शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

हे ईश्वरा, आमच्याही आयुष्याला घडव रे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:32 IST

जन्माष्टमीच्या पर्वावर पालांदुरातील कुंभारपुरीत श्रीकृष्णाला घडविण्याचे काम मागील आठवडाभरापासून अहोरात्र सुरू आहे.

ठळक मुद्देकुंभार समाजाचे श्रीकृष्णाला साकडे : कुंभारपुरीत घरोघरी घडतात कान्होबा

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जन्माष्टमीच्या पर्वावर पालांदुरातील कुंभारपुरीत श्रीकृष्णाला घडविण्याचे काम मागील आठवडाभरापासून अहोरात्र सुरू आहे. शंभर ते पाचशे रूपयापर्यंत मोल घेत संस्कृतीशी प्रामाणिकता कुंभार समाज जोपासत आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य हातभार लावत देवाच्या मूर्त्या आकाराला आणण्यासाठी राबत आहे. रंगरंगोटीलाही जीएसटीने सोडले नाही, देवा तरीही मोल वाढवून मिळत नाही. तेच किमान देवा तुझी कृपादृष्टी ठेवत आमच्याही आयुष्याला घडव अशी आर्त विनवणी कुंभार समाज श्रीकृष्णाला करीत असावा....पालांदुरातील कुंभार ४०-४५ कुटुंबाने कित्येक वर्षापासून इथेच स्थायिक आहेत. शेतीवाडी नसल्याने हातावर आणून पानावर खाणेच सुरू असल्याचे आजही हा समाज आर्थिक खाईत खितपत जीवन जगत आहे. अठराविश्व दारिद्रयामुळे शैक्षणिक गंगा प्रवाहीत नाही. अज्ञानामुळे शैक्षणिक क्रांती नाही व शैक्षणिकांनी घरात नसल्याने वडिलोपार्जीत काम आजची पिढी उद्याच्या पिढीला देत आहे. शासनाचे साधे घरकुलसुद्धा मिळू शकत नाही. २०११ च्या आर्थिक सर्व्हेतून कुंभारपुरा सुटल्याने व त्याचाच आधार घरकुलाला असल्याने समाजावर संकट ओढवले आहे. कच्चा माल पक्का करण्याकरिता वेगळी जागा नसल्याने घरासमोर भट्टी लावीत धुरांच्या साक्षीने जीवन जगत आहे. अल्पावधीतच इंद्रिय निकामी होतात. हक्काची मातीची खान नाही, लाकडे, कोळशा मिळत नाही अद्यावत (यांत्रिक) कलाकुसरीकरिता साधने शासनाकडून मिळत नसल्याने हातच्याच भरोशाने कलाकुशरीची कामे सुरू आहेत. जग कितीही बदलले असले तरी पिण्याच्या पाण्याची थंड तहान भागविण्याची किमया याच कुंभारपुरीत घडते.हिंदू संस्कृतीत श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व आहे. दिड दिवसाकरिता श्रीकृष्ण अनेकांच्या घरी पाहुणा म्हणून येतो. सन्मानाने त्याची पुजाअर्चा करीत गोडधोडाचा नवैद्य पुरविला जातो. भजन किर्तन डहाके यातून श्रीकृष्ण लिलयांचा प्रेदणादाई वर्णन करीत आजच्या पिढीला श्रीकृष्णाची जीवनशैलीचे दर्शन घडविल्या जतो. श्रीकृष्णाचे बालपन त्यांच्या गौळवी, यशोदामाना कालीया मर्दन, गौमाता, दही दुधाचे महत्व, श्रीकृष्ण सुदामा मैत्री, गोपालकाला यातून एक आदर्श जीवनाची प्रचिती जगाला श्रीकृष्ण चरित्रातून मिळाली आहे.पालांदुरात नाग, गाय, पाळणा, करंबाचे झाड, राधा यांच्या सोबतचे श्रीकृष्णाची प्रतिभा साकारणे अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येक घरात ५० च्या सुमारास मुर्ती घडविल्या आहेत. कुणी नगदीने देतात तर कृणी देण वर नेतात म्हणजे वर्षात एकदा धन धान्य द्यायचे त्याबदल्यात वर्षभर लागणारी साहित्य न्यायचे असा हा कुंभार समाज आजही जुन्याच व्यवहारात जगत आहे. शेतकरी वर्गाशी गाठ असल्याने मोठ्या निधीची अपेक्षाच नाही. देवाचे मोल सुद्धा अधिक घ्यायचे नाही. या दातृत्वविचाराने कुंभार समाज पालांदुरात जगत आहे. शासनाकडून शासनदरबारी अशा कर्तृत्वान समाजाची दखल घेणे काळाची गरज आहे. त्याच्या कलेची कदर करीत त्या कलेला टिकवून विकसीत करण्याची जबाबदारीसुद्धा शासनाची आहे. पुर्वी राजेरजवाड्यात प्रत्येक कलेला किंमत होती. त्याचा मानसन्मान वेगळा होता. लोकशाही खरी मात्र मुठभर लोकच त्यात शहाणी होत पुढे गेली. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला नाही. त्यात कुंभार समाज आजही मागेच आहे, हेच म्हणावे लागेल.