शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आहाराव्दारे मिळवा तणावापासून मुक्ती

By admin | Updated: November 9, 2014 22:28 IST

तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत.

भंडारा : तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत. योग, ध्यानधारणा, सकारात्मक विचार, व्यायाम, मसाज, अरोमाथेरपी, म्युझिक थेरपी असे तणावावरचे अनेक उपाय आपण शोधून काढले आहेत. आता आहाराच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही संशोधकांनी यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. विशिष्ट आहाराने तणावाचा सामना करता येईल, असे या संशोधकांचे मत आहे. माणसाला जेव्हा तणाव येतो, तेव्हा त्याला थकवा येतो. शरीर गळल्यासारखे वाटते. हा थकवा घालविण्यासाठी चहा, कॉफीचा पर्याय निवडला जातो. या पेयांमुळे तात्पुरती चेतना मिळते; पण तणावामुळे शरीराचे झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यापेक्षा काही अन्नपदार्थांमुळे उत्तेजक पेयांपेक्षा वेगळा आणि कायमचा सकारात्मक परिणाम होतो. तणावात असताना माणसाच्या शरीराचीही काही प्रमाणात झीज होते. त्यामुळे शरीरात साठवलेल्या काही पोषक तत्त्वांचाही ऱ्हास होतो. विशेषत: प्रथिने आणि अ, ब, क ही जीवनसत्वे नष्ट होतात. ज्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, ते तणावाचा परिणामकारकपणे सामना करू शकतात. परंतु ज्याच्या शरीरामध्ये मुळातच ही द्रव्ये कमी असतात ते लोक तणावाचा तेवढा परिणामकारकपणे सामना करू शकत नाहीत. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाले तर असे म्हणता येईल की, जे लोक अशक्त असतात, त्यांना तणाव जास्त सहन होत नाही आणि जे सशक्त असतात, त्यांच्याकडे तणाव सहन करण्याची ताकद असते. तणावाचा सामना करण्यासाठी केळी हे उत्तम पर्याय आहे. केळीमध्ये विशिष्ट प्रकारची प्रथिने असतात. ती प्रथिने शरीरातील काही प्रक्रियांमधून सेरोटोनिनमध्ये परिवर्तीत होतात आणि हे सेरोटोनिन आपल्याला तणावाच्या काळात दिलासा देते. आपली मन:स्थिती बदलण्यास मदत करते आणि आपल्याला आनंदी बनवते. केळी खाल्ल्याने वजन वाढते हे खरे आहे; परंतु ज्यांना अजून लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली नसेल त्यांनी अधूनमधून केळी खाल्ली तर त्यांच्या शरीरावर होणारे तणावाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय सहज उपलब्ध असणारे तणावावरचे दुसरे महत्त्वाचे औषध म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबतातील क जीवनसत्व आपल्याला तणावापासून दिलासा मिळवून देते. (शहर प्रतिनिधी)