शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

'ग्रीप'विनाच रोहित्रातून जीवघेणा वीज प्रवाह

By admin | Updated: September 20, 2015 00:56 IST

परिसरात वीज वितरण कंपनीचा कारभार सैरवैर झालेला आहे. साहित्य अभावी ग्रीपविनाच रोहित्रमधून वीज प्रवाह सुरु असून, ...

चुल्हाडात म्हैस ठार : वारंवार विजेचा लपंडाव, गावकरी त्रस्तचुल्हाड (सिहोरा) : परिसरात वीज वितरण कंपनीचा कारभार सैरवैर झालेला आहे. साहित्य अभावी ग्रीपविनाच रोहित्रमधून वीज प्रवाह सुरु असून, विजेच्या धक्क्याने चुल्हाडात म्हैस ठार झाली आहे. त्यामुळे नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.विजेचा लपंडाव, साहित्यांचा अभाव, नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष यामुळे सिहोरा येथील वीज वितरण कंपनीचा कार्यालय चर्चेत आलेला आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांचा यात दोष नसतांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. या कार्यालयात सिहोरा १ आणि सिहोरा २ अशी विभागणी करण्यात आली आहे. या विभागांना स्वतंत्र यंत्रणा संचालित करीत आहे. ३३/११ केव्हीचे केंद्र मोठ्या आंदोलनाने प्राप्त झाले आहे. नागरिकांना सिंगल फेज व शेतकऱ्यांना थ्री फेज अशी वीज जोडणीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे परिसरात नागरिकांना भारनियमनातून मुक्ती मिळाली आहे. परंतु शेतकरी पुरता खचला आहे. २४ पैकी ८ तास वीज पुरवठा शेतकऱ्यांचे पंपाला होत आहे. यामुळे नळ योजनांचे नियोजन ढासळले आहे. थ्री फेज वीज पुरवठ्याच्या कक्षात या नळ योजना आहेत. पिण्याचे पाणी आणि शेतीचे उत्पादन भारनियमनाच्या गणितावर अवलंबून आहे. दरम्यान रोहित्राची अवस्था वाईट झाली आहे. या रोहित्रांना ग्रीप नाहीत. थेट फ्युज तार जोडली जात आहेत. हां प्रकार जीवघेणा असताना कुणी पुढारी बोलते होत नाहीत. ग्रीप नसल्याने कधीही वीज पुरवठा खंडीत होत आहे. गावातील काही अनुभवी तरुण ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे. वीज आता गरज झाल्याने अप्रशिक्षित तरुणाचा जीव वेशीवर टांगल्या जात आहे. निश्चितच वीज वितरण कंपनी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव आहे. जनमित्रांना अनेक गावांचा कारभार असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे.या कार्यालयात तक्रार अथवा गाऱ्हाणे सांगीतली असता, साहित्य नसल्याचे ऐकविण्यात येत आहे. हे सत्य असले तरी अशा उत्तराने समस्या निकाली निघणार नाही. चुल्हाडात शेतकरी नंदू पारधी गावाचे शेजारी जनावरे चारत असताना रोहित्रानजिक संपूर्ण जागेला करंट होते. या विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांची म्हैस जागीच ठार झाली आहे. यात ५० हजाराचे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा आधार हिरावला आहे. या धक्क्यात शेतकरी नंदू पारधी हे थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती वीज वितरण कंपनी कार्यालयात देण्यात आली आहे. (वार्ताहर)