शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार द्या आणि बांधकाम कामगार व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.

ठळक मुद्देएजंटाचा वाढला सुळसुळाट : भंडारा पंचायत समितीचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाकडून योजनांचा लाभ मिळतोय म्हणून केवळ बांधकाम कामगारांची नोंदणी अवैधरित्या करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. याला भंडारा पंचायत समितीकडून त्याला खतपाणी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील अनेक कामगार पंचायत समितीमध्ये कामगार नोंदणी करण्यासाठी येत असून दोन हजार रूपये द्या आणि बांधकाम कामगार व्हा, असा छुपा फतवाच काढण्यात आला आहे.यामुळे कामगारांची गैरसोय होत आहे. भंडारा कामगार आयुक्तालयांतर्गत ३९०० बांधकाम कामगारांसाठी पावती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. परंतु भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.एजंटांकडून पैसे मोजलेल्यांचीच नोंदणी होत असल्याने खºया गरजू कामगारांना याचा लाभ मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. मात्र यासाठी अधिकाºयांना वारंवार भेटून देखील अधिकारी कर्मचारी या एजंटांना खतपाणी घालत आहेत.कामगारांकडून नोंदणीकृत करण्यासाठी ८५ रुपये घेण्याचा शासनाचा नियम असताना भंडारा पंचायत समितीत नोंदणी करण्यासाठी कर्मचारी कामगारांकडून २०० रुपयाप्रमाणे वसुली करीत आहेत. कामगार नोंदणीसाठी कर्मचाºयांकडून गावागावात दलाल तयार झाले असल्याने हे एजंट नोंदणी करण्याचे आमीष देऊन कामगारांकडून दोन हजार रुपयांची लुबाडणूक करीत आहेत. तसेच दररोज येणाºया ग्रामीण भागातील कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते. दिवसभरात फक्त ५० कामगारांची नोंदणी होत असल्याने हे एजंट बाहेर पैसे दिल्यावरच फावल्या वेळेत पावत्या फाडत आहेत. याविरोधात कामगारांनी एकत्र येत कामगार उपायुक्तालयाला घेराव घातला असता त्यानंतर लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक दिली.अन् अधिकारी,कर्मचाऱ्यांनी काढला पळयावेळी घडलेल्या या प्रकाराने पंचायत समितीतील अधिकारी कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखत पळ काढला. रात्रीपर्यंत कामगार पंचायत समितीत तळ ठोकून होते. मात्र त्यांच्याकडे एकही अधिकारी कर्मचारी फिरकला नाही. यावेळी कामगारांसोबत जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, बेला येथील सरपंच पूजा ठवकर, मंगेश हुमणे, बालू ठवकर, आभा चोले, युवा संग्राम शहर अध्यक्ष कमल साठवणे, दिगांबर गाढवे, महेंद्र रामटेके, अनिल कढव, जाखचे सरपंच विनोद जगनाडे, रवींद्र वंजारी, स्वप्नील आरीकर, संजय सार्वे, शिल्पा सोनारकर, संगीता बाभरे, वर्षा माकडे आदी मान्यवर कामगारांसोबत उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना