शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आहाराव्दारे मिळवा तणावापासून मुक्ती

By admin | Updated: November 9, 2014 22:28 IST

तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत.

भंडारा : तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत. योग, ध्यानधारणा, सकारात्मक विचार, व्यायाम, मसाज, अरोमाथेरपी, म्युझिक थेरपी असे तणावावरचे अनेक उपाय आपण शोधून काढले आहेत. आता आहाराच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही संशोधकांनी यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. विशिष्ट आहाराने तणावाचा सामना करता येईल, असे या संशोधकांचे मत आहे. माणसाला जेव्हा तणाव येतो, तेव्हा त्याला थकवा येतो. शरीर गळल्यासारखे वाटते. हा थकवा घालविण्यासाठी चहा, कॉफीचा पर्याय निवडला जातो. या पेयांमुळे तात्पुरती चेतना मिळते; पण तणावामुळे शरीराचे झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यापेक्षा काही अन्नपदार्थांमुळे उत्तेजक पेयांपेक्षा वेगळा आणि कायमचा सकारात्मक परिणाम होतो. तणावात असताना माणसाच्या शरीराचीही काही प्रमाणात झीज होते. त्यामुळे शरीरात साठवलेल्या काही पोषक तत्त्वांचाही ऱ्हास होतो. विशेषत: प्रथिने आणि अ, ब, क ही जीवनसत्वे नष्ट होतात. ज्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, ते तणावाचा परिणामकारकपणे सामना करू शकतात. परंतु ज्याच्या शरीरामध्ये मुळातच ही द्रव्ये कमी असतात ते लोक तणावाचा तेवढा परिणामकारकपणे सामना करू शकत नाहीत. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाले तर असे म्हणता येईल की, जे लोक अशक्त असतात, त्यांना तणाव जास्त सहन होत नाही आणि जे सशक्त असतात, त्यांच्याकडे तणाव सहन करण्याची ताकद असते. तणावाचा सामना करण्यासाठी केळी हे उत्तम पर्याय आहे. केळीमध्ये विशिष्ट प्रकारची प्रथिने असतात. ती प्रथिने शरीरातील काही प्रक्रियांमधून सेरोटोनिनमध्ये परिवर्तीत होतात आणि हे सेरोटोनिन आपल्याला तणावाच्या काळात दिलासा देते. आपली मन:स्थिती बदलण्यास मदत करते आणि आपल्याला आनंदी बनवते. केळी खाल्ल्याने वजन वाढते हे खरे आहे; परंतु ज्यांना अजून लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली नसेल त्यांनी अधूनमधून केळी खाल्ली तर त्यांच्या शरीरावर होणारे तणावाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय सहज उपलब्ध असणारे तणावावरचे दुसरे महत्त्वाचे औषध म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबतातील क जीवनसत्व आपल्याला तणावापासून दिलासा मिळवून देते. (शहर प्रतिनिधी)