शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आदिवासी बांधवांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:36 IST

आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देशासन निर्णय रद्द करा : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना सोपविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.गुरुवारला सकाळी ११.३० वाजता दसरा मैदान येथे मोर्चेकरी एकत्रीत आले होते. येथून सदर मोर्चा आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मडावी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. हा मार्चा गांधी चौक, पोस्टआॅफीस चौक, बसस्थानक चौक होत थेट त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला मोर्चेकरांनी संबोधीत केले. ते म्हणाले, ग्रामीण भागात असलेल्या शासकीय वसतीगृहात व शहरात खाजगी खानावळ नाहीत. रात्रीचे जेवन खाजगी खानावळीकरिता विद्यार्थीनी सायंकाळी ७ नंतर जाणे योग्य नाही. सध्या स्थितीत महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. यादरम्यान विद्यार्थीनीसोबत अनुचूति प्रकार घडल्यास जबाबदार कोण राहणार, विद्यार्थी-विद्यार्थिनींची रक्कम एकाच वेळेस जमा झाल्यास तीन महिन्यांपर्यंत रक्कम टिकून राहतील काय, विद्यार्थ्यांचे बँक खात्यात वेळेवर रक्कम जमा होईल काय असा अनेक समस्या निर्माण होत आहेत.समाजकल्याण विभागाचे वसतीगृह व इतर मागासवर्गीय वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांना पोटभर जेवन वसतीगृहात देण्यात यावे असा निर्णय आहे. वसतीगृहासाठी वेगळा निर्णय का? हा आदिवासी समाज बांधवावर अन्याय आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहातच जेवण उपलब्ध करुन देण्यात यावे, आदिवासी विकास विभागाने काढलेला निर्णय त्वरित रद्द करुन पुर्ववत भोजनव्यवस्था सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. माजी खा.नाना पटोले यांनी मोर्चेकरांच्या सभास्थळी जावून आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी लढा उभारण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाला नागेश कळपते, अशोक उईके, संतोष मडावी, जि.प. सदस्य उत्तम कळपते, प्रभा पेंदाम, भाग्यश्री उईके, आरती सय्याम, बालेश वरकडे, राम आहाके, शिशुपाल खंडाते, दिनेश मरसकोल्हे, कृष्णा टेकाम, नरेश आचला आदी उपस्थित होते.