शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

केंद्रावर बारदान्याचा वारंवार अर्धवट पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:06 IST

सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.

ठळक मुद्देसिहोरा येथे धानाची खरेदी प्रभावित : कर्मचारी व शेतकरी त्रस्त, सोईसुविधांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.खरीप हंगामात धानाचे उत्पादन झाले असून शेतकऱ्यांची धान विक्रीत लूट थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे. या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परंतु या धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सिहोरा गावात सहकारी राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यमार्ग शेजारी असणाऱ्यां या केंद्रावर शेतकरी धानाची विक्री करीत आहेत. या केंद्रावर तीन गोडावून असल्याने धानाची पोती सुरक्षित असल्याची खातरजमा शेतकऱ्यांना आहे. केंद्रावर धानाची आवक वाढत असताना बारदान्याचा पुरवठा करताना कंजुशी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्याची वेळ येत आहे. बारदान्याची मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कर्मचारी आणि शेतकरी त्रस्त झाली आहे. धान खरेदी केंद्रांना मंजुरी देताना आधी पूर्वतयारी करण्याचे प्रयत्न दिसून येत नाही. अनेक दिवस केंद्रावर धानाची पोती पडून राहत असल्याने नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. परंतु कुणी या नुकसानीची जबाबदारी स्वीकारत नाही.धानाची खरेदी प्रक्रियेला विलंब, मदतीत उशिर होत असल्याने शेतकरी नागवला जात आहे. धानाच्या पट्ट्यात गोडावूनचा अभाव आहे. धानाचे विक्रमी उत्पादन होत असताना प्रत्येक गावात नव्याने गोडावून निर्माण करण्यात येत नाही. यामुळे अवकाळी पावसाचे आगमन होत असताना या धानाला सुरक्षित उपाय देताना शेतकºयांना कसरत करावी लागत आहे.दरम्यान गावात लोकप्रतिनिधी यांचे विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, सभामंडप आदी वाटप करण्यात येत आहे. एकावर एक सिमेंट रस्ते तयार करण्यात येत असल्याने निधी खर्चाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सभामंंडप बांधकाम उपायोगाविना पडून आहेत. यामुळे धानाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रत्येक गावात ५० हजार पोती सुरक्षित ठेवणे तथा अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गोडावून निर्मितीची ओरड सुरु आहे. शेतशिवारात वर्षभर पिकांची सुरक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांना व उत्पादीत अन्न धान्यांना गावात संरक्षण मिळाले पाहिजे. या गोडावूनची जबाबदारी ग्रामपंचायतींना दिल्यास आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदतीचे ठरणार आहे.राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर असले तरी बारदान्याचा वारंवार तुटवडा निर्माण होत आहे. धानाची वाढती आवक असताना अतिरिक्त बारदाना जलद गतीने उपलब्ध करण्याची गरज आहे.-गंगादास तुरकर, अध्यक्ष, राईस मिल सिहोराधान पट्टा असणाºया या परिसरात गोडावूनचा अभाव आहे. प्रत्येक गावात गोडावून निर्माण केले पाहिजे. शेतकºयांचे उत्पादीत अन्न धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदतीचे होईल.- मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ, सिंदपुरीगोडावून निर्मितीमुळे निश्चितच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीसाठी मदतीचे ठरणार असून शेतकºयांचे धानाला गावातच संरक्षण मिळेल.-वैशाली पटले, सरपंच, देवरी (देव)