शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

चार वर्षात शेतकरी हिताचा एकही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:50 IST

चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

ठळक मुद्देरघुनाथदादा पाटील : शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा भंडाऱ्यात पोहचली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.शहिदांना अभिवादन आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढण्यात आलेली शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा मंगळवारला भंडाऱ्यात पोहोचली. त्यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यातील विविध ४० शेतकरी संघटनांनी सुकानु समिती स्थापन केली. त्यानंतर १९ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून राज्यव्यापी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ही शेतकरी जागृती यात्रा कोकण, मुंबई, कर्नाटक, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भासह आतापर्यंत १६ जिल्ह्यात पोहोचली असून राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शहीद संबोधून शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक मोबदला देण्याची गरज आहे. असे असताना कृषी मूल्य आयोग लागवड खर्चाच्या आधारावर समर्थन मूल्य देत नाही. स्वामीनाथन आयोगाने आपल्या अहवालात ही शिफारस केली आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेने आता जनतेच्याच न्यायालयात आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे.पाटील म्हणाले, निर्यातबंदी आणि संघटित गुन्हेगारी या समस्यांमुळे राज्यातील गरीब शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हितासाठी आवाज उचलणारे सभागृहात मौन धारण करून राहतात. काँग्रेसने जे केले तेच भाजपही करीत असल्याचा आरोप पाटिल यांनी केला. पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा किसान संघटनेचे गणेशकाका जगताप, सत्यशोधक किसान सभेचे किशोर ढमाले, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, ऊस कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आनंद भालेकर व पदाधिकारी उपस्थित होते.