शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

मानसिक गुलामगिरीतून मुक्तता ही धर्मांतराची फलश्रुती

By admin | Updated: October 21, 2016 00:40 IST

ज्यांना समानता नको होती त्यांनीच षडयंत्राने बुद्धाचा धम्म नष्ट करून विषमता निर्माण केली.

सार्वजनिक वाचनालयात कार्यक़्रम : भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादनभंडारा : ज्यांना समानता नको होती त्यांनीच षडयंत्राने बुद्धाचा धम्म नष्ट करून विषमता निर्माण केली. शेकडो वर्षाच्या विकृत मुल्यव्यवस्थेमुळे अत्याचाराविषयी संवेदनाही जाती-जातीय विभागली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या मध्यम मार्गाने धम्मक्रांती करून केले आहे. मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालो, याचे आत्मभान होऊन स्वाभिमानाने जीवन जगणे ही धर्मांतराची सर्वात मोठी फलश्रुती आहे, असे मौलिक विचार प्रसिद्ध अर्थतज्ञ, विचारवंत व भारत सरकारच्या नियोजन आयोग व राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते धम्मचक्र प्रवर्तन एक दृष्टीक्षेप या विषयावर सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष राजरत्न कुंभारे होते. विचारमंचावर अमृत बन्सोड, डी.एफ. कोचे, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, रूपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, जिया पटेल यांची उपस्थिती होती. मुणगेकर म्हणाले की, अन्यायाच्या विरोधात बंड करणे ही न्यायाची सुरूवात असते. हे कार्लाईलचे तत्वज्ञान बाबासाहेबांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून सिद्ध केले. देशात कठोर जातीयतेचे युग सुरू झाले. परंतु इतकी अमानुष व भयावह जातीव्यवस्था असतानाही भारतात क्रांती झाली नाही. जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेने सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेचे भयावह विषम वाटप केले. या धर्मांतरानंतर नवीन संस्कार, नवीन मूल्य आणि नवीन संस्कृती निर्माण झाली. मागील हजार दीड हजार वर्षातील भारताच्या एकूणच समाज रचनेच्या पार्श्वभूमिवर विचार केला तर भारताची राज्यघटना म्हणजे अनेक अर्थाने भारतात झालेली उदारमतवादी क्रांतीच आहे. आपण सर्वांनी कोपर्डी घटनेचा निषेध करून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीचे समर्थन करावे.समाजात, आपण जे पाहिलं नाही त्यावर जास्त विश्वास आणि जे प्रत्यक्षात पाहिले त्यावर कमी विश्वास अशी प्रवृत्ती आहे. जाती व्यवस्था नष्ट झाल्यास आरक्षणही नष्ट होईल. अ‍ॅट्रासिटी कायदा रद्द करण्याची मुळीच गरज नाही. ते संरक्षण कवच आहे. अ‍ॅट्रासिटी कायदा असताना इतके मोठे गुन्हे घडतात तर नसताना किती गुन्हे घडतील, अनुसूचित जातींना १९५० पूर्वीचे पुरावे मागणारा जात पडताळणीचा जाचक अटी असलेला कायदा रद्द झाला पाहिजे आदी विषयावरही परखड विचार मांडले. यावेळी त्यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अमृत बन्सोड, डी.एफ. कोचे, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, रूपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, गुलशन गजभिये, संजय बन्सोड, असित बागडे, आहुजा डोंगरे, डॉ. के.एल. देशपांडे, प्रा. मोरेश्वर गेडाम, आनंद गजभिये, आदिनाथ नागदेवे, अरुण अंबादे, एम. डब्ल्यु. दहिवले, गौतम कावळे, मायाताई उके, सीमाताई बन्सोड, लता करवाडे, पुष्पाताई मेश्राम, डॉ. भैय्यालाल गजभिये, वर्षाताई गोस्वामी, शकुंतला गजभिये आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)