शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आहाराव्दारे मिळवा तणावापासून मुक्ती

By admin | Updated: November 9, 2014 22:28 IST

तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत.

भंडारा : तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत. योग, ध्यानधारणा, सकारात्मक विचार, व्यायाम, मसाज, अरोमाथेरपी, म्युझिक थेरपी असे तणावावरचे अनेक उपाय आपण शोधून काढले आहेत. आता आहाराच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही संशोधकांनी यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. विशिष्ट आहाराने तणावाचा सामना करता येईल, असे या संशोधकांचे मत आहे. माणसाला जेव्हा तणाव येतो, तेव्हा त्याला थकवा येतो. शरीर गळल्यासारखे वाटते. हा थकवा घालविण्यासाठी चहा, कॉफीचा पर्याय निवडला जातो. या पेयांमुळे तात्पुरती चेतना मिळते; पण तणावामुळे शरीराचे झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यापेक्षा काही अन्नपदार्थांमुळे उत्तेजक पेयांपेक्षा वेगळा आणि कायमचा सकारात्मक परिणाम होतो. तणावात असताना माणसाच्या शरीराचीही काही प्रमाणात झीज होते. त्यामुळे शरीरात साठवलेल्या काही पोषक तत्त्वांचाही ऱ्हास होतो. विशेषत: प्रथिने आणि अ, ब, क ही जीवनसत्वे नष्ट होतात. ज्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, ते तणावाचा परिणामकारकपणे सामना करू शकतात. परंतु ज्याच्या शरीरामध्ये मुळातच ही द्रव्ये कमी असतात ते लोक तणावाचा तेवढा परिणामकारकपणे सामना करू शकत नाहीत. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाले तर असे म्हणता येईल की, जे लोक अशक्त असतात, त्यांना तणाव जास्त सहन होत नाही आणि जे सशक्त असतात, त्यांच्याकडे तणाव सहन करण्याची ताकद असते. तणावाचा सामना करण्यासाठी केळी हे उत्तम पर्याय आहे. केळीमध्ये विशिष्ट प्रकारची प्रथिने असतात. ती प्रथिने शरीरातील काही प्रक्रियांमधून सेरोटोनिनमध्ये परिवर्तीत होतात आणि हे सेरोटोनिन आपल्याला तणावाच्या काळात दिलासा देते. आपली मन:स्थिती बदलण्यास मदत करते आणि आपल्याला आनंदी बनवते. केळी खाल्ल्याने वजन वाढते हे खरे आहे; परंतु ज्यांना अजून लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली नसेल त्यांनी अधूनमधून केळी खाल्ली तर त्यांच्या शरीरावर होणारे तणावाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय सहज उपलब्ध असणारे तणावावरचे दुसरे महत्त्वाचे औषध म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबतातील क जीवनसत्व आपल्याला तणावापासून दिलासा मिळवून देते. (शहर प्रतिनिधी)