शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

चौरास भागाचा वाळवंट होणार

By admin | Updated: March 14, 2016 00:31 IST

पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात पाण्याची पातळी खोल गेली आहे.

जलस्तरात घट : जमिनीतील भूमिगत प्रवाह बंद, उपाययोजनांसाठी पुढाकारांची गरजचरणदास बावणे कोंढा (कोसरा)पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात पाण्याची पातळी खोल गेली आहे. गोसे प्रकल्पाचे बांधकाम करताना भूमीगत प्रवाह बंद केल्याने उन्हाळ्यात हिरवागार दिसणारा परिसर सध्या दिसत नाही. चौरासचे भागाचे वाळवंट होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.चौरास भागात वाहत जाणाऱ्या भूमीगत प्रवाहाला तत्कालीन लोकप्रतिनिधी विलासराव शृंगारपवार यांनी प्रवाह बंद करण्यात येवू नये अशी मागणी सतत लावून धरली होती. भूमीगत प्रवाह बंद करावयाचे असेल तर आधी गोसे प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होऊ द्या, तसेच दोन्ही कालव्यात पाणी सुरु झाल्यानंतर प्रवाह बंद करण्यात यावे, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत भूमीगत प्रवाह बंद केले. सन २००१ पासून चार वर्षे हे काम चालले. भूमीगत पात्रात 'डायप्राय वॉल' बेन्टोनाईट माती व सिमेंट घालून कायमचा प्रवाह बंद केला. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी भूमीगत प्रवाह बंद केल्यास चौरास भागातील पाण्याची पातळी कमी होईल आणि भविष्यात चौरास भागाचा वाळवंट होईल, असा इशारा दिला होता. परंतु याकडे लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम सध्या दिसत आहे. १५ वर्षाचा कालावधी झाला. या काळात चौरास भागाचा जलस्तर कमी झाला आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या ३०० ते ४०० मीटर बोअर करून देखील विहिरीला पाणी मिळत नाही. गोसे प्रकल्पाचे काम तसेच मुख्य दोन कालव्याचे काम झाल्यानंतर डाव्या, उजव्या कालव्यात पाणी सोडल्यानंतर भूमीगत प्रवाह बंद केले असते तर, चौरास भागात आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. ५ एकर शेती असलेले शेतकरी उन्हाळी धानपिक घेताना विहिरीचे पाणी किती जमिनीला होईल याचा विचार करूनच उन्हाळी लागवड सध्या करीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात हिरवेगार दिसणारा चौरास भाग सध्या वाळवंटासारखा ओसाड दिसत आहे. उन्हाळी धान लागवडीचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. भविष्यात हेही प्रमाण कमी होऊ शकते. वर्षातून तीन पिके घेणारे शेतकरी सध्या दोन पिक घेण्यास मागेपुढे पाहत आहेत. चौरासचा जलस्तर घसरला आहे. हे सध्या सिंचन विभागाचे अधिकारी देखील मान्य करतात. चौरास भागातून गोसे प्रकल्पाचा डावा कालवा जात आहे. त्याचे काम १५ वर्षापासून पूर्ण होत नाही. ही एक शोकांतिका आहे. डाव्या कालव्यात बाराही महिने पाणी सोडले तर चौरास भागातील पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. सिंचन विभागाचे अधिकारी व मोठे कंत्राटदार यांचे हात या कालव्याच्या कामात गुंतले आहेत. कोणी कंत्राटदार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऐकत नाही. सध्या मंत्री, आमदार यांचे देखील डाव्या कालव्याच्या कामात कंत्राटदार म्हणून काम करीत असल्याची ओरड आहे. त्यामुळे देखील अधिकारी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असावे असे बोलले जात आहे. पण सध्या चौरास भागाचा वाळवंट होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी समोर येऊन गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.