनाकडून मिळत नसल्याने हातच्याच भरोशाने कलाकुशरीची कामे सुरू आहेत. जग कितीही बदलले असले तरी पिण्याच्या पाण्याची थंड तहान भागविण्याची किमया याच कुंभारपुरीत घडते.हिंदू संस्कृतीत श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व आहे. दिड दिवसाकरिता श्रीकृष्ण अनेकांच्या घरी पाहुणा म्हणून येतो. सन्मानाने त्याची पुजाअर्चा करीत गोडधोडाचा नवैद्य पुरविला जातो. भजन किर्तन डहाके यातून श्रीकृष्ण लिलयांचा प्रेदणादाई वर्णन करीत आजच्या पिढीला श्रीकृष्णाची जीवनशैलीचे दर्शन घडविल्या जतो. श्रीकृष्णाचे बालपन त्यांच्या गौळवी, यशोदामाना कालीया मर्दन, गौमाता, दही दुधाचे महत्व, श्रीकृष्ण सुदामा मैत्री, गोपालकाला यातून एक आदर्श जीवनाची प्रचिती जगाला श्रीकृष्ण चरित्रातून मिळाली आहे.पालांदुरात नाग, गाय, पाळणा, करंबाचे झाड, राधा यांच्या सोबतचे श्रीकृष्णाची प्रतिभा साकारणे अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येक घरात ५० च्या सुमारास मुर्ती घडविल्या आहेत. कुणी नगदीने देतात तर कृणी देण वर नेतात म्हणजे वर्षात एकदा धन धान्य द्यायचे त्याबदल्यात वर्षभर लागणारी साहित्य न्यायचे असा हा कुंभार समाज आजही जुन्याच व्यवहारात जगत आहे. शेतकरी वर्गाशी गाठ असल्याने मोठ्या निधीची अपेक्षाच नाही. देवाचे मोल सुद्धा अधिक घ्यायचे नाही. या दातृत्वविचाराने कुंभार समाज पालांदुरात जगत आहे. शासनाकडून शासनदरबारी अशा कर्तृत्वान समाजाची दखल घेणे काळाची गरज आहे. त्याच्या कलेची कदर करीत त्या कलेला टिकवून विकसीत करण्याची जबाबदारीसुद्धा शासनाची आहे. पुर्वी राजेरजवाड्यात प्रत्येक कलेला किंमत होती. त्याचा मानसन्मान वेगळा होता. लोकशाही खरी मात्र मुठभर लोकच त्यात शहाणी होत पुढे गेली. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला नाही. त्यात कुंभार समाज आजही मागेच आहे, हेच म्हणावे लागेल.