शहरं
Join us  
Trending Stories
1
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
2
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
4
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
5
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
6
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
7
IND vs SA: विराटची शतकं, रोहितची फटकेबाजी, संघाने मालिकाही जिंकली; पण आता आली वाईट बातमी
8
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
9
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
10
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
11
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
12
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
13
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
14
'पैसे नाही, मला तूच पाहिजे!', वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'त्या' मागण्या, वेतनवाढही रोखली; कंटाळून नर्सने...
15
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
16
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
17
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
18
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
19
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
20
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या पेचात अडकले भावी सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST

करडी(पालोरा): सरपंचाचे आरक्षण निघण्यास अवधी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणारी पळवापळवी, घोडेबाजार तात्पुरता का होईना थांबलेला आहे. इच्छुक सदस्यांना सरपंचपदाचे ...

करडी(पालोरा): सरपंचाचे आरक्षण निघण्यास अवधी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणारी पळवापळवी, घोडेबाजार तात्पुरता का होईना थांबलेला आहे. इच्छुक सदस्यांना सरपंचपदाचे स्वप्न बेचैन करीत असून रात्रीची झोप व दिवसाची चैन हरविली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या स्वतंत्र व राजकीय पक्ष समर्थात पॅनल, आघाड्यांचे उमेदवार व स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. समर्थकांनी जल्लोषात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. डीजे व डफलीच्या तालात मिरवणुका काढण्यात आल्या. परंतु सरपंच कोण, याचा पेच अजूनही कायम असल्याने सर्वच अचंबित आहेत. सरपंच पदाचे आरक्षण कुणासाठी, हे स्पष्ट न झाल्याने अनेक संभाव्य सरपंचांचा हिरमोड झाला आहे.

गावाचा सर्वांगीण विकासाची धुरा ग्रामपंचायतीवर पर्यायाने सरपंच व ग्राम कमेटीवर असते. गावकारभारी होण्यासाठी गावागावात समर्थक व आघाड्यांच्या विजयासाठी, ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी यंदा प्रचंड उत्साह दाखविण्यात आला. पक्षांची साथ मिळाल्याने कार्यकर्तेही जोशात होते. स्वतः व पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विजयश्री खेचून आणत अनेकांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले. परंतु यावर्षी मागील थेट सरपंच निवडीच्या धोरणात बदल करीत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचे जुनेच धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्या धोरणाचा भाग

म्हणून प्रथम सदस्यांची निवड व त्यानंतर आरक्षण सोडत आणि सरपंच निवडणूक होणार असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.

-----

निवडणुकीचा खर्च लाखात

यावर्षीच्या निवडणुका अधिक खर्चिक झाल्याचे खुद्द निवडून आलेले सदस्यच खाजगीत सांगत आहेत. एकेका मतासाठी हजारों रुपयांचा चुराडा झाला. जिद्द व इर्षा पेटलेल्या राजकारणात सत्ता मिळविण्यासाठी व निवडून येण्यासाठी पाण्यासारखा खर्च करण्यात आला. निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेली खर्च मर्यादा प्रत्येक गावात ओलांडली गेली. परंतु हा खर्च अघोषित असल्याने निवडणूक विभागाला या खर्चाला हिशेख कुणीही देणार नाही. अनेक सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दीड ते दोन लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले.

----

कारणांच्या शोधात हरलेले उमेदवार

ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या व काट्याच्या झाल्या. अनेक उमेदवार अवघ्या एका मताने तर अनेक तीन ते सात मतांच्या फरकात हरले. घराजवळच विरोधक व समर्थक असल्याने हरलेले उमेदवार आता कारणांची मीमांसा करीत आहेत. कुणी मत दिले नाही, कुणी दिले, याचा हिशेब जुळविला जात आहे. कुणी दगाबाजी केली, मते दिली नाही, ती व्यक्ती समोर दिसताच, त्यांच्या रागाला पारावार नसतो. हरलेल्यांनी जवळच्या समर्थकांवर, नातेवाईकांवर आपला राग काढला, परंतु आता उपयोग काय, असा प्रश्न मनाशी विचारून अनेकांनी रागाचा पाणी केला असल्याचे खासगीत सांगितले जात आहे.