शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा योजनेतून गरजूंना अन्नधान्य

By admin | Updated: June 26, 2017 00:29 IST

शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली.

चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : देऊळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली. वंचित राहिलेल्या अत्यंत गरजवंताना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन नव्याने पाच हजार कार्ड तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिली, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.मोहाडी तालुक्यातील देऊळगाव येथे ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पण, स्मशानभूमीचे भूमीपूजन व वनव्यवस्थापन समितीद्वारे महिला गॅस कनेक्शनचे वाटप अशा विविधांगी कार्यक्रम आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्य चंदु पिल्लारे, पंचायत समिती सदस्य जगदीश उके, प्रमेश नलगोपुलवार, तालुका युवा मार्चाचे अध्यक्ष अंकुश समरीत, श्रीकृष्ण जावळकर, सरपंचा प्रिया राहुल, उपसरपंच किशारे मोहनकर, युवा नेते रक्षीत उचिबगले, वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले, क्षेत्रसहाय्यक बावनथळे, वनरक्षक मोहन गटारे, अनिल झंझाड, हाके, सेवक पिल्लारे, माजी सरपंच अंबादास उचिबगले, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर मेश्राम व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार वाघमारे म्हणाले, पुर्वी शासन व्यवस्थेत अनियमितता असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वंचीत राहावे लागत होते. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर गरजवंताना त्यांचा फायदा होणार आहे. त्याकरीता अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातुन शासनाने गरजवंताच्या दारापर्यंत अन्न धान्य पोहचविण्याचे प्रभावी कार्य केल्यामुळेच आज कुणीही उपाशी राहणार नाही. याची काळजी शासनाने घेतली आहे. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पन करण्यात आले. यानंतर रोहयो अंतर्गंत येथील स्मशानभूमी भूमीपूजन व आमदार चरण वाघमारे यांच्या स्थानिक निधी अंतर्गंत बांधलेल्या ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पन व महिलांना गॅस कनेक्सनचे वितरण आ. वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. इंधनासाठी महीलांनी वृक्षतोड न करता गॅसचा नियमित वापर करुन कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष लागवड करण्याचे आवाहन कांद्रीचे वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले यांनी केले. संचालन उपसरपंच किशोर मोहनकर यांनी तर, आभार रक्षीत उचीबगले यांनी मानले.