शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढण्यासाठी नागरिक शहराकडे धाव घेतात. बँकांच्या संपामुळे एटीएममधील रोख रक्कम लवकरच संपली.

ठळक मुद्देग्राहकांना मनस्ताप : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा फटका, कॅशलेस व्यवहारही अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेतन पुनर्रचनेसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार व शनिवारी संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर बँकीग व्यवस्था ठप्प असल्याने एटीएममध्येही रोकडचा ठणठणाट झाला. परिणामी शहरासह ग्रामीण भागात एटीएममध्ये रक्कम नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या ५० पेक्षा जास्त एटीएम आहेत. शुक्रवारपासून बँकांचे अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या आवाहनावरुन संपावर गेल्याने बँक उघडल्या नाहीत. परिणामी रोकड काढण्यासाठी बहूतांश नागरिकांनी एटीएमचा पर्याय निवडला. शुक्रवारीच एटीएममधील रोकड संपली. परिणामी ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त आलेल्या शेकडो ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. बहूतांश जणांना संप असल्याची माहिती नसल्याने आल्यापावली परत जावे लागले.जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढण्यासाठी नागरिक शहराकडे धाव घेतात. बँकांच्या संपामुळे एटीएममधील रोख रक्कम लवकरच संपली. अशास्थितीत ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम शोभेची वास्तु ठरले. शुक्रवार व शनिवार बँकेचा संप तर रविवारी शासकीय सुटी असल्याने एटीएममध्ये रोकड घालता आली नाही. परिणामी याचाही फटका नागरिकांनाच बसला.विशेषत: अतिआवश्यक कामांसाठी शहरात आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. यात वृध्दांची मोठ्या प्रमाणात परवड झाली. ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या वृध्दांची संपाची माहिती नसल्याने बँकाच्या पायरीवर बसून बँक उघडण्याची वाट पाहू लागले. मात्र संप असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांची निराशा झाली. त्यांनाही येण्या-जाण्याचा शारीरिक त्रास तर झालाच याशिवाय आर्थिक भुर्दंडही बसला.तांत्रिक अडचणींचा फटकाएकीकडे केंद्र शासन कॅशलेस व्यवहारावर भर देण्याचा प्रयत्न करीत असले तरी अनेक व्यवहार रोख पध्दतीने करण्यात येतात. एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट असतांना अनेकांनी कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला. मात्र त्यातही इंटरनेट कनेक्टीव्हीटी या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागले. पेट्रोलपंप, व्यापारी प्रतिष्ठान यासह अन्य ठिकाणी एटीएम कार्ड वापरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही वाईट अनुभव आले. अनेक ठिकाणी रेंज नसल्याने व्यवहार होवू शकले नाहीत. परिणामी रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तांत्रिक अडचणींअभावी अनेकांची कामे खोळंबली होती.‘आऊट ऑफ सर्व्हिस’अनेकांना संप असल्याचे माहित नसल्याने ग्राहक आल्यापावली परतले. तर एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने अनेक मशीनमध्ये आऊट आॅफ सर्व्हिस असा संदेश झळकत होता. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी गॅलरी मधील सूविधाही फेल ठरल्याची दिसून आली.

टॅग्स :atmएटीएम