शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रकल्पग्रस्तांना २५ लाखांचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:43 IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १९९८ मध्ये ग्रामस्थांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या. मात्र या प्रकल्पाला अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही तो अपुर्णावस्थेत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : पत्रपरिषदेत मांडल्या समस्या, बच्चू कडू यांनी केले आंदोलन

आॅनलाईन लोकमतभंडारा : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १९९८ मध्ये ग्रामस्थांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या. मात्र या प्रकल्पाला अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही तो अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तही आर्थिक मोबदल्यापासून वंचित असून प्रत्येकांना २५ लाख रोख आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी पत्रपरिषदेतून केली आहे.शासकीय विश्रामगृहात संजय एकापूरे, कवळू गाढवे, मंगेश वंजारी, यशवंत टिचकुले, मारोती हारगुळे आदींनी पत्रपरिषद घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. राष्ट्रीय प्रकल्पासाठी शासनाने त्यांच्या जमिनी अधिगृहीत केल्या. त्यानंतर काही ग्रामस्थांचे पुनर्वसन केले. मात्र पुनर्वसित ठिकाणी योग्य सोयीसुविधा अद्यापही देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. ८५ गावांचे या राष्ट्रीय प्रकल्पासाठी पुनर्वसन करण्यात आले. यात ८० हजारांवर प्रकल्पग्रस्तांना फटका बसला. मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करून २१ फेब्रुवारीला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात धरणावर निवासी आंदोलन केले. यामुळे प्रशासनाने दखल घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.याबाबत आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेतली. यात प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान धरणा सध्या आठ ते १० टीएमसी पाणी आहे. पुनर्वसीत गावात प्रशासनाने नागरी सुविधा द्याव्या व धरणात नागनदीचे दूषित पाणी सोडणे बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रपरिषदेला एजाज अली, सुहास वाघमारे, देवनाथ रामटेके, क्रिष्णा केवट, मंजुषा गजभिये, सरीता उके, विद्या मारबते, जिजाबाई मेश्राम, वाल्मीक नागपुरे, भाऊराव उके, रामप्रसाद ढेेंगे, मुकेश सुखदेवे, संजय लांजेवार, शरद मेश्राम, सुरेश पवनकर आदी उपस्थित होते.