शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त भाजीपाला विक्रेत्यांचा नगरपालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:34 IST

येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते यांना जागा होत नाही.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचा विरोध : आजपासून बाजारबंदचा इशारा

आॅनलाईन लोकमतपवनी : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते यांना जागा होत नाही. रस्त्याच्या कडेला बसले तर वाहतूक खोळंबलेली असते. रस्त्याच्या कडेला कोणत्याही परिस्थितीत भाजी विक्रेते बसणार नाही असा मुख्याधिकारी यांचा अलिखीत आदेश आहे. व्यवसाय बुडत असल्याने बाजारात नियमित बसणारे भाजी व किरकोळ वस्तू विक्रेते एकत्र आले आणि नगरपरिषदेकडे मोर्चा वळविला. एक ते दीड तास वाट पाहून मुख्याधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली आल्या नाहीत त्यामुळे निराश होवून व्यापारी परतले. तसेच मंगळवारपासून बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.मोर्चाचे नेतृत्व डॉ.राजेश नंदूरकर यांनी केले. यावेळी राजू गणवीर, प्रफुल्ल सावरकर, क्रिष्णा खांदाडे, भूषण सावरकर, धनराज उपरीकर, सुमन नंदूरकर, छबूताई डोंगरे, विठाबाई बावनकर, हरिहर खापरीकर व शेकडो भाजीपाला विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते उपस्थित होते.भाजीविक्रेत्यांचा मुख्याधिकाऱ्यांना दमबाजारातील भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्यासाठी आलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना ‘माझा दुकान उध्वस्त केला तर खबरदार’ असा दम एका भाजीपाला विक्रेत्या महिलेने भरला. शनिवार व मंगळवार असे दोन दिवस भरणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाºया मुख्याधिकारी यांनी बाजारातील जागेचा नियोजन केले नाही. रस्त्यावर भरणारा बाजार अधिकृत ठिकाणी भरविण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्यास भाजीपाला घरी घेऊन जावे लागते.