शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भावी अभियंत्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:01 IST

तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देआलोक मिश्रा : एमआईईटीमध्ये उद्योजगता विकास कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.स्थानिक मनोहर भाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर येथे केंद्र शासनाच्या विज्ञान व तकनिकी मंत्रालय व महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटनेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे विभागीय आयुक्त आलोक मिश्रा, माझी विभागीय आयुक्त् व उद्योजकता प्रशिक्षक शुभांग गोरे, प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने, कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख प्रामुख्याने उपस्थित होते.प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारचे उद्योग तरूण अभियंते सुरू करू शकतात, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत उद्योजकांसाठी आवश्यक असणाºया सर्व घटकांविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संस्थेद्वारे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती देवून तरूण अभियंत्यांना उद्योगाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.प्रास्ताविक प्रा. शाहीद शेख यांनी केले. दुसºया दिवशी वैभव पांडे यांनी उद्योजकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध व्यक्तीमत्व विकासाच्या पैलूंविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उप्पल सिन्हा यांनी बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा व मालाचा खप कसा वाढवावा याविषयी जाणीव जागृती केली. मानवी व्यक्तीमत्वाचा उद्योगाच्या विविध घटकांवर होत असलेल्या सकारात्मक व नकारात्मक बांबींची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.तिसऱ्या व शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गडेगाव व भंडारा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील विविध उद्योगांना भेटी देवून तिथे प्रत्यक्षात कसे काम होते याची माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेकरिता कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख, प्रा. संजय राजुरकर, प्रा. कोमल मेश्राम, प्रणय लांजेवार, प्रा. तुषार राऊत यांनी सहकार्य केले.