शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

अर्धेअधिक घरकुल बांधकामाला वनविभागाची आडकाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये  तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्तांतरित करण्यापूर्वी गट क्र. ४४  मध्ये लोकवस्ती असलेली जमीन वगळणे आवश्यक होते. पण, तसे न करता पूर्ण जमीन हस्तांतरित करण्यात आली.

अशोक पारधी लाेकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यातील ग्रामपंचायत  धानोरी येथे दोन वर्षांपासून मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांपैकी अर्धे अधिक लाभार्थी गावातील जमिनीवर वनविभागाचा ताबा असल्याने योजनेपासून वंचित राहणार की काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. महसूल विभागाच्या ताब्यात असताना आबादी वसुली नंतर ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित झाली. यातून मार्ग काढण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये  तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्तांतरित करण्यापूर्वी गट क्र. ४४  मध्ये लोकवस्ती असलेली जमीन वगळणे आवश्यक होते. पण, तसे न करता पूर्ण जमीन हस्तांतरित करण्यात आली. त्या  जमिनीवर  वनविभागाची नोंद असल्याने लाभार्थींना आवास योजनेचे व स्वखर्चाने घर बांधकाम करण्यास अडथळा होत आहे. वनविभागाची मालकी असलेल्या याच जमिनीवर ग्रामपंचायतीचे कार्यालय, सेवा सहकारी संस्थेचे गोडाऊन, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, मच्छी उत्पादक सहकारी संस्था यांच्या इमारती व साधारणतः ५० ते ५५ नागरिकांची घरे बांधलेली आहेत. मात्र, २०२०-२१ यावर्षी पासून मंजूर झालेले प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल व स्वखर्चाने बांधकाम करू इच्छित असलेल्या नागरिकांना घर बांधकामात वनविभाग आडकाठी टाकत आहे. कित्येक लाभार्थी झोपडीत राहत असल्याने यावर्षी त्यांच्या उपवर मुलं - मुलींचे लग्न होऊ शकले नाही. काही लाभार्थ्यांचे घरकुल अर्धवट असल्याने यावर्षी पावसाळ्यात त्यांनी कुठे आसरा शोधावा हा प्रश्न त्यांचे पुढे आवासून उभा आहे. जमिनीची अडचण दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदन दिले आहे. मात्र, काहीही झाले नाही. दुसरीकडे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. 

अत्यंत गरीब व गरजू लाभार्थींपैकी काहींनी घर बांधायला सुरुवात केली. अर्धवट काम झाले व बांधकाम थांबविण्यात आले. त्यामुळे दुसऱ्यांचे आडोशाला लहान मुलांना सोबत घेऊन  कसेबसे राहावे लागत आहे. पावसाळ्यात अशा स्थितीत राहणे म्हणजे जीविताला धोका आहे. सर्व विभागप्रमुखांनी समन्वय साधून अडचणी दूर कराव्यात. - गीता मंडपे,सरपंच, धानोरी.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाforest departmentवनविभाग