शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गॅस सिलिंडर वाढविले २२५ रुपये अन्‌ कमी केले १० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संकटकाळात महागाईचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. खाद्यतेलापासून ते किराणा साहित्य ...

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना संकटकाळात महागाईचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. खाद्यतेलापासून ते किराणा साहित्य तर आता गॅसच्या वाढत्या किमतींनीही सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वर्षभरात दोनशे पंचवीस रुपयांनी सिलिंडर महागला असून, आता फक्त दहा रुपयांनी कपात करून गोरगरिबांचे कोणते इप्सित साध्य करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

जिल्ह्यात हजारो घरगुती गॅसधारक आहेत. महिन्याकाठी सिलिंडरची उचल केली जाते. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मार्च महिन्यात ८८० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर मिळाला. अवघे ४० ते ४५ रुपयांची सबसिडी त्यावर मिळत आहे. यावर गांभीर्याने उपाययोजना करावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.

सबसिडी मिळते नावापुरतीच

एक ते दीड वर्षात वीज, गॅस सबसिडीवर दोनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत सबसिडी मिळायची. मात्र, आता ८७१ रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरवर फक्त ३५ ते ४५ रुपयांपर्यंत सबसिडी मिळत आहे. ही सबसिडी म्हणजे नावापुरतीच असल्याचे गॅस ग्राहकांचे म्हणणे आहे. ही सबसिडीही कशाला देता, असा उपरोधिक सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत. कोरोना संकटकाळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होण्याऐवजी ते सातत्याने वाढत असल्याने गरिबांची फार पंचाईत झाली आहे. पाच महिन्यातील गॅस सिलिंडरच्या किमतीवर नजर घातल्यास नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ६६३ रुपयांत मिळत होता. त्यानंतर याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली आहे. जवळपास दोनशे पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे.

कोरोना संकटकाळात गॅस सिलिंडरच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात आता १० रुपये कमी करून काय उपयोग. भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरू आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आर्थिक बजेट बिघडले आहे.

- सुषमा निमजे, गृहिणी, भंडारा

घरगुती गॅस सिलिंडरमागे २२५ रुपयांची वाढ ही गरिबांसाठी मारक ठरणारी आहे. हातावर कमाविणे व पानावर खाणाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे. यावर उपाययोजना करून गॅस दरवाढीबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सबसिडीही नावालाच मिळत आहे.

- ममता बारापात्रे, गृहिणी, भंडारा

पाहता पाहता गॅसचे दर चांगलेच वधारले आहेत. आधी महिन्याकाठी ४६० रुपयांना मिळणारा सिलिंडर ६६० व आता ८७१ रुपये या दराने मिळत आहे. दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गोरगरिबांना उज्ज्वला योजनेचा लाभ तर मिळालेला आहे, पण एवढे दर द्यायचे कुठून, असा प्रश्न आहे.

- सुनंदा धाबेकर, गृहिणी