शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:44 IST

तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे. रविवारला उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली.

ठळक मुद्देउपोषणाचा तिसरा दिवस : प्रकरण अशोक लेलँड कारखान्याच्या अतिक्रमणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे. रविवारला उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली. अद्यापही अधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरविल्यामुळे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.सरपंच अनिता शेंडे, दुर्गा मेश्राम, रेखा वासनिक, अनुसया नागदेवे असे प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्या महिलांची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत राजेगाव अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा (रिठी) गावातील जमीनीवर अशोक लेलँड कारखान्याने अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले. ते अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने देवून चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. परंतु कारवाई करण्यात आली नाही. कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी, सरपंच अनिता शेंडे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी कारखान्याचे अरविंद बोरडकर यांच्याविरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी. कारखान्यासमोर प्रजासत्ताकदिनी करण्यात आलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यात यावे यासह अन्य मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत. सरपंचासह अन्य १३ जणांनी १ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. यात प्रकृती खालावलेल्या महिलांसह हिवराज शेंडे, प्रणय झंझाड, अनुप शेंडे, छत्रपती सार्वे, आनंदराव गंथाडे, अमरदीप गणवीर, विशाल रामटेके, धर्मेंद्र सुखदेवे, तुकाराम झलके यांचा समावेश आहे.