शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:36 IST

आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देशासन निर्णय रद्द करा : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना सोपविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.गुरुवारला सकाळी ११.३० वाजता दसरा मैदान येथे मोर्चेकरी एकत्रीत आले होते. येथून सदर मोर्चा आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मडावी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. हा मार्चा गांधी चौक, पोस्टआॅफीस चौक, बसस्थानक चौक होत थेट त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला मोर्चेकरांनी संबोधीत केले. ते म्हणाले, ग्रामीण भागात असलेल्या शासकीय वसतीगृहात व शहरात खाजगी खानावळ नाहीत. रात्रीचे जेवन खाजगी खानावळीकरिता विद्यार्थीनी सायंकाळी ७ नंतर जाणे योग्य नाही. सध्या स्थितीत महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. यादरम्यान विद्यार्थीनीसोबत अनुचूति प्रकार घडल्यास जबाबदार कोण राहणार, विद्यार्थी-विद्यार्थिनींची रक्कम एकाच वेळेस जमा झाल्यास तीन महिन्यांपर्यंत रक्कम टिकून राहतील काय, विद्यार्थ्यांचे बँक खात्यात वेळेवर रक्कम जमा होईल काय असा अनेक समस्या निर्माण होत आहेत.समाजकल्याण विभागाचे वसतीगृह व इतर मागासवर्गीय वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांना पोटभर जेवन वसतीगृहात देण्यात यावे असा निर्णय आहे. वसतीगृहासाठी वेगळा निर्णय का? हा आदिवासी समाज बांधवावर अन्याय आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहातच जेवण उपलब्ध करुन देण्यात यावे, आदिवासी विकास विभागाने काढलेला निर्णय त्वरित रद्द करुन पुर्ववत भोजनव्यवस्था सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. माजी खा.नाना पटोले यांनी मोर्चेकरांच्या सभास्थळी जावून आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी लढा उभारण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाला नागेश कळपते, अशोक उईके, संतोष मडावी, जि.प. सदस्य उत्तम कळपते, प्रभा पेंदाम, भाग्यश्री उईके, आरती सय्याम, बालेश वरकडे, राम आहाके, शिशुपाल खंडाते, दिनेश मरसकोल्हे, कृष्णा टेकाम, नरेश आचला आदी उपस्थित होते.