शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

मानसिक गुलामगिरीतून मुक्तता ही धर्मांतराची फलश्रुती

By admin | Updated: October 21, 2016 00:40 IST

ज्यांना समानता नको होती त्यांनीच षडयंत्राने बुद्धाचा धम्म नष्ट करून विषमता निर्माण केली.

सार्वजनिक वाचनालयात कार्यक़्रम : भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादनभंडारा : ज्यांना समानता नको होती त्यांनीच षडयंत्राने बुद्धाचा धम्म नष्ट करून विषमता निर्माण केली. शेकडो वर्षाच्या विकृत मुल्यव्यवस्थेमुळे अत्याचाराविषयी संवेदनाही जाती-जातीय विभागली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या मध्यम मार्गाने धम्मक्रांती करून केले आहे. मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालो, याचे आत्मभान होऊन स्वाभिमानाने जीवन जगणे ही धर्मांतराची सर्वात मोठी फलश्रुती आहे, असे मौलिक विचार प्रसिद्ध अर्थतज्ञ, विचारवंत व भारत सरकारच्या नियोजन आयोग व राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते धम्मचक्र प्रवर्तन एक दृष्टीक्षेप या विषयावर सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष राजरत्न कुंभारे होते. विचारमंचावर अमृत बन्सोड, डी.एफ. कोचे, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, रूपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, जिया पटेल यांची उपस्थिती होती. मुणगेकर म्हणाले की, अन्यायाच्या विरोधात बंड करणे ही न्यायाची सुरूवात असते. हे कार्लाईलचे तत्वज्ञान बाबासाहेबांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून सिद्ध केले. देशात कठोर जातीयतेचे युग सुरू झाले. परंतु इतकी अमानुष व भयावह जातीव्यवस्था असतानाही भारतात क्रांती झाली नाही. जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेने सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेचे भयावह विषम वाटप केले. या धर्मांतरानंतर नवीन संस्कार, नवीन मूल्य आणि नवीन संस्कृती निर्माण झाली. मागील हजार दीड हजार वर्षातील भारताच्या एकूणच समाज रचनेच्या पार्श्वभूमिवर विचार केला तर भारताची राज्यघटना म्हणजे अनेक अर्थाने भारतात झालेली उदारमतवादी क्रांतीच आहे. आपण सर्वांनी कोपर्डी घटनेचा निषेध करून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीचे समर्थन करावे.समाजात, आपण जे पाहिलं नाही त्यावर जास्त विश्वास आणि जे प्रत्यक्षात पाहिले त्यावर कमी विश्वास अशी प्रवृत्ती आहे. जाती व्यवस्था नष्ट झाल्यास आरक्षणही नष्ट होईल. अ‍ॅट्रासिटी कायदा रद्द करण्याची मुळीच गरज नाही. ते संरक्षण कवच आहे. अ‍ॅट्रासिटी कायदा असताना इतके मोठे गुन्हे घडतात तर नसताना किती गुन्हे घडतील, अनुसूचित जातींना १९५० पूर्वीचे पुरावे मागणारा जात पडताळणीचा जाचक अटी असलेला कायदा रद्द झाला पाहिजे आदी विषयावरही परखड विचार मांडले. यावेळी त्यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अमृत बन्सोड, डी.एफ. कोचे, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, रूपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, गुलशन गजभिये, संजय बन्सोड, असित बागडे, आहुजा डोंगरे, डॉ. के.एल. देशपांडे, प्रा. मोरेश्वर गेडाम, आनंद गजभिये, आदिनाथ नागदेवे, अरुण अंबादे, एम. डब्ल्यु. दहिवले, गौतम कावळे, मायाताई उके, सीमाताई बन्सोड, लता करवाडे, पुष्पाताई मेश्राम, डॉ. भैय्यालाल गजभिये, वर्षाताई गोस्वामी, शकुंतला गजभिये आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)