शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘सोंड्याटोला’चे भवितव्य अधांतरी!

By admin | Updated: December 15, 2015 00:38 IST

वीज पुरवठा सुरळीत पूर्ववत सुरु करण्याचा तोडगा निघाला नसल्याने महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात मागील दोन महिन्यापासून अंधार आहे.

पदे रिक्त , प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडीतचुल्हाड (सिहोरा) : वीज पुरवठा सुरळीत पूर्ववत सुरु करण्याचा तोडगा निघाला नसल्याने महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात मागील दोन महिन्यापासून अंधार आहे. यातच १४ हजार हेक्टर शेतीला ओलीताखाली आणणाऱ्या नहर आणि कालव्याची जीर्णावस्था झाल्याने रबीचा हंगाम संकटात सापडला आहे. सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी बावनथडी नदीवर ११० कोटी खर्चून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. नियोजन आणि निधी अभावी हा प्रकल्प शेतकऱ्यांना आता डोकेदुखी ठरू पाहत आहे. खरीप आणि रबी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरिता पाणी वाटप करण्यासाठी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असली तरी रबी हंगामात शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यास प्रकल्पाला अपयश आले आहे. संकटकाळात राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडले जात नाही. या शिवाय बावनथडी नदी पात्रात पाणी साठवणूक करणारे स्त्रोत नाही. यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पात्रातील पाण्याचा उपसा सोंड्याटोला प्रकल्प करीत आहे. यातही तांत्रिक अडचणीमुळे महिनाभर पंपगृह सुरु ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दोन वेळा पीक उत्पादन घेता येत नाही. ‘जैसे थे’ स्थितीत प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा चांदपूर जलाशयात असल्याने शेतकरी उत्पादनापासून वंचित राहत आहेत. दरम्यान यंदा खरीप हंगामात विजेचे देयके अदा केले नसल्याचे कारणावरून वीज वितरण कंपनी मार्फत प्रकल्पस्थळात वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. ३४ ल्क्ष रुपयावरून डिसेंबर महिन्यात ३६ लाख ४५ हजार १३० रुपये विजेचे देयक असल्याचे बिल धडकले. यामुळे महत्वाकांक्षी प्रकल्प अंधारात आहे. विदर्भ विकास महामंडळाच्या नियंत्रणात असणाऱ्या या प्रकल्प स्थळाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे सिंचन तथा उदयोन्मुख शासन गंभीर नसल्याची बाब निदर्शनास येत आहे.प्रकल्पस्थळात अंधाराचे साम्राज्य असल्याने सुरक्षा ऐरणीवर आली आहे. शासनाने निधी उपलब्ध केला नसल्याने विजेचे देयक भरण्यात आली नाही. अशी माहिती मिळाली आहे. या प्रकल्पाचे पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. उजवा व डावा कालवा, नहर, पादचाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेती ओलीताखाली आणण्यासाठी पाणी वाटप करण्यात येत आहे. परंतु कालवे आणि नहरांची अवस्था जीर्ण झाली आहे. नहराचे सिमेंट अस्तरीकरण उखडली आहे. पावसाळ्यात नहर तुंबली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थेट पाणी मिळत नाही. टेलवर तर पाणी पोहचत नाही. यामुळे साधने असतांनाही शेतकऱ्यांची शेती ओलीताखाली येत नाही. कालवे, नहर आणि पादचाऱ्यांच्या सिमेंट अस्तरीकरण, स्वच्छता तथा अन्य विकास कार्यासाठी ५८ कोटी रूपयांच्या पॅकेजची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)