गोंदिया : आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना कटंगी व आदर्श सामूहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या वेळी डॉ. एन.डी. किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनात सामूहिक विवाह सोहळे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे साधन असल्याचे सांगितले.सदर समिती व संघटना मागील १७ वर्षांपासून आदिवासी सामूहिक विवाह सोहळे संस्थापक डॉ. एन.डी. किरसान यांच्या मार्गदर्शनात सतत घेण्यात येत आहेत. यावर्षी ३० जोडप्यांना विवाहबद्ध करण्यात आले. या सोहळ्यामुळे गोरेगाव येथे जत्रेचे स्वरूप आले होते. समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे ३० जोडप्यांना हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत विवाहबद्ध करण्यात आले. या वेळी अतिथी म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, खा. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले, माजी आ. रामरतन राऊत, खोमेश रहांगडाले, माजी जि.प. अध्यक्ष टोलसिंग पवार, माजी जि.प. सभापती पी.जी. कटरे, श्रावण राणा, माजी पं.स. सभापती झामसिंग बघेले, अमर वऱ्हाडे, लक्ष्मीकांत बारेवार, कुसन घासले, विशाल शेंडे, किसन मानकर, ओ.एस. जमदाळ, मीना राऊत, सी.टी. चौधरी, आरती चव्हारे, जे.टी. दिहारे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मेळाव्याचे आयोजक डॉ. किरसान यांनी केले. (प्रतिनिधी)वेबसाईटचे मोबाईलवर शुभारंभअखिल भारतीय हलबा-हलबी समाजाच्या वेबसाईटचा मोबाईलवर शुभारंभ खा. नाना पटोले, आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला. ही वेबसाईट पूर्वी फक्त संगणकावर उपलब्ध होती. यानंतर आता ही वेबसाईट मोबाईलवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामूहिक विवाहाच्या स्मरणिकेचे अनावरणसुद्धा करण्यात आले.
सामूहिक विवाह सोहळ्यातून सामाजिक सलोख्याची निर्मिती
By admin | Updated: April 26, 2015 00:38 IST