शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आदिवासी बांधवांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:36 IST

आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देशासन निर्णय रद्द करा : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना सोपविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.गुरुवारला सकाळी ११.३० वाजता दसरा मैदान येथे मोर्चेकरी एकत्रीत आले होते. येथून सदर मोर्चा आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मडावी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. हा मार्चा गांधी चौक, पोस्टआॅफीस चौक, बसस्थानक चौक होत थेट त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला मोर्चेकरांनी संबोधीत केले. ते म्हणाले, ग्रामीण भागात असलेल्या शासकीय वसतीगृहात व शहरात खाजगी खानावळ नाहीत. रात्रीचे जेवन खाजगी खानावळीकरिता विद्यार्थीनी सायंकाळी ७ नंतर जाणे योग्य नाही. सध्या स्थितीत महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. यादरम्यान विद्यार्थीनीसोबत अनुचूति प्रकार घडल्यास जबाबदार कोण राहणार, विद्यार्थी-विद्यार्थिनींची रक्कम एकाच वेळेस जमा झाल्यास तीन महिन्यांपर्यंत रक्कम टिकून राहतील काय, विद्यार्थ्यांचे बँक खात्यात वेळेवर रक्कम जमा होईल काय असा अनेक समस्या निर्माण होत आहेत.समाजकल्याण विभागाचे वसतीगृह व इतर मागासवर्गीय वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांना पोटभर जेवन वसतीगृहात देण्यात यावे असा निर्णय आहे. वसतीगृहासाठी वेगळा निर्णय का? हा आदिवासी समाज बांधवावर अन्याय आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहातच जेवण उपलब्ध करुन देण्यात यावे, आदिवासी विकास विभागाने काढलेला निर्णय त्वरित रद्द करुन पुर्ववत भोजनव्यवस्था सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. माजी खा.नाना पटोले यांनी मोर्चेकरांच्या सभास्थळी जावून आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी लढा उभारण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाला नागेश कळपते, अशोक उईके, संतोष मडावी, जि.प. सदस्य उत्तम कळपते, प्रभा पेंदाम, भाग्यश्री उईके, आरती सय्याम, बालेश वरकडे, राम आहाके, शिशुपाल खंडाते, दिनेश मरसकोल्हे, कृष्णा टेकाम, नरेश आचला आदी उपस्थित होते.