शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

चार वर्षात शेतकरी हिताचा एकही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:50 IST

चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

ठळक मुद्देरघुनाथदादा पाटील : शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा भंडाऱ्यात पोहचली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.शहिदांना अभिवादन आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढण्यात आलेली शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा मंगळवारला भंडाऱ्यात पोहोचली. त्यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यातील विविध ४० शेतकरी संघटनांनी सुकानु समिती स्थापन केली. त्यानंतर १९ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून राज्यव्यापी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ही शेतकरी जागृती यात्रा कोकण, मुंबई, कर्नाटक, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भासह आतापर्यंत १६ जिल्ह्यात पोहोचली असून राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शहीद संबोधून शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक मोबदला देण्याची गरज आहे. असे असताना कृषी मूल्य आयोग लागवड खर्चाच्या आधारावर समर्थन मूल्य देत नाही. स्वामीनाथन आयोगाने आपल्या अहवालात ही शिफारस केली आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेने आता जनतेच्याच न्यायालयात आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे.पाटील म्हणाले, निर्यातबंदी आणि संघटित गुन्हेगारी या समस्यांमुळे राज्यातील गरीब शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हितासाठी आवाज उचलणारे सभागृहात मौन धारण करून राहतात. काँग्रेसने जे केले तेच भाजपही करीत असल्याचा आरोप पाटिल यांनी केला. पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा किसान संघटनेचे गणेशकाका जगताप, सत्यशोधक किसान सभेचे किशोर ढमाले, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, ऊस कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आनंद भालेकर व पदाधिकारी उपस्थित होते.