शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

अन्नसुरक्षा योजनेतून गरजूंना अन्नधान्य

By admin | Updated: June 26, 2017 00:29 IST

शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली.

चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : देऊळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली. वंचित राहिलेल्या अत्यंत गरजवंताना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन नव्याने पाच हजार कार्ड तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिली, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.मोहाडी तालुक्यातील देऊळगाव येथे ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पण, स्मशानभूमीचे भूमीपूजन व वनव्यवस्थापन समितीद्वारे महिला गॅस कनेक्शनचे वाटप अशा विविधांगी कार्यक्रम आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्य चंदु पिल्लारे, पंचायत समिती सदस्य जगदीश उके, प्रमेश नलगोपुलवार, तालुका युवा मार्चाचे अध्यक्ष अंकुश समरीत, श्रीकृष्ण जावळकर, सरपंचा प्रिया राहुल, उपसरपंच किशारे मोहनकर, युवा नेते रक्षीत उचिबगले, वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले, क्षेत्रसहाय्यक बावनथळे, वनरक्षक मोहन गटारे, अनिल झंझाड, हाके, सेवक पिल्लारे, माजी सरपंच अंबादास उचिबगले, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर मेश्राम व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार वाघमारे म्हणाले, पुर्वी शासन व्यवस्थेत अनियमितता असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वंचीत राहावे लागत होते. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर गरजवंताना त्यांचा फायदा होणार आहे. त्याकरीता अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातुन शासनाने गरजवंताच्या दारापर्यंत अन्न धान्य पोहचविण्याचे प्रभावी कार्य केल्यामुळेच आज कुणीही उपाशी राहणार नाही. याची काळजी शासनाने घेतली आहे. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पन करण्यात आले. यानंतर रोहयो अंतर्गंत येथील स्मशानभूमी भूमीपूजन व आमदार चरण वाघमारे यांच्या स्थानिक निधी अंतर्गंत बांधलेल्या ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पन व महिलांना गॅस कनेक्सनचे वितरण आ. वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. इंधनासाठी महीलांनी वृक्षतोड न करता गॅसचा नियमित वापर करुन कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष लागवड करण्याचे आवाहन कांद्रीचे वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले यांनी केले. संचालन उपसरपंच किशोर मोहनकर यांनी तर, आभार रक्षीत उचीबगले यांनी मानले.