शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल लाभार्थ्यांना वारपिंडकेपारची रेती

By admin | Updated: February 2, 2015 23:00 IST

सिहोरा परिसरातील नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना वारपिंडकेपार गावातील घाटावरून रेतीची आयात करावी लागत आहे. यामुळे घरकुलांची बांधकाम

चुल्हाड/सिहोरा : सिहोरा परिसरातील नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना वारपिंडकेपार गावातील घाटावरून रेतीची आयात करावी लागत आहे. यामुळे घरकुलांची बांधकाम अडचणीत आले आहेत. यामुळे शासन विरोधात गावकरी असा वाद पेटणार आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोरे आहेत. या नद्यांच्या काठावर अनेक गावांचे वास्तव्य आहेत. नद्यांच्या पात्रात दर्जेदार रेती असल्याने देशाची राजधानी दिल्लीत मागणी आहे. कॉमनवेल्सच्या बांधकामात हीच रेती उपयोगात आणण्यात आली आहे. परंतु या परिसरात वारपिंडकेपार गावातील रेतीघाट लिलावात काढण्यात आले आहे. अन्य गावात रेतीघाट लिलावात काढण्यात आले नाही. यात देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा, देवसर्रा, महालगाव, सोंड्या गावाचा समावेश आहे. दरम्यान याच गावात रेतीचा भंडार आहे. गाव शेजारी असणाऱ्या पात्रातून रेतीचा उपसा केल्यास रेती स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. परंतु या अनधिकृत रेती उपसा करताना बंदी लावण्यात आली आहे. या शिवाय ट्रॅक्टर वाहतुक करताना आढळून आल्यास दंड अथवा फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. यामुळे ट्रॅक्टर मालक धस्तावली आहेत. दरम्यान या नद्यांच्या काठावरील गावात गरीबांना घरकुल मंजुर करण्यात आली आहे. दलित बांधवांना रमाई आवास योजनेच्या घरकुले देण्यात आली आहे. वाढत्या माहागाईत घरकुल बांधकामाचा अनुदान अल्प आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि अन्त्योदय यादी उदरनिर्वाह करणारे कुटूंब या योजनेत पात्र करण्यात आले आहेत. घरकूल बांधकामाचा अनुदान सव्वा लक्ष रूपयाच्या घरात आहे. या दरवाढीत अनुदान राशीत एकाच खोलीचे बांधकाम करणे शक्य आहे. सध्यास्थित विटा, सिमेंट, लोखंड तथा कारागिराचे दर वाढले आहे. घरकुल बांधकाम निधीची जुळवा जुळव करीत असताना पुन्हा रेती महागली आहे. यामुळे गरीब घरकुल लाभार्थी चांगलेच चक्रावली आहेत.गावात नदीचे पात्र असताना वारपिंडकेपार गावातून रेतीची आयात करण्याची पाळी या घरकुल लाभार्थ्यावर आली आहे. गावातील पात्रातून अनधिकृत रेतीचा उपसा करताना कारवाईचा बडगा आहे. यामुळे गावकरी गांगरली आहेत. यामुळे गरिबांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. घरात अन्न धान्य असताना उपाशी झोपण्याची वेळ या घरकुल लाभार्थ्यावर आली आहे. गावातील पात्रातून रेतीचा उपसा करण्याची सुट देण्याची ओरड घरकुल लाभार्थी करीत आहेत. या गावापासून रेतीघाट लांब पल्ल्याच्या ठिकाणी आहेत. या घाटावरून रेतीची आयात करताना गरीब घरकूल लाभार्थ्यांना परवडणारी नाही. अंदाजे दोन हजार रूपये ट्रॅक्टर प्रती ट्रिप मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांचे लचके तोडले जाणार आहेत. दरम्यान अनधिकृत रेतीचा उपसा तथा चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी दिवसभराचे कामकाज सोडून रेती घाटावर फेरफटका मारत आहेत. रात्री जनतेला सुरक्षितता देण्यासाठी पोलिसांची असणारी गस्त, नागरिकांना वाऱ्यावर सोडून रेतीघाट पिंजून काढत आहेत. यामुळे गावा गावात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. गावात पोलिसांचा धाक नाही. रात्री होणारी रेतीची चोरी थांबविण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. यामुळे जनतेपेक्षा रेती महत्वाची असल्याचे परिसरात दिसूनयेत आहे. लाभार्थ्यांना अल्पदरात रेती उपलब्ध करण्यासाठी गरज आहे. (वार्ताहर)