शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो!

By admin | Updated: January 5, 2017 00:39 IST

सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे.

विद्यार्थ्यांनी गाजविली स्पर्धा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची वक्तृत्व स्पर्धा भंडारा : सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारावी असी महाविद्यालयीन युवक युवतीनी इच्छा व्यक्त केली. अस्वच्छतेच्या अराजकतेचा विद्यार्थ्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेत परिस्थिती सुधारण्यासाठी शौचालय बांधकाम करून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी ‘उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो’ असा मुलमंत्र देत शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेण्यासाठी एल्गार पुकारला. स्वच्छता जनजागृतीसाठी शासनाने कोट्यवंधीचा खर्च केला आहे. मात्र स्वच्छता अभियानाला केवळ अहवालापुरता प्रतिसाद मिळतो. मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे असते. अशा परिस्थितीवर मात देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष शौचालय बांधकामावर काम करीत आहे. त्या अनुषंगाने ही शौचालय बांधकामाची मोहिम तेवत रहावी यासाठी सदर कक्षाच्यावतीने आज जिल्हा परिषद सभागृहात स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धा घेतली. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील वर्क्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक आले होते. या महाविद्यालयीन युवक-युवतींनी समाजातील जुन्या प्रथा परंपरा राबविणाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. शौचालय बांधकाम करुन आरोग्य सुदृढ ठेवावे व समाजातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश द्यावा यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाविद्यालयीन युवक-युवतींनी सभागृह गाजविला. विविध महाविद्यालयातून आलेल्या या युवांनी शौचालय बांधकाम व त्याचा वापर करा हा मुलमंत्र समाजापर्यंत पोहचविण्याची शपथ घेतली. यावेळी युवांनी उघड््यावर शौचास जात असल्याने हवा प्रदुषणासह विविध रोगांचा आजाराने नागरिकांना जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची यावेळी स्पर्धेतून सुर निघाले. नैसर्गिक साधन साम्रुगी असतानाही पृथ्वीचा समतोल बिघडत असून वसूधेचा नाश होत असल्याची चिंता यावेळी स्पर्धकांनी व्यक्त केली. लोकसंख्येसह कचरा प्रदुषणही वाढत आहे. माणुस शौचालयाचा शत्रु बनला असून ग्रामीण भागाचा विकास केल्यास देशाचा विकास करता येण्याची उर्मी व्यक्त केली. अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. अस्वच्छतेने सर्वत्र पोखरन झालेली असून आजाराचे मुळ कारण दुषित पाणी व अस्वच्छता आहे. आजारपणामुळे दरवर्षी मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने स्वत:चे कर्तव्य समजून स्वच्छता राबवावी अशी प्रतिज्ञाच महाविद्यालयीन युवक-युवतींनी घेतली. जंगली स्वापदांचा अनेकांचा बळी गेला असून यातील अनेकजण हे शौचालयाला गेले असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधकाम करावे असे वर्क्तृत्व स्पर्धेतून सुर उमटले. (शहर प्रतिनिधी) विजेत्यांची नावे जिल्ह्यातील सात तालुक्यातून कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटात २८ स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रत्येक गटातील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटात तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोघांची निवड करण्यात आली. कनिष्ठ गटातील प्रथम विजेता आकाश टेंभूर्णे, द्वितीय वेजेता त्रिवेणी समरीत तर तृतीय विजेते मिंजल शेख व विपूल रामटेके यांना संयुक्तीकरित्या घोषित करण्यात आले. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक नेहा हटवार या विद्यार्थीनीने पटकाविला तर द्वितीय क्रमांक मयुर बोरकर तर तृतीय क्रमांक निकिता डाखोरे व शैल शुक्ला यांना संयुक्तरित्या देण्यात आला.