शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

‘जय’च्या शोधात वनविभागाचा पराजय!

By admin | Updated: September 30, 2016 00:37 IST

उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यातून मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी भंडारा वनविभागाने संपूर्ण जंगल पालथा घातला

स्पेशल ड्राईव्ह ठरले फार्स : शोधमोहिमेला पावसाचा ब्रेकभंडारा : उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यातून मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी भंडारा वनविभागाने संपूर्ण जंगल पालथा घातला परंतु ‘जय’च्या कुठल्याही खाणाखुणा आढळून आलेल्या नाहीत. वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २६ सप्टेंबरपासून तीन ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविण्याचे निर्देश दिले होते. भंडारा वनविभागातील १० ही वनपरिक्षेत्रातील संपूर्ण फौज या ड्राईव्हमध्ये सहभागी झाली होती. यात नाकाडोंगरी, जांब (कांद्री), लेंडेझरी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, अड्याळ आणि भंडारा वनपरिक्षेत्राचा समावेश होता. या दहाही वनपरिक्षेत्रात १० ते १५ चमू तयार करण्यात आले होते. एका चमूत ५ ते ६ जणांचा समावेश करण्यात आला होता. या अभियानातील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘जय’ ची ओळख व्हावी, यासाठी ‘जय’चे छायाचित्र दिले होते. यात अधिकाऱ्यांपासून तर वनमजूर असा कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या चमूकडे जीपीएस मॅपिंग प्रणाली देण्यात आलेली होती. त्यात दररोज किती अंतर फिरले, कोणत्या भागात फिरले, वन्यप्राणी दिसला असेल तिथला अक्षांश व रेखांश घेण्याच्या सूचना होत्या. याचवेळी कोणत्या प्राण्याची विष्ठा सापडली असल्यास आणि झाडावर ओरखडे आढळले असल्यास त्याची नोंद घेण्याचे निर्देश दिले होते. अड्याळ वनपरिक्षेत्रात १३ चमू तयार करण्यात आले होते. प्रत्येक चमूत चार जणांचा समावेश असून या चमू रात्रंदिवस जंगलात गस्त करण्यात आली. वनविभागाने प्रथमच एखाद्या वाघासाठी अशाप्रकारचा ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविण्यात आला होता. ‘जय’मुळे संपूर्ण वनविभाग अस्वस्थ झाला आहे. यात वन्यजीव विभागातील अनेक अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वनविभागाची ही धडपड केवळ औपचारिकता आहे. ‘जय’ सारखा वाघ चार महिने गप्प बसू शकत नाही. मागील चार महिन्यात एकाही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची घटना पुढे आलेली नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी वनविभागातील काही अधिकारी दबक्या आवाजात ते मान्य करीत आहेत. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुणीही स्पष्टपणे बोलण्याचे धाडस करीत नसल्याचे दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) सारवासारव‘जय’ प्रकरणी वनविभागाला टीकेचा सामना करावा लागत आहे. १ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहावर ‘जय’चे सावट राहणार आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाची ही केवळ सारवासारव असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण विदर्भात पाऊस सुरू असून जंगल हिरवेगार झाले आहे. अशा स्थितीत वनअधिकारी आणि कर्मचारी घनदाट जंगलात पायी फिरून खरचं ‘जय’ चा शोध घेणार का, असा या निमित्ताने सवाल उपस्थित केला जात आहे.