शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

दोन हजार द्या आणि बांधकाम कामगार व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.

ठळक मुद्देएजंटाचा वाढला सुळसुळाट : भंडारा पंचायत समितीचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाकडून योजनांचा लाभ मिळतोय म्हणून केवळ बांधकाम कामगारांची नोंदणी अवैधरित्या करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. याला भंडारा पंचायत समितीकडून त्याला खतपाणी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील अनेक कामगार पंचायत समितीमध्ये कामगार नोंदणी करण्यासाठी येत असून दोन हजार रूपये द्या आणि बांधकाम कामगार व्हा, असा छुपा फतवाच काढण्यात आला आहे.यामुळे कामगारांची गैरसोय होत आहे. भंडारा कामगार आयुक्तालयांतर्गत ३९०० बांधकाम कामगारांसाठी पावती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. परंतु भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.एजंटांकडून पैसे मोजलेल्यांचीच नोंदणी होत असल्याने खºया गरजू कामगारांना याचा लाभ मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. मात्र यासाठी अधिकाºयांना वारंवार भेटून देखील अधिकारी कर्मचारी या एजंटांना खतपाणी घालत आहेत.कामगारांकडून नोंदणीकृत करण्यासाठी ८५ रुपये घेण्याचा शासनाचा नियम असताना भंडारा पंचायत समितीत नोंदणी करण्यासाठी कर्मचारी कामगारांकडून २०० रुपयाप्रमाणे वसुली करीत आहेत. कामगार नोंदणीसाठी कर्मचाºयांकडून गावागावात दलाल तयार झाले असल्याने हे एजंट नोंदणी करण्याचे आमीष देऊन कामगारांकडून दोन हजार रुपयांची लुबाडणूक करीत आहेत. तसेच दररोज येणाºया ग्रामीण भागातील कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते. दिवसभरात फक्त ५० कामगारांची नोंदणी होत असल्याने हे एजंट बाहेर पैसे दिल्यावरच फावल्या वेळेत पावत्या फाडत आहेत. याविरोधात कामगारांनी एकत्र येत कामगार उपायुक्तालयाला घेराव घातला असता त्यानंतर लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक दिली.अन् अधिकारी,कर्मचाऱ्यांनी काढला पळयावेळी घडलेल्या या प्रकाराने पंचायत समितीतील अधिकारी कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखत पळ काढला. रात्रीपर्यंत कामगार पंचायत समितीत तळ ठोकून होते. मात्र त्यांच्याकडे एकही अधिकारी कर्मचारी फिरकला नाही. यावेळी कामगारांसोबत जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, बेला येथील सरपंच पूजा ठवकर, मंगेश हुमणे, बालू ठवकर, आभा चोले, युवा संग्राम शहर अध्यक्ष कमल साठवणे, दिगांबर गाढवे, महेंद्र रामटेके, अनिल कढव, जाखचे सरपंच विनोद जगनाडे, रवींद्र वंजारी, स्वप्नील आरीकर, संजय सार्वे, शिल्पा सोनारकर, संगीता बाभरे, वर्षा माकडे आदी मान्यवर कामगारांसोबत उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना