शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

चार दिवसानंतरही आढळला नाही मृतदेह

By admin | Updated: September 17, 2016 00:52 IST

कान्हळगाव (मुंढरी) येथील शेतकरी ईस्तारी साधु शेंडे १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान

प्रकरण कान्हळगावातील : आपातकालीन यंत्रणेची मोहीम थंडबस्त्यातकरडी (पालोरा) : कान्हळगाव (मुंढरी) येथील शेतकरी ईस्तारी साधु शेंडे १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान गावाकडे पतर येतअसतांना वैनगंगेला अचानक आलेल्या पुरात वाहून गेला. घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटूनही त्यांचा मृतदेह अजुनही तपास यंत्रणेला आढळला नाही. दुसरीकडे आपातकालीन यंत्रणेची शोध थंड पडल्याचा आरोप उपसरपंच दिगांबर कुकडे यांचा असून गावात आक्रोश व्यक्त होत आहे.कान्हळगाव येथील इस्तारी पुरात वाहून गेल्याची माहिती होताच करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे, मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी गावात भेट घेवून तत्काळ मदतीचे आश्वासन दिले होते. शोध मोहिमेसाठी दोन डोंगे व भंडारा येथून एक विशेष बोट बोलविण्यात आली होती. दोन दिवसांपर्यंत कसून शोध घेण्यात आला. भंडारा तालुक्यातील खमारी, भंडारा पर्यंत चमू पोहचली. मात्र, मृतदेह आढळला नसल्याने निराशा पदरी पडली. त्यानंतर मात्र प्रशासनाने मृतदेह फुलल्यानंतर वर येईपर्यंत वाट पाहण्याचे धोरण स्विकारले. शोध मोहिम थंडबस्त्यात ठेवण्यात आली. ती आजही कायम आहे. आपातकालीन यंत्रणेच्या लापरवाहीमुळेच मृतदेह आढळला नसल्याची ओरड कान्हळगाव वासीयातून व्यक्त होत आहे. प्रशासन यासाठी दोषी असल्याचा आरोप उपसरपंच दिगांबर कुकडे यांनी केला आहे. आमदार चरण वाघमारे यांनी शेंडे कुटूंबियाची भेट घेवून धिर दिला. मदतीचे आश्वासन दिले. पंरतू मृतदेह सापडला नसल्याने पुढे मिळणारी मदत होणार नाही, कुटूंबाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मृतदेहाचा शोध घेण्याची मागणी कुटूंबीयांनी केली आहे. एका हाडामासाच्या माणसाचा जीव जातो, अन् प्रशासन गंभीर नाही का? असा सवाल एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांना विचारल्यास कदाचित त्यांचे रक्त खवळेलही, परंतु ज्या रक्तातील नातेवाईकांचा घरच्या माणसावर नैसर्गिक आपदा आली त्यांची मनस्थिती काय असेल, याचा विचार करणे गरजचे आहे. (वार्ताहर)