शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो!

By admin | Updated: January 5, 2017 00:39 IST

सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे.

विद्यार्थ्यांनी गाजविली स्पर्धा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची वक्तृत्व स्पर्धा भंडारा : सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारावी असी महाविद्यालयीन युवक युवतीनी इच्छा व्यक्त केली. अस्वच्छतेच्या अराजकतेचा विद्यार्थ्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेत परिस्थिती सुधारण्यासाठी शौचालय बांधकाम करून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी ‘उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो’ असा मुलमंत्र देत शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेण्यासाठी एल्गार पुकारला. स्वच्छता जनजागृतीसाठी शासनाने कोट्यवंधीचा खर्च केला आहे. मात्र स्वच्छता अभियानाला केवळ अहवालापुरता प्रतिसाद मिळतो. मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे असते. अशा परिस्थितीवर मात देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष शौचालय बांधकामावर काम करीत आहे. त्या अनुषंगाने ही शौचालय बांधकामाची मोहिम तेवत रहावी यासाठी सदर कक्षाच्यावतीने आज जिल्हा परिषद सभागृहात स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धा घेतली. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील वर्क्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक आले होते. या महाविद्यालयीन युवक-युवतींनी समाजातील जुन्या प्रथा परंपरा राबविणाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. शौचालय बांधकाम करुन आरोग्य सुदृढ ठेवावे व समाजातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश द्यावा यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाविद्यालयीन युवक-युवतींनी सभागृह गाजविला. विविध महाविद्यालयातून आलेल्या या युवांनी शौचालय बांधकाम व त्याचा वापर करा हा मुलमंत्र समाजापर्यंत पोहचविण्याची शपथ घेतली. यावेळी युवांनी उघड््यावर शौचास जात असल्याने हवा प्रदुषणासह विविध रोगांचा आजाराने नागरिकांना जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची यावेळी स्पर्धेतून सुर निघाले. नैसर्गिक साधन साम्रुगी असतानाही पृथ्वीचा समतोल बिघडत असून वसूधेचा नाश होत असल्याची चिंता यावेळी स्पर्धकांनी व्यक्त केली. लोकसंख्येसह कचरा प्रदुषणही वाढत आहे. माणुस शौचालयाचा शत्रु बनला असून ग्रामीण भागाचा विकास केल्यास देशाचा विकास करता येण्याची उर्मी व्यक्त केली. अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. अस्वच्छतेने सर्वत्र पोखरन झालेली असून आजाराचे मुळ कारण दुषित पाणी व अस्वच्छता आहे. आजारपणामुळे दरवर्षी मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने स्वत:चे कर्तव्य समजून स्वच्छता राबवावी अशी प्रतिज्ञाच महाविद्यालयीन युवक-युवतींनी घेतली. जंगली स्वापदांचा अनेकांचा बळी गेला असून यातील अनेकजण हे शौचालयाला गेले असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधकाम करावे असे वर्क्तृत्व स्पर्धेतून सुर उमटले. (शहर प्रतिनिधी) विजेत्यांची नावे जिल्ह्यातील सात तालुक्यातून कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटात २८ स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रत्येक गटातील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटात तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोघांची निवड करण्यात आली. कनिष्ठ गटातील प्रथम विजेता आकाश टेंभूर्णे, द्वितीय वेजेता त्रिवेणी समरीत तर तृतीय विजेते मिंजल शेख व विपूल रामटेके यांना संयुक्तीकरित्या घोषित करण्यात आले. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक नेहा हटवार या विद्यार्थीनीने पटकाविला तर द्वितीय क्रमांक मयुर बोरकर तर तृतीय क्रमांक निकिता डाखोरे व शैल शुक्ला यांना संयुक्तरित्या देण्यात आला.