शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

साकोलीला जिल्ह्याचा दर्जा द्या

By admin | Updated: August 1, 2016 00:24 IST

तालुका प्रतिनिधी: प्रस्तावित नवीन जिल्हे निर्मितीवेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा,...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणीसाकोली : तालुका प्रतिनिधी: प्रस्तावित नवीन जिल्हे निर्मितीवेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा, या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना साकोलीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले. देशात इंग्रजांची सत्ता असताना तत्कालीन इंग्रज सरकारने भंडारा जिल्ह्यात तीन उपविभाग बनविले होते. ज्यात, भंडारा जिल्ह्यासह उपविभाग, गोंदिया उपविभाग व साकोली उपविभाग हे होते. यापैकी त्यावेळेस भंडारा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ (मुंबई ते कलकत्ता) चे बाजूला २ कि. मी. अंतरावर होते. आता ते विकसित होवून राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. गोंदिया हे शहर मुंबई हावडा रेल्वे मार्गावर आहे. तसेच साकोली हे शहर असे आहे की, ज्याचा थेट राज्य महामार्गावर संपर्क आहे. या तीन उपविभाग मुख्यालयापैकी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा बनविण्यात आला. अर्थात गोंदिया उपविभागाचे महत्त्व कायम आहे.या जुन्या उपविभागापैकी साकोली हे सद्या उपविभाग आहे. या साकोली शहराला नवेगांव, नागझिरा हे व्याघ्र प्रकल्पाचे परिसर लागून आहे.राष्ट्रीय महामार्गाचे मधोमध असल्यामुळे या शहराची दळणवळण मोठया प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे नवनिर्मित गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही तालुके जोडल्या गेले त्यांना गोंदिया जिल्हा मुख्यालय हे अनेक कारणाने गैरसोईचे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आणि इंग्रजकालीन उपविभाग मुख्यालयाचे महत्त्व अधोरेखीत कायम रहावे यादृष्टीने साकोली जिल्हा बनविणे आवश्यक आहे. मध्यंतरी वर्तमानपत्रातील वृत्तावरून व विधी मंडळाच्या कामकाजाच्या वृत्तावरून असे कळले की, शासन राज्यात जे नवीन जिल्हे व तालुके बनविणार आहे. त्यात साकोली जिल्हा प्रस्तावित आहे. मात्र,आता असे कळले की, नवीन जिल्हा व तालुका निर्मिती संबंधाने राज्याचे मुख्य सचिवाचे अध्यक्षेतेखाली जी समिती नेमण्यात आली त्या समितीसमोर प्रस्तावित केलेल्या जिल्ह्यामध्ये साकोली जिल्ह्याचे प्रस्ताव नाही. प्रस्तावित नवनिर्मित जिल्ह्याचे वेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा, त्याचप्रमाणे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ज्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी आहे जसे सानगडी, पालांदूर, अड्याळ (भंडारा जिल्हा) व चिचगड, दवनीवाडा, रावणवाडी, नवेगावबांध(गोंदिया जिल्हा) हे नवीन तालुके बनविण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहे.शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, पी. एस. मेश्राम, काशीराम बावणे, नामदेव लांबकाने, शांताराम शेंडे, राजू बडोले, चरणदास सोनवाने, शब्बीर शेख, विश्वनाथ बडोले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)