शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आरक्षणाच्या पेचात अडकले भावी सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST

करडी(पालोरा): सरपंचाचे आरक्षण निघण्यास अवधी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणारी पळवापळवी, घोडेबाजार तात्पुरता का होईना थांबलेला आहे. इच्छुक सदस्यांना सरपंचपदाचे ...

करडी(पालोरा): सरपंचाचे आरक्षण निघण्यास अवधी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणारी पळवापळवी, घोडेबाजार तात्पुरता का होईना थांबलेला आहे. इच्छुक सदस्यांना सरपंचपदाचे स्वप्न बेचैन करीत असून रात्रीची झोप व दिवसाची चैन हरविली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या स्वतंत्र व राजकीय पक्ष समर्थात पॅनल, आघाड्यांचे उमेदवार व स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. समर्थकांनी जल्लोषात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. डीजे व डफलीच्या तालात मिरवणुका काढण्यात आल्या. परंतु सरपंच कोण, याचा पेच अजूनही कायम असल्याने सर्वच अचंबित आहेत. सरपंच पदाचे आरक्षण कुणासाठी, हे स्पष्ट न झाल्याने अनेक संभाव्य सरपंचांचा हिरमोड झाला आहे.

गावाचा सर्वांगीण विकासाची धुरा ग्रामपंचायतीवर पर्यायाने सरपंच व ग्राम कमेटीवर असते. गावकारभारी होण्यासाठी गावागावात समर्थक व आघाड्यांच्या विजयासाठी, ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी यंदा प्रचंड उत्साह दाखविण्यात आला. पक्षांची साथ मिळाल्याने कार्यकर्तेही जोशात होते. स्वतः व पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विजयश्री खेचून आणत अनेकांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले. परंतु यावर्षी मागील थेट सरपंच निवडीच्या धोरणात बदल करीत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचे जुनेच धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्या धोरणाचा भाग

म्हणून प्रथम सदस्यांची निवड व त्यानंतर आरक्षण सोडत आणि सरपंच निवडणूक होणार असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.

-----

निवडणुकीचा खर्च लाखात

यावर्षीच्या निवडणुका अधिक खर्चिक झाल्याचे खुद्द निवडून आलेले सदस्यच खाजगीत सांगत आहेत. एकेका मतासाठी हजारों रुपयांचा चुराडा झाला. जिद्द व इर्षा पेटलेल्या राजकारणात सत्ता मिळविण्यासाठी व निवडून येण्यासाठी पाण्यासारखा खर्च करण्यात आला. निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेली खर्च मर्यादा प्रत्येक गावात ओलांडली गेली. परंतु हा खर्च अघोषित असल्याने निवडणूक विभागाला या खर्चाला हिशेख कुणीही देणार नाही. अनेक सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दीड ते दोन लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले.

----

कारणांच्या शोधात हरलेले उमेदवार

ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या व काट्याच्या झाल्या. अनेक उमेदवार अवघ्या एका मताने तर अनेक तीन ते सात मतांच्या फरकात हरले. घराजवळच विरोधक व समर्थक असल्याने हरलेले उमेदवार आता कारणांची मीमांसा करीत आहेत. कुणी मत दिले नाही, कुणी दिले, याचा हिशेब जुळविला जात आहे. कुणी दगाबाजी केली, मते दिली नाही, ती व्यक्ती समोर दिसताच, त्यांच्या रागाला पारावार नसतो. हरलेल्यांनी जवळच्या समर्थकांवर, नातेवाईकांवर आपला राग काढला, परंतु आता उपयोग काय, असा प्रश्न मनाशी विचारून अनेकांनी रागाचा पाणी केला असल्याचे खासगीत सांगितले जात आहे.