शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणे सुरु

By admin | Updated: October 8, 2015 00:24 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये १५ सप्टेंबरपासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे.

जलस्तर २४१.२५० मीटरवर : बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाहीपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये १५ सप्टेंबरपासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. आज धरणातील पाण्याची पातळी २४१.२५० मीटरवर पोहचली आहे. यावर्षी धरणामध्ये २४२ मीटर पर्यंत म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या तरी कोणत्याही गावाला धोका नाही. पण जसे जसे पाणी वाढत जाईल. त्याप्रमाणे बुडीत क्षेत्रातील गावे बुडणार आहेत.मागच्या वर्षी धरणातील जलस्तर वाढविताना २४१.१५० मीटर वर भंडारा जिल्ह्यातील पाथरी गावात धरणाचे पाणी शिरून सावरगाव चारही बाजूने धरणाच्या पाण्याने वेढले होते. वडदमध्ये ही धरणाचे पाणी शिरून रस्ते बंद झाले होते. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, तुडका, गोव्हा, सिर्सी आदी गाात पाणी शिरले होते. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व खा.नाना पटोले यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन करून जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत गाव न सोडण्याचा इशारा शासनाला दिल्यामुळे २४१.१५० मीटर जलस्तरावर पाण्याची पातळी वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोसीखुर्द धरणावर येवून प्रकल्पग्रस्तांसमोर त्यांना पुनर्वसन पॅकेजची घोषणा केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनीही गाव रिकामे करण्याकरिता सहकार्य केल्यामुळे यावर्षी धरणातील जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. २४२ मीटरपर्यंत जलस्तर वाढला तर नागपूर जिल्ह्यातील सात गावांना व १२६४ कुटुंबांना धोका आहे. यातील ४ गावे स्थलांतरित झाली असून तीन गावे शिल्लक आहेत. तसेच ८२४ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४४० कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. २४२ मिटर पर्यंत भंडारा जिल्ह्यातील १७ गावे व २,५०४ कुटुंबांना धोका आहे. यातील ११ गावे स्थलांतरीत झाले असून सहा गावे स्थानांतरीत होण्याचे शिल्लक आहेत. तसेच २०४९ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४५५ कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. सध्यातरी बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाही. पण तरीही सर्व स्थितीवर बारीक लक्ष ठेवूनच धरणाचा जलस्तर वाढविला जात आहे. (शहर प्रतिनिधी)