शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रावर बारदान्याचा वारंवार अर्धवट पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:06 IST

सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.

ठळक मुद्देसिहोरा येथे धानाची खरेदी प्रभावित : कर्मचारी व शेतकरी त्रस्त, सोईसुविधांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.खरीप हंगामात धानाचे उत्पादन झाले असून शेतकऱ्यांची धान विक्रीत लूट थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे. या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परंतु या धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सिहोरा गावात सहकारी राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यमार्ग शेजारी असणाऱ्यां या केंद्रावर शेतकरी धानाची विक्री करीत आहेत. या केंद्रावर तीन गोडावून असल्याने धानाची पोती सुरक्षित असल्याची खातरजमा शेतकऱ्यांना आहे. केंद्रावर धानाची आवक वाढत असताना बारदान्याचा पुरवठा करताना कंजुशी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्याची वेळ येत आहे. बारदान्याची मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कर्मचारी आणि शेतकरी त्रस्त झाली आहे. धान खरेदी केंद्रांना मंजुरी देताना आधी पूर्वतयारी करण्याचे प्रयत्न दिसून येत नाही. अनेक दिवस केंद्रावर धानाची पोती पडून राहत असल्याने नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. परंतु कुणी या नुकसानीची जबाबदारी स्वीकारत नाही.धानाची खरेदी प्रक्रियेला विलंब, मदतीत उशिर होत असल्याने शेतकरी नागवला जात आहे. धानाच्या पट्ट्यात गोडावूनचा अभाव आहे. धानाचे विक्रमी उत्पादन होत असताना प्रत्येक गावात नव्याने गोडावून निर्माण करण्यात येत नाही. यामुळे अवकाळी पावसाचे आगमन होत असताना या धानाला सुरक्षित उपाय देताना शेतकºयांना कसरत करावी लागत आहे.दरम्यान गावात लोकप्रतिनिधी यांचे विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, सभामंडप आदी वाटप करण्यात येत आहे. एकावर एक सिमेंट रस्ते तयार करण्यात येत असल्याने निधी खर्चाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सभामंंडप बांधकाम उपायोगाविना पडून आहेत. यामुळे धानाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रत्येक गावात ५० हजार पोती सुरक्षित ठेवणे तथा अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गोडावून निर्मितीची ओरड सुरु आहे. शेतशिवारात वर्षभर पिकांची सुरक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांना व उत्पादीत अन्न धान्यांना गावात संरक्षण मिळाले पाहिजे. या गोडावूनची जबाबदारी ग्रामपंचायतींना दिल्यास आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदतीचे ठरणार आहे.राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर असले तरी बारदान्याचा वारंवार तुटवडा निर्माण होत आहे. धानाची वाढती आवक असताना अतिरिक्त बारदाना जलद गतीने उपलब्ध करण्याची गरज आहे.-गंगादास तुरकर, अध्यक्ष, राईस मिल सिहोराधान पट्टा असणाºया या परिसरात गोडावूनचा अभाव आहे. प्रत्येक गावात गोडावून निर्माण केले पाहिजे. शेतकºयांचे उत्पादीत अन्न धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदतीचे होईल.- मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ, सिंदपुरीगोडावून निर्मितीमुळे निश्चितच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीसाठी मदतीचे ठरणार असून शेतकºयांचे धानाला गावातच संरक्षण मिळेल.-वैशाली पटले, सरपंच, देवरी (देव)