शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

१५० वर्षांची परंपरा असलेली आष्टीची गरदेव यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

तुमसर : दर तीन वर्षांनी भरणाऱ्या १५० वर्षाची परंपरा असलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी येथील गरदेव यात्रेवर यंदा कोरोना संसर्गाचे ...

तुमसर : दर तीन वर्षांनी भरणाऱ्या १५० वर्षाची परंपरा असलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी येथील गरदेव यात्रेवर यंदा कोरोना संसर्गाचे सावट दिसत आहे. धूलिवंदनाच्या दिवशी भरणारी ही यात्रा पूर्वी दीड महिना भरली जायची. मात्र आता एक ते दोन दिवसाची यात्रा भरते. विदर्भासह मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने येथे भाविक येथे येतात. शुक्रवारी जंगलातून गरदेव आणले तेव्हा भाविकांची उपस्थिती होती.

बावनथडी नदीकाठावरील शेतातून दोन झाडांची गरदेवसाठी निवड केली जाते. ही दोन्ही झाडे वेगवेगळ्या रंगांची असणे आवश्यक असते. या झाडापासून गरदेव तयार करतात. दोन्ही झाडे २५ ते ३० फूट लांब असतात. नदीच्या प्रवाहातून वाहतूक करून बैलबंडीने गरदेव आणले जाते. त्यानंतर धार्मिक प्रथा परंपरेनुसार त्या दोन्ही गरदेवांचे पूजन करण्यात येते. त्यावेळी ‘हर हर महादेव’चा जयजयकार करण्यात येतो. गरदेवचे पूजन, अभिषेक व रंगरोटी करण्यात येते. होळीच्या दोन दिवसांपूर्वी जुन्या गरदेव स्तंभाऐवजी नवीन झाडावर गरदेवाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. यावेळी महिला, पुरुष, तरुण, लहान बालके गरदेवांचे मनोभावे स्वागत करतात.

झाडांच्या सर्वात वर असलेल्या ठिकाणी पुजारी वांग्याचे चार तुकडे करून चारही दिशेला भिरकावतात ज्याला वांगे मिळेल त्याला नशीबवान समजले जाते. गरदेव यात्रेला वांगा हरी तथा मेघनाथ यात्रा म्हटले जाते. साठ वर्षांपूर्वी येथे दीड महिना यात्रा भरत होती. यात्रेत जीवनोपयोगी वस्तूसह मनोरंजनाच्या साधनांचा समावेश होता. आता एक ते दोन दिवसांची यात्रा भरते. यंदा तर कोरोनाचे सावट असल्याने या यात्रेच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

गरदेव यात्रेचा इतिहास

१५० वर्षांपूर्वी बावनथडी नदीला पूर आला होता. त्यावेळी दोन लाकडे नदीच्या प्रवाहात वाहत आली. आष्टी येथील ग्रामस्थांनी लाकडांना जाळून घरी त्याच्यावर भोजन तयार केले. तेव्हा भोजन तयार करणारी भांडी तुटून पडली. दुसऱ्या वर्षी आष्टी येथे दुष्काळ पडला. येथील पुजाऱ्याला स्वप्न पडले. मेघनाथ राजाने सांगितले की, नदी प्रवाहात वाहून येणारे लाकडे साक्षात शिवपार्वती होते. तुम्ही आता जंगलात जाऊन दोन लाकडे घेऊन या त्यांचे रंग वेगळे असायला पाहिजे. ज्यांची सावली एकमेकावर पडते अशाच वृक्षांची निवड करावी. ग्रामस्थांनी तेव्हापासून दोन लाकडांना शिवपार्वती समजून घेऊन येतात. तेव्हापासून येथे यात्रेला सुरुवात झाली.