शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढण्यासाठी नागरिक शहराकडे धाव घेतात. बँकांच्या संपामुळे एटीएममधील रोख रक्कम लवकरच संपली.

ठळक मुद्देग्राहकांना मनस्ताप : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा फटका, कॅशलेस व्यवहारही अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेतन पुनर्रचनेसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार व शनिवारी संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर बँकीग व्यवस्था ठप्प असल्याने एटीएममध्येही रोकडचा ठणठणाट झाला. परिणामी शहरासह ग्रामीण भागात एटीएममध्ये रक्कम नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या ५० पेक्षा जास्त एटीएम आहेत. शुक्रवारपासून बँकांचे अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या आवाहनावरुन संपावर गेल्याने बँक उघडल्या नाहीत. परिणामी रोकड काढण्यासाठी बहूतांश नागरिकांनी एटीएमचा पर्याय निवडला. शुक्रवारीच एटीएममधील रोकड संपली. परिणामी ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त आलेल्या शेकडो ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. बहूतांश जणांना संप असल्याची माहिती नसल्याने आल्यापावली परत जावे लागले.जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढण्यासाठी नागरिक शहराकडे धाव घेतात. बँकांच्या संपामुळे एटीएममधील रोख रक्कम लवकरच संपली. अशास्थितीत ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम शोभेची वास्तु ठरले. शुक्रवार व शनिवार बँकेचा संप तर रविवारी शासकीय सुटी असल्याने एटीएममध्ये रोकड घालता आली नाही. परिणामी याचाही फटका नागरिकांनाच बसला.विशेषत: अतिआवश्यक कामांसाठी शहरात आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. यात वृध्दांची मोठ्या प्रमाणात परवड झाली. ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या वृध्दांची संपाची माहिती नसल्याने बँकाच्या पायरीवर बसून बँक उघडण्याची वाट पाहू लागले. मात्र संप असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांची निराशा झाली. त्यांनाही येण्या-जाण्याचा शारीरिक त्रास तर झालाच याशिवाय आर्थिक भुर्दंडही बसला.तांत्रिक अडचणींचा फटकाएकीकडे केंद्र शासन कॅशलेस व्यवहारावर भर देण्याचा प्रयत्न करीत असले तरी अनेक व्यवहार रोख पध्दतीने करण्यात येतात. एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट असतांना अनेकांनी कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला. मात्र त्यातही इंटरनेट कनेक्टीव्हीटी या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागले. पेट्रोलपंप, व्यापारी प्रतिष्ठान यासह अन्य ठिकाणी एटीएम कार्ड वापरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही वाईट अनुभव आले. अनेक ठिकाणी रेंज नसल्याने व्यवहार होवू शकले नाहीत. परिणामी रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तांत्रिक अडचणींअभावी अनेकांची कामे खोळंबली होती.‘आऊट ऑफ सर्व्हिस’अनेकांना संप असल्याचे माहित नसल्याने ग्राहक आल्यापावली परतले. तर एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने अनेक मशीनमध्ये आऊट आॅफ सर्व्हिस असा संदेश झळकत होता. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी गॅलरी मधील सूविधाही फेल ठरल्याची दिसून आली.

टॅग्स :atmएटीएम