शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

बावनथडी भूमीगत वितरिकेकरिता चार कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:48 IST

बावनथडी प्रकल्पांतर्गत तुमसर - देव्हाडी मार्गावर भूमीगत कालव्याचे कामे सुरु आहे. एक कि.मी. कालव्यावरील चार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. शहराजवळ जमिनीचा भाव जास्त असल्याने शासनाने भूमीगत कालवा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रकल्प वितरिकेकरिता जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.

ठळक मुद्देमहाकाय पाईपलाईनचा उपयोग : जमिनीचा बाजारभाव जास्त असल्याने निर्णय

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पांतर्गत तुमसर - देव्हाडी मार्गावर भूमीगत कालव्याचे कामे सुरु आहे. एक कि.मी. कालव्यावरील चार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. शहराजवळ जमिनीचा भाव जास्त असल्याने शासनाने भूमीगत कालवा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रकल्प वितरिकेकरिता जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन ३५ वर्षे झाली. प्रकल्पाच्या पुर्णत्वाची माहिती देत असली तरी वितरीकेची कामे अपूर्णच आहेत. २३ कोटींचा प्रकल्पाची किंमत ७५० कोटी इतकी झाली. तुमसर शहराजवळून मुख्य वितरिका बोरीकडे जात आहे. तुमसर - देव्हाडी मार्गाजवळ भूमीगत वितरिकेची कामे सुरु आहे. महाकाय पाईप लाईन येथे टाकण्यात आली. एक ते सव्वा कि.मी. लांब पाईप लाईन भूमीगत घालण्यात आली. याकरिता तीन मोठ्या विहिरी समान खोल खड्डा (सिमेंट काँक्रीट) तयार करण्यात आला.तुमसर शहराजवळ शेतीची किंमत जास्त आहे. बाजारभावाने शासन येथे भाव देण्यास असमर्थ आहे. नियमानुसार जमिनीखाली चार फुटानंतर मालकी शासनाची असते. त्याचा आधार घेऊन शासनाने भूमीगत वितरिकेची कामे केली अशी माहिती आहे. संबंधित शेतकºयाचे शेत येथे जेसीबीने खोदून नंतर माती समतल केली. मिनी लिफ्टची कामात त्याचा समावेश होतो. जमिनीखालून पाईप लाईनने पाणी विहिरीसारख्या खड्ड्यात जाईल त्यानंतर पाईपलाईनने ते पुढे नेले जाणार आहे.शासनाने प्रकल्प पूर्णत्वाकरिता पुढील वर्षीची डेडलाईन दिली आहे. त्या अनुषंगाने सर्व कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. बावनथडी प्रकल्पाकरिता शेकडो शेतकºयांनी जमिनी दिल्या त्या शेतकºयांना अजूनपर्यंत मोबदला मिळाला नाही. यापुढे शेतकरी प्रकल्पाला विरोध करतील तर भूमीगत कालवा शासन तयार करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.१२ गावांना सिंचनाचा लाभ नाहीगोबरवाही परिसरातील १२ गावे ही उंचावर आहेत. त्यामुळे पाणी पोहचत नाही अशी तांत्रिक अडचण सांगितली जात आहे. तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी लिफ्टची सोय ही एक पर्यायी व्यवस्था आहे. परंतु त्याचा अभ्या ससुरु असल्याचे समजते. १२ गावांकरिता भूमीगत कालवे तयार करता येत नाही काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.तुमसर देव्हाडी मार्गावर भूमीगत वितरिका तयार करण्यात येत आहे. येथील शेती बाजारभावाप्रमाणे खरेदी करणे शासनाला परवडणारे नाही. शासनाने नियमानुसार वितरिकेची कामांना मंजुरी दिली. उर्वरीत शेतकऱ्यांना मोबदला देणे सुरु आहे.-पी.व्ही.वाघमोडे, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसरभूमीगत कालव्याकरिता कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. परंतु जमिनी स्वमर्जीने दिल्या. त्यांना मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. हे न्यायसंगत नाही. गोबरवाही क्षेत्रातील १२ गावांची तांत्रिक अडचण पुढे करण्यात येत आहे. सिंचनापासून गावे वंचित राहता कामा नये.-डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते, तुमसर.