शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वरठीत एकाच रात्री चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:08 IST

कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केली. सदर घटना गुरूवारी रात्री वरठीतील नेहरू वॉर्डात घडली. एकाच गल्लीतील चार घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरटांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केली. सदर घटना गुरूवारी रात्री वरठीतील नेहरू वॉर्डात घडली. एकाच गल्लीतील चार घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरटांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तीन घरात प्रवेश करण्यात चोरांना यश मिळाले तर चौथ्या ठिकाणी अपयश लाभले. चारही घराचे घरमालक बाहेरगावी असल्यामुळे या घटनेत किती नुकसान झाले याची माहिती मिळाली नाही.सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. मुलांना सुटी असल्यामुळे बाहेर गावी जातात. याचा नेमका फायदा घेत चोरांनी कुलूप बंद घरांना लक्ष्य केले. नेहरू वाडार्तील एकाच गल्लीतील चार घरांना फोडण्यात आले. तीन घराचे समोरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील आलमारी फोडून सामानाची नासधूस केली. आलमारीतील नेमके कोणते साहित्य चोरीला गेले याची माहिती मिळू शकली नाही. यात सुमन ढवळे , पंकज प्रजापती, व ताराचंद कलंबे यांच्या घरी चोरांनी चोरी केली. दिलीप बावनकुळे यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले. पण दरवाज्याला असलेले सेन्टर लॉक तोडता न आल्याने त्यांना घरात शिरता आले नाही. सुमन ढवळे व त्यांचे भाडेकरू यांचे घरातील आलमारीचे कुलूप तोडण्यात आले होते. आलमारीतील साहित्य बाहेर फेकण्यात आले होते. आलमारीचे लॉकर उघडलेले होते. सामाजिक कार्यकर्ते चेतन डांगरे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी पंचनामा केला. यात चोरटे हे सराईत नसावे असा अंदाज व्यक्त केला आहे. घराचे कुलूप सराईत गुन्हेगाराप्रमाणे शिताफीने उघडलेले नव्हते. कुलूप तोडताना लोखंडी साधनांचा वापर करून तोडल्याचे निदर्शनास आले. घरमालकच उपस्थित नसल्याने पोलिसांना तपासात अडचण निर्माण होत आहे.खबरदारी घेण्याचे आवाहनबाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबीयांनी घराची योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी केले आहे. सध्या लग्न समारंभाचा हंगाम सुरु असल्यामुळे बाहेर गावी जाणाºयांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडतात. कुटुंबीयांनी घराच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन पोलीस ठाण्यात नोंद करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.