शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

लाभासाठी निराधारांची पायपीट

By admin | Updated: April 24, 2017 00:58 IST

पवनी तालुक्यात हजारो लाभार्थी शासनाच्या निराधारासाठी असलेल्या योजनांचे लाभार्थी आहेत.

सर्व काही मानधनासाठी : आधारकार्डच्या लिंकिंगमुळे बोगस लाभार्थ्यांची पोलखोलचिचाळ : पवनी तालुक्यात हजारो लाभार्थी शासनाच्या निराधारासाठी असलेल्या योजनांचे लाभार्थी आहेत. परंतु या योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या चार- पाच महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांना तहसिल कार्यालय तसेच बँकेत चकरा मारुन थकले असल्याने हजारो लाभार्थी चालकासारखी मानधनाची वाट पाहत आहेत. शासनाने निराधाराची होत असलेली पिळवणूक त्वरित थांबवावी अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत समाजातील निराधार वृध्दासाठी श्रावणबाळ योजना तर परितक्ता विधवा अपंग दुर्धर आजारी वैगेरे स्त्री-पुरुषासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यात श्रावणबाळ व संजय गांधी या योजना राज्यशासनाच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या केंद्र सरकारच्या आहेत. दोन्ही सरकारच्या मिळून या चारही योजनेचे अनुदान न मिळाल्याने रोज बँकेत व तहसिल कार्यालयात चकरा मारुन थकले आहेत. शेकडो लाभार्थ्यांनी अनेकदा तक्रारी प्रतिनिधीकडे मांडतात केंद्र व राज्य शासनाने सर्व योजनासाठी आॅनलाईन प्रणाली लागू केली असून तयात वारवार होणाऱ्या बिघाडामुळे तालुक्यात शेकडो लोकांना अनुदान न मिळाल्यान ते त्रस्त आहेत.सर्व लाभार्थ्यांना डाटा अपडेट करणे सुरु असुन अनेकवेळा मागणी करुन सुध्दा शेकडो लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड सादर न केल्यामुळे तसेच शासनाने प्रत्येक योजनेसाठी आधारकार्ड आवश्यक केल्यामुळे आधारकार्ड सादर न केल्यास लाभार्थ्यांच्या खाते क्रमांक आधार कार्डसोबत लिंक झाली नाही तर अनेक लोकांकडे आदेशपत्र नाही त्यामुळे सदर व्यक्ती कोणत्याच योजनाचा लाभ घेतो हे कळत नाही. तसेच शेकडो जणांनी पती-पत्नी, मुलगा आई सासु सासरे संयुक्त खाते पुस्तक क्रमांक दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार फक्त अठरा वर्षाखालील निराधारासाठी संयुक्त खातेपुस्तक चालते इतरांसाठी नाही. त्याशिवाय एकच व्यक्ती दोन योजनांचा लाभार्थी लाभ घेत असल्याची बाब सुध्दा आधारकार्डमुळे उघडकीला येत असतात.अनुदानाची चौकशी करणाऱ्या व्यकत्ीने सोबत आदेशपत्र आधारकार्ड व नोंदणी केलेले खातेपुस्तक आणावे अशा सुचना देऊनसुध्दा लोक केवळ खाते पुस्तक घेवून येतात नविन लाभार्थ्यानी जे खाते पुस्तक दिले. त्यावर अनुदान पाठविले असता सदर खाते पुस्तक बंद असल्यामुळे अनुदान परत येते म्हणून नविन लाभार्थ्यांची सुरु असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचाच खाते क्रमांक घ्यावा असे आवाहन करण्यात येतात. जनतेच्या प्रश्नाची उत्तरे देताना या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत असून लाभार्थ्यांनी प्रशासनास सहकार्य केल्यास लवकरच सर्व तक्रारी दूर होवून पात्र लाभार्थ्यांना नियमित अनुदान मिळेल, असे सांगण्यात येते. (वार्ताहर)पोस्टातच मानधन द्याग्रामीण लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या डाक कार्यालयातून वृध्दांना मानधन मिळत आहे. त्यामुळे त्यांना १० ते १५ किमी हा त्रास होत नाही. मात्र आता त्या वृध्दांना तुमचे खाती राष्ट्रीय बँकेला जोडण्याचे संबंधीताकडून बोलले जात असल्याने ग्रामीण वृध्दांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ते मानधन पोस्टातूनच देण्यात यावे अशी मागणी होत आहे.