शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बुरखाधाऱ्यांनी पळवला रेतीचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:57 IST

नियम धाब्यावर बसवून होणारी रेती चोरी आणि वाहतूक हा विषय नवीन नाही. परंतु अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन चढवून फिल्मी स्टाईलने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ठळक मुद्देवरठी हद्दीतील घटना : तपासणी पथकावर वाहन नेण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतवरठी : नियम धाब्यावर बसवून होणारी रेती चोरी आणि वाहतूक हा विषय नवीन नाही. परंतु अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन चढवून फिल्मी स्टाईलने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोहाडीचे तहसीलदारांनी पकडलेले ट्रॅक्टर फिल्मी स्टाईलने चार बुरखाधारी युवकांनी पळवून नेऊन अंगावर गाडी नेण्याच्या प्रकरणाने अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. या प्रकरणातील आरोपीना वरठी पोलिसांनी अटक केली आहे.मोहाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील व वरठीचे तलाठी पराग तितिरमारे हे आपल्या पथकासह अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या तपासणीसाठी वरठी येथील जगनाडे चौकातील पांढराबोडी रस्त्यावर उपस्थित होते. दरम्यान त्यांना ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० एल ३४८७ मध्ये रेती वाहतूक होताना दिसली. तपासणी पथकाने वाहन थांबवून तपासणी करीत आवश्यक कागदपत्रे मागितले असता ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर थांबवून पळून गेला. काही वेळातच तो आपल्यासोबत चार बुरखाधारी युवकांसह घटनास्थळावर आला.तहसीलदार व तपासणी पथकासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. हे सर्व सुरु असताना त्यातील एका युवकाने ट्रॅक्टर सुरु करून रस्त्याच्या कडेला रेतीचे ट्रॅक्टर खाली करून वाहन सरळ अधिकाऱ्याच्या दिशेने वळवले. त्यावेळी तपासणी पथकाच्या कर्मचाºयांनी रस्त्याच्या कडेला उडी घेऊन जीव वाचवला. रस्त्यावर उभे असलेले तहसीलदार यांचे वाहनाला जोरदार कट मारून आरोपींनी ट्रॅक्टर पळवून नेला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना प्रत्यक्षात अनुभवल्याने काही काळापुरते तपासणी पथकाला धडकी भरली. काही कळायच्या आत फिल्मी स्टाईलने काही युवक येतात आणि कुख्यात गुंडप्रमाणे हुज्जत घालून ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेतात. या प्रकरणाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फोडले होते. झालेला प्रकार पाहून स्तब्ध झालेल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देताानाही घाम फुटला होता.रेती चोरी आणि वाहन पकडल्या गेल्यास त्यांच्यावर होणारी कारवाई हे नित्याचे प्रकार आहेत. पण तपासणी अधिकाºयाच्या अंगावर वाहन चढवून फिल्मी स्टाईलने वाहन पळवणे हे प्रकार नवीनच आहे. याप्रकरणामुळे तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. सध्या स्थित जिल्ह्याला रेती माफियांची मुजोरी वाढल्याचे निदर्शनास येत असून चोरी व उलट मुजोरीच्या प्रकरणामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.