शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

हेक्टरी रू ४० हजार भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:23 IST

आॅनलाईन लोकमतसुकडी (डाकराम) : सतत तीन दिवस आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. मात्र आतापर्यंत शासनाने नुकसान भरपाई दिली नाही. येत्या आठवडाभरात ही नुकसानभरपाई देण्यात यावी. या विरोधात छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस अनुसूचितीत जाती विभागाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला.जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, मोरगाव-अर्जुनी, आमगाव, देवरी, ...

ठळक मुद्देगारपीटग्रस्तांची मागणी : तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतसुकडी (डाकराम) : सतत तीन दिवस आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. मात्र आतापर्यंत शासनाने नुकसान भरपाई दिली नाही. येत्या आठवडाभरात ही नुकसानभरपाई देण्यात यावी. या विरोधात छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस अनुसूचितीत जाती विभागाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला.जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, मोरगाव-अर्जुनी, आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया या आठही तालुक्यांमध्ये सतत १२, १३ व १४ फेब्रुवारीला जोरदार वादळीवारा व गारपिटीसह पाऊस झाला. त्यामुळे हरभरा, गहू, भाजीपाला, लाखोळी, जवस, आंब्याचा मोहोर व वटाणा आदी पीक पूर्णत: नष्ट झाले. मात्र आतापर्यंत शासनाने गारपीटग्रस्त शेतकºयांना कुठलीच आर्थिक मदत दिली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.या वर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्यामुळे धानाचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात झाले. मावा तुळतुळा कीड व रोगांनी धानपीक पूर्ण नष्ट झाले. शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता उसणे व कर्ज घेवून हरभरा, गहू, भाजीपाला, लाखोळी, जवस, वटाणा आदींचे बियाणे खरेदी करून शेतात लागवड केली. ते पीक शेतकऱ्यांच्या शेतात डोलू लागले.दुष्काळी परिस्थितीमुळे या पिकांनी आपली उपजीविका चालेल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. पण निसर्गाच्या कोपामुळे १२, १३ व १४ फेब्रुवारीला संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वारा, वादळ व गारपिट झाली. त्यात संपूर्ण पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले. वादळी पावसामुळे शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला गेला. परिणामी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी व हवालदिल झाला आहे. शासनाने हरभरा, गहू, भाजीपाला, संत्रे, केळी, आंबा, लिंबू, मोसंबी, द्राक्षे या सर्व पिकांना कोणताही भेदभाव न करता हेक्टरी ४० हजार रूपयांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. शासनाने हेक्टरी जिरायत पिके सहा हजार ८०० रूपये, बागायती पिके १३ हजार ५०० रूपये, विमाधारक पिके (मोसंबी, संत्रा) २३ हजार ३०० रूपये, केळी ४० हजार रूपये, आंबा ३६ हजार ७०० रूपये, लिंबू २० हजार रूपये अशी तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करून शेतकºयांमध्ये भेदभाव केला आहे.जिरायती व बागायती पिकांमध्ये भेदभाव न करता सारखी मदत द्यावी. महागाईमुळे बियाणे खरेदी करून लागवड खर्च बागायती पिके व जिरायती पिके यांना समतोल खर्च लागतो. या दोन्ही प्रकारच्या पिकांची लागवड करणाºया शेतकऱ्यांमध्ये कोणताच भेदभाव न करता शासनाने गारपीटग्रस्त शेतकºयांना सरसकट हेक्टरी ४० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी.तसेच कौलारू घरे, सिमेंट सीट घरे, गवताची घरे यांचेझालेले नुकसान शासनाने २० हजार रूपये प्रति कुटुंब आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच एका आठवड्यात नुकसानभरपाई न दिल्यास हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आदी मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सेवा सहकारी संघटनेचे अध्यक्ष शिशुपाल पटले, विलास मेश्राम, मिस्रीलाल शेंडे, किशोर कोटांगले, सतेंद्र साखरे, राजेश मेश्राम, झनेश्वरी वासनिक, शुभलक्ष्मी शामकुवर, भाऊराव कोटांगले, लालाजी गजभिये, रंजित वासनिक, दुर्गाप्रसाद जांभूळकर, अजय चंद्रिकापुरे, महेंद्र टेंभेकर, मुनिराज शहारे, अनिल शेंडे, राजेंद्र शेंडे, संजय वाघमारे, छाया रंगारी, विलास शामकुवर, प्रमिला टेंभेकर, राजू गजभिये, ईश्वर कटरे, नितानंद वासनिक, हितेश पटले आदी उपस्थित होते.