शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

शिक्षणाला संस्काराची जोड देऊन यश गाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:57 IST

जीवनात यश-अपयश येत जात राहतात. अपयश मिळाले म्हणून खचू नका आणि यश डोक्यात जाऊ देऊ नका. आयुष्यात मिळालेले फळ प्रयत्नावर अवलंबून आहे.

ठळक मुद्देधनेंद्र तुरकर : जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जीवनात यश-अपयश येत जात राहतात. अपयश मिळाले म्हणून खचू नका आणि यश डोक्यात जाऊ देऊ नका. आयुष्यात मिळालेले फळ प्रयत्नावर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कुठेही कमी नाही किंवा शहरी भागातील विद्यार्थी हा मागे नाही. प्रगतीचा आलेख हा आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे. शिक्षणावर होणारा खर्च हा आपल्या पालकाच्या कष्टाची किंमत आहे. शिक्षणाला संस्काराची जोड देऊन यश गाठा, असे आवाहन जिल्हा परिषद भडाराचे शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.जिल्हा परीषद शिक्षण विभागातर्फे अखील सभागृह भंडारा येथे मार्च २०१८ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण समिती सभापती रेखा ठाकरे, बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एल. एस. पाच्छापुरे व उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे उपस्थित होते.यावेळी भंडारा जिल्ह्यातील मार्च २०१८ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे सत्कार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. यात उच्च माध्यमिक गटात जिल्ह्यातील नऊ शाळेतील २१ व माध्यमिक गटात ४३ शाळेतील २४० विद्यार्थ्यांचा समावेश होता. मार्च २०१८ च्या शालांत वार्षिक परीक्षेत माध्यमिक गटात जिल्ह्यातील १९,०५४ विद्यार्थ्यांपैकी १६,५०८ व उच्च माध्यमिक गटातील १८,५४४ विद्यार्थ्यांपैकी १६,४५५ विद्याार्थी उत्तीर्ण झाले होते. यापैकी जिल्ह्यातील विविध शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून २६१ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले होते. त्या २६१ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शिक्षणाधिकारी एल. एस. पाच्छापूरे यांनी शिक्षणाचे विविध पैलू समजावून सांगितले. कौतुकाची थाप पाठीवर सहजासहजी मिळत नाही. कौतुक हे प्रयत्नांशिवाय प्राप्त होत नाही. परीक्षेच्या काळात पालक व विद्यार्थ्यांच्या संवेदना वाढतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यासाठी सुरुपासून प्रवूत्त करावे.संचालन मुकुंद ठावकर व स्मिता गालफाडे, प्रास्ताविक शिक्षणाधिकारी एल. एस. पाच्छापुरे व आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी राजभोज भांबोरे, मुकेश मेश्राम, जगदीश उके, विनायक वंजारी, मोहाडीचे कनिष्ठ विस्तार अधिकारी विभावरी पडोळे, अशोक भानारकर सहकार्य केले.निर्बंध यशाला रोखू शकत नाहीशालेय जीवन हे निर्बंधांनी व्यापलेले आहे. १० व १२ वी वर्गात गेलो की अनेक निर्बंध लादल्या जातात. परीक्षांचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांचे जीवन जाचक सूचनांवर चालते. पण निर्बंध न लादता यश मिळवता येते, असे मत जिल्ह्यातून १२ वीच्या परीक्षेत दुसरे स्थान पटकाविणाऱ्या हिमाली घोडमारेने सिद्ध करून दाखवले. विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करताना हिमालीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आठ वेळा सुवर्णपदक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन १२ वीच्या परीक्षेत यश गाठले असल्याचे सांगितले.