शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

अंत्यसंस्कारासाठी मुलाचा मृतदेह द्या हो!

By admin | Updated: April 9, 2016 00:21 IST

मुलगा घरून बेपत्ता झाल्यापासून ‘त्या’ आईवडिलाची झोप उडाली होती. तब्बल १४ दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता.

निपेश खून प्रकरण : किन्ही मोखे येथील रामटेके कुटुंबीयांचा टाहोभंडारा : मुलगा घरून बेपत्ता झाल्यापासून ‘त्या’ आईवडिलाची झोप उडाली होती. तब्बल १४ दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता. मृतदेह कुजलेला आहे, हे कारण सांगून शवविच्छेदनासाठी नागपूरला नेलेला मृतदेह आठ दिवसांपासून त्यांना मिळालेला नाही. आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवाल करून अंत्यसंस्कारासाठी मुलाचा मृतदेह द्या हो! यासाठी रामटेके दाम्पत्यांची दीनवाणी याचना सुरू आहे. परंतु मृतदेह मिळवून देण्यासाठी कुणीही समोर आलेला नाही.साकोली तालुक्यातील किन्ही (मोखे) येथील रहिवाशी निपेश तुलाराम रामटेके हा २२ वर्षीय तरूण १९ मार्चपासून बेपत्ता झाला. त्याचे अपहरण करुन खून केल्याची तक्रार निपेशचे वडील तुलाराम रामटेके यांनी २० मार्च रोजी साकोली पोलीस ठाण्यात केली. तब्बल १४ दिवसानंतर निपेशचा मृतदेह चारगाव जंगल शिवारात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेह कुजलेला असल्यामुळे कपडे हातातील कडा व अंगठीवरुन निपेशची ओळख पटल्यानंतर शवविच्छेनासाठी साकोलीच्या डॉक्टरांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. मात्र मृतदेह कुजलेले असल्यामुळे त्यांनी शवविच्छेदनास नकार दिला. त्यामुळे नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. आधीच दु:खात असताना दुसऱ्या दिवशी तरी मृतदेह मिळेल आणि अंत्यसंस्कार करता येईल, अशी त्या आईवडिलाची ईच्छा होती. परंतु आठ दिवसांपासून मृतदेह न मिळाल्यामुळे रामटेके कुटूंबीय मुलाच्या आठवणीत दररोज दिवस कंठत आहेत. गुरूवारला माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासोबत पोलीस अधीक्षकांकडे आलेल्या तुलाराम रामटेके यांच्याशी भेट झाली असता डबडबत्या डोळ्यांनी मुलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे सांगत माझ्या मुलाचा जीव गेला आहे आता क्रियाकर्मासाठी मुलगा मिळवून द्या, असे धाय मोकलून रडताना उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. मृतदेह द्या - समरीतनिपेश बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसापर्यंत हे प्रकरण थंडबस्त्यात होते. साकोली काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली. यासंदर्भात समरीत म्हणाले, या निपेश खून प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच साकोली पोलिसांनी दिरंगाई केली असून पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. निपेश ज्यादिवशी बेपत्ता झाला त्यादिवसापासून आम्ही निपेशचा शोध घेण्याची मागणी केली असता तपास सुरूच असल्याचे पोलीस सांगत राहिले, आता खून कोणत्या कारणासाठी हे मात्र सांगत नाहीत. (जिल्हा प्रतिनिधी)खुनाचे कारण गुलदस्त्यात !१९ मार्च रोजी निपेश हा घरी टीव्ही पाहत होता. दरम्यान, शैलेश गणवीर या तरुणाने भ्रमणध्वनी करुन निपेशला घरी बोलावले. त्यानंतर तो घरी परतलाच नाही, अशी तक्रार निपेशचे वडील तुलाराम रामटेके यांनी साकोली पोलीस ठाण्यात केली. मुलाचे अपहरण करुन त्याचा खून केल्याचा संशयही त्यांनी तक्रारीत केला होता. दरम्या १ एप्रिल रोजी सकाळी चारगाव जंगल शिवारात मृतदेह आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शैलेश गणवीर, त्याची पत्नी अस्मिता गणवीर या दोघांना अटक केली तर राधेशाम गणवीर, जगदीश गणवीर, वामन गणवीर, दिलीप उंदीरवाडे या चौघांची चौकशी करीत आहेत. परंतु खून का? करण्यात आला याची माहिती मिळविण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अपयश आले आहे.हा तर अन्यायच -वाघायेरामटेके कुटुंबीयांवर दु:खाचा पहाड कोसळलेला असताना त्यांना मुलाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. आणखी किती दिवस मृतदेहाची प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न करून या प्रकरणात साकोलीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश धुसर यांनी तपासात दिरंगाई केली असा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला.