शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणे सुरु

By admin | Updated: October 8, 2015 00:24 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये १५ सप्टेंबरपासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे.

जलस्तर २४१.२५० मीटरवर : बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाहीपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये १५ सप्टेंबरपासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. आज धरणातील पाण्याची पातळी २४१.२५० मीटरवर पोहचली आहे. यावर्षी धरणामध्ये २४२ मीटर पर्यंत म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या तरी कोणत्याही गावाला धोका नाही. पण जसे जसे पाणी वाढत जाईल. त्याप्रमाणे बुडीत क्षेत्रातील गावे बुडणार आहेत.मागच्या वर्षी धरणातील जलस्तर वाढविताना २४१.१५० मीटर वर भंडारा जिल्ह्यातील पाथरी गावात धरणाचे पाणी शिरून सावरगाव चारही बाजूने धरणाच्या पाण्याने वेढले होते. वडदमध्ये ही धरणाचे पाणी शिरून रस्ते बंद झाले होते. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, तुडका, गोव्हा, सिर्सी आदी गाात पाणी शिरले होते. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व खा.नाना पटोले यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन करून जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत गाव न सोडण्याचा इशारा शासनाला दिल्यामुळे २४१.१५० मीटर जलस्तरावर पाण्याची पातळी वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोसीखुर्द धरणावर येवून प्रकल्पग्रस्तांसमोर त्यांना पुनर्वसन पॅकेजची घोषणा केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनीही गाव रिकामे करण्याकरिता सहकार्य केल्यामुळे यावर्षी धरणातील जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. २४२ मीटरपर्यंत जलस्तर वाढला तर नागपूर जिल्ह्यातील सात गावांना व १२६४ कुटुंबांना धोका आहे. यातील ४ गावे स्थलांतरित झाली असून तीन गावे शिल्लक आहेत. तसेच ८२४ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४४० कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. २४२ मिटर पर्यंत भंडारा जिल्ह्यातील १७ गावे व २,५०४ कुटुंबांना धोका आहे. यातील ११ गावे स्थलांतरीत झाले असून सहा गावे स्थानांतरीत होण्याचे शिल्लक आहेत. तसेच २०४९ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४५५ कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. सध्यातरी बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाही. पण तरीही सर्व स्थितीवर बारीक लक्ष ठेवूनच धरणाचा जलस्तर वाढविला जात आहे. (शहर प्रतिनिधी)