शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

७० गावांत भीषण पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: June 4, 2015 00:27 IST

टँकरमुक्त घोषित भंडारा जिल्ह्यातील ७० गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण सावट आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराटँकरमुक्त घोषित भंडारा जिल्ह्यातील ७० गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण सावट आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या पाणीटंचाई सदृश्य आराखडांतर्गत कामे मे महिना संपूणही पूर्ण झालेली नाही. परिणामी त्याचा फटका जनसामान्यांना बसत आहे.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील नऊ लघु पाणलोट विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटरने घटली असल्याची बाब उघडकीला आली आहे. भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्याची २५ पाणलोट क्षेत्रात विभागणी केली होती. त्यानुसार हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील वर्षी जून ते मार्चपर्यंत ९९७.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३३२.८३ मिमी पाऊस कमी पडला आहे. याउपर पाणीटंचाईची संबंधी कामेही प्रलंबित आहेत. मार्च महिन्याच्या अहवालात ६६ गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याचा गंभीर इशारा देण्यात आला होता. त्यात अजुन काही गावांची भर पडली. जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ५़ ६८ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात २२.०४ टक्क्यानी घट झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ ६़ ५९ टक्के जलसाठा आहे. सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ६़९२, बघेडा १८़१६, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४.५६ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ६.५१ टक्के आहे़ गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ६़९१५ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ १ जून २०१४ रोजी ६३ प्रकल्पात ३३.७५४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी २७.७२ एवढी होती.सन २०१२ मध्ये १०.४, सन २०१३ मध्ये १०.२२ टक्के जलसाठ्याची नोंद आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. २१ प्रकल्प कोरडेमागील वर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. प्रकल्पात असलेल्या पाण्याचा योग्य वापर न करता अपव्यय अधिक झाला. परीणामी जिल्ह्यातील २१ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, १२ लघु, तर नऊ माजी मालगुजारी, असे एकुण २३ प्रकल्पांचा समावेश आहे. २१ प्रकल्पांमध्ये बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, डोंगरला, हिवरा, आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, कुंभली, सालेबर्डी, मुरमाडी हमेशा, न्याहारवानी, सानगडी, केसलवाडा, कन्हेरी, चान्ना, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा, कोका, दहेगावचा समावेश आहे.