शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणे सुरु

By admin | Updated: October 8, 2015 00:24 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये १५ सप्टेंबरपासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे.

जलस्तर २४१.२५० मीटरवर : बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाहीपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये १५ सप्टेंबरपासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. आज धरणातील पाण्याची पातळी २४१.२५० मीटरवर पोहचली आहे. यावर्षी धरणामध्ये २४२ मीटर पर्यंत म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या तरी कोणत्याही गावाला धोका नाही. पण जसे जसे पाणी वाढत जाईल. त्याप्रमाणे बुडीत क्षेत्रातील गावे बुडणार आहेत.मागच्या वर्षी धरणातील जलस्तर वाढविताना २४१.१५० मीटर वर भंडारा जिल्ह्यातील पाथरी गावात धरणाचे पाणी शिरून सावरगाव चारही बाजूने धरणाच्या पाण्याने वेढले होते. वडदमध्ये ही धरणाचे पाणी शिरून रस्ते बंद झाले होते. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, तुडका, गोव्हा, सिर्सी आदी गाात पाणी शिरले होते. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व खा.नाना पटोले यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन करून जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत गाव न सोडण्याचा इशारा शासनाला दिल्यामुळे २४१.१५० मीटर जलस्तरावर पाण्याची पातळी वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोसीखुर्द धरणावर येवून प्रकल्पग्रस्तांसमोर त्यांना पुनर्वसन पॅकेजची घोषणा केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनीही गाव रिकामे करण्याकरिता सहकार्य केल्यामुळे यावर्षी धरणातील जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. २४२ मीटरपर्यंत जलस्तर वाढला तर नागपूर जिल्ह्यातील सात गावांना व १२६४ कुटुंबांना धोका आहे. यातील ४ गावे स्थलांतरित झाली असून तीन गावे शिल्लक आहेत. तसेच ८२४ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४४० कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. २४२ मिटर पर्यंत भंडारा जिल्ह्यातील १७ गावे व २,५०४ कुटुंबांना धोका आहे. यातील ११ गावे स्थलांतरीत झाले असून सहा गावे स्थानांतरीत होण्याचे शिल्लक आहेत. तसेच २०४९ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४५५ कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. सध्यातरी बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाही. पण तरीही सर्व स्थितीवर बारीक लक्ष ठेवूनच धरणाचा जलस्तर वाढविला जात आहे. (शहर प्रतिनिधी)