शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘सोंड्याटोला’चे भवितव्य अधांतरी!

By admin | Updated: December 15, 2015 00:38 IST

वीज पुरवठा सुरळीत पूर्ववत सुरु करण्याचा तोडगा निघाला नसल्याने महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात मागील दोन महिन्यापासून अंधार आहे.

पदे रिक्त , प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडीतचुल्हाड (सिहोरा) : वीज पुरवठा सुरळीत पूर्ववत सुरु करण्याचा तोडगा निघाला नसल्याने महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात मागील दोन महिन्यापासून अंधार आहे. यातच १४ हजार हेक्टर शेतीला ओलीताखाली आणणाऱ्या नहर आणि कालव्याची जीर्णावस्था झाल्याने रबीचा हंगाम संकटात सापडला आहे. सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी बावनथडी नदीवर ११० कोटी खर्चून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. नियोजन आणि निधी अभावी हा प्रकल्प शेतकऱ्यांना आता डोकेदुखी ठरू पाहत आहे. खरीप आणि रबी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरिता पाणी वाटप करण्यासाठी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असली तरी रबी हंगामात शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यास प्रकल्पाला अपयश आले आहे. संकटकाळात राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडले जात नाही. या शिवाय बावनथडी नदी पात्रात पाणी साठवणूक करणारे स्त्रोत नाही. यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पात्रातील पाण्याचा उपसा सोंड्याटोला प्रकल्प करीत आहे. यातही तांत्रिक अडचणीमुळे महिनाभर पंपगृह सुरु ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दोन वेळा पीक उत्पादन घेता येत नाही. ‘जैसे थे’ स्थितीत प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा चांदपूर जलाशयात असल्याने शेतकरी उत्पादनापासून वंचित राहत आहेत. दरम्यान यंदा खरीप हंगामात विजेचे देयके अदा केले नसल्याचे कारणावरून वीज वितरण कंपनी मार्फत प्रकल्पस्थळात वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. ३४ ल्क्ष रुपयावरून डिसेंबर महिन्यात ३६ लाख ४५ हजार १३० रुपये विजेचे देयक असल्याचे बिल धडकले. यामुळे महत्वाकांक्षी प्रकल्प अंधारात आहे. विदर्भ विकास महामंडळाच्या नियंत्रणात असणाऱ्या या प्रकल्प स्थळाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे सिंचन तथा उदयोन्मुख शासन गंभीर नसल्याची बाब निदर्शनास येत आहे.प्रकल्पस्थळात अंधाराचे साम्राज्य असल्याने सुरक्षा ऐरणीवर आली आहे. शासनाने निधी उपलब्ध केला नसल्याने विजेचे देयक भरण्यात आली नाही. अशी माहिती मिळाली आहे. या प्रकल्पाचे पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. उजवा व डावा कालवा, नहर, पादचाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेती ओलीताखाली आणण्यासाठी पाणी वाटप करण्यात येत आहे. परंतु कालवे आणि नहरांची अवस्था जीर्ण झाली आहे. नहराचे सिमेंट अस्तरीकरण उखडली आहे. पावसाळ्यात नहर तुंबली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थेट पाणी मिळत नाही. टेलवर तर पाणी पोहचत नाही. यामुळे साधने असतांनाही शेतकऱ्यांची शेती ओलीताखाली येत नाही. कालवे, नहर आणि पादचाऱ्यांच्या सिमेंट अस्तरीकरण, स्वच्छता तथा अन्य विकास कार्यासाठी ५८ कोटी रूपयांच्या पॅकेजची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)