शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीला जिल्ह्याचा दर्जा द्या

By admin | Updated: August 1, 2016 00:24 IST

तालुका प्रतिनिधी: प्रस्तावित नवीन जिल्हे निर्मितीवेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा,...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणीसाकोली : तालुका प्रतिनिधी: प्रस्तावित नवीन जिल्हे निर्मितीवेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा, या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना साकोलीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले. देशात इंग्रजांची सत्ता असताना तत्कालीन इंग्रज सरकारने भंडारा जिल्ह्यात तीन उपविभाग बनविले होते. ज्यात, भंडारा जिल्ह्यासह उपविभाग, गोंदिया उपविभाग व साकोली उपविभाग हे होते. यापैकी त्यावेळेस भंडारा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ (मुंबई ते कलकत्ता) चे बाजूला २ कि. मी. अंतरावर होते. आता ते विकसित होवून राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. गोंदिया हे शहर मुंबई हावडा रेल्वे मार्गावर आहे. तसेच साकोली हे शहर असे आहे की, ज्याचा थेट राज्य महामार्गावर संपर्क आहे. या तीन उपविभाग मुख्यालयापैकी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा बनविण्यात आला. अर्थात गोंदिया उपविभागाचे महत्त्व कायम आहे.या जुन्या उपविभागापैकी साकोली हे सद्या उपविभाग आहे. या साकोली शहराला नवेगांव, नागझिरा हे व्याघ्र प्रकल्पाचे परिसर लागून आहे.राष्ट्रीय महामार्गाचे मधोमध असल्यामुळे या शहराची दळणवळण मोठया प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे नवनिर्मित गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही तालुके जोडल्या गेले त्यांना गोंदिया जिल्हा मुख्यालय हे अनेक कारणाने गैरसोईचे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आणि इंग्रजकालीन उपविभाग मुख्यालयाचे महत्त्व अधोरेखीत कायम रहावे यादृष्टीने साकोली जिल्हा बनविणे आवश्यक आहे. मध्यंतरी वर्तमानपत्रातील वृत्तावरून व विधी मंडळाच्या कामकाजाच्या वृत्तावरून असे कळले की, शासन राज्यात जे नवीन जिल्हे व तालुके बनविणार आहे. त्यात साकोली जिल्हा प्रस्तावित आहे. मात्र,आता असे कळले की, नवीन जिल्हा व तालुका निर्मिती संबंधाने राज्याचे मुख्य सचिवाचे अध्यक्षेतेखाली जी समिती नेमण्यात आली त्या समितीसमोर प्रस्तावित केलेल्या जिल्ह्यामध्ये साकोली जिल्ह्याचे प्रस्ताव नाही. प्रस्तावित नवनिर्मित जिल्ह्याचे वेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा, त्याचप्रमाणे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ज्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी आहे जसे सानगडी, पालांदूर, अड्याळ (भंडारा जिल्हा) व चिचगड, दवनीवाडा, रावणवाडी, नवेगावबांध(गोंदिया जिल्हा) हे नवीन तालुके बनविण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहे.शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, पी. एस. मेश्राम, काशीराम बावणे, नामदेव लांबकाने, शांताराम शेंडे, राजू बडोले, चरणदास सोनवाने, शब्बीर शेख, विश्वनाथ बडोले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)