शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

केंद्रावर बारदान्याचा वारंवार अर्धवट पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:06 IST

सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.

ठळक मुद्देसिहोरा येथे धानाची खरेदी प्रभावित : कर्मचारी व शेतकरी त्रस्त, सोईसुविधांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.खरीप हंगामात धानाचे उत्पादन झाले असून शेतकऱ्यांची धान विक्रीत लूट थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे. या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परंतु या धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सिहोरा गावात सहकारी राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यमार्ग शेजारी असणाऱ्यां या केंद्रावर शेतकरी धानाची विक्री करीत आहेत. या केंद्रावर तीन गोडावून असल्याने धानाची पोती सुरक्षित असल्याची खातरजमा शेतकऱ्यांना आहे. केंद्रावर धानाची आवक वाढत असताना बारदान्याचा पुरवठा करताना कंजुशी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्याची वेळ येत आहे. बारदान्याची मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कर्मचारी आणि शेतकरी त्रस्त झाली आहे. धान खरेदी केंद्रांना मंजुरी देताना आधी पूर्वतयारी करण्याचे प्रयत्न दिसून येत नाही. अनेक दिवस केंद्रावर धानाची पोती पडून राहत असल्याने नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. परंतु कुणी या नुकसानीची जबाबदारी स्वीकारत नाही.धानाची खरेदी प्रक्रियेला विलंब, मदतीत उशिर होत असल्याने शेतकरी नागवला जात आहे. धानाच्या पट्ट्यात गोडावूनचा अभाव आहे. धानाचे विक्रमी उत्पादन होत असताना प्रत्येक गावात नव्याने गोडावून निर्माण करण्यात येत नाही. यामुळे अवकाळी पावसाचे आगमन होत असताना या धानाला सुरक्षित उपाय देताना शेतकºयांना कसरत करावी लागत आहे.दरम्यान गावात लोकप्रतिनिधी यांचे विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, सभामंडप आदी वाटप करण्यात येत आहे. एकावर एक सिमेंट रस्ते तयार करण्यात येत असल्याने निधी खर्चाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सभामंंडप बांधकाम उपायोगाविना पडून आहेत. यामुळे धानाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रत्येक गावात ५० हजार पोती सुरक्षित ठेवणे तथा अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गोडावून निर्मितीची ओरड सुरु आहे. शेतशिवारात वर्षभर पिकांची सुरक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांना व उत्पादीत अन्न धान्यांना गावात संरक्षण मिळाले पाहिजे. या गोडावूनची जबाबदारी ग्रामपंचायतींना दिल्यास आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदतीचे ठरणार आहे.राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर असले तरी बारदान्याचा वारंवार तुटवडा निर्माण होत आहे. धानाची वाढती आवक असताना अतिरिक्त बारदाना जलद गतीने उपलब्ध करण्याची गरज आहे.-गंगादास तुरकर, अध्यक्ष, राईस मिल सिहोराधान पट्टा असणाºया या परिसरात गोडावूनचा अभाव आहे. प्रत्येक गावात गोडावून निर्माण केले पाहिजे. शेतकºयांचे उत्पादीत अन्न धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदतीचे होईल.- मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ, सिंदपुरीगोडावून निर्मितीमुळे निश्चितच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीसाठी मदतीचे ठरणार असून शेतकºयांचे धानाला गावातच संरक्षण मिळेल.-वैशाली पटले, सरपंच, देवरी (देव)