शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक लाभाच्या योजनांवर भर द्या

By admin | Updated: March 20, 2017 00:15 IST

गरीब व सामान्य माणसाच्या विकासाच्या अनेक योजना केंद्र व राज्य सरकार राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु केल्या आहेत.

नाना पटोले : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करा, साकोली-लाखनी पाणीपुरवठा योजना सुरु कराभंडारा : गरीब व सामान्य माणसाच्या विकासाच्या अनेक योजना केंद्र व राज्य सरकार राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु केल्या आहेत. यात वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. अशा सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना खासदार नाना पटोले यांनी दिल्या.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा  खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृह घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यावेळी उपस्थित होते.केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी मिळणारा निधी व त्यासाठीची अंमलबजावणी आदिचा आढावा घेण्यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सांगून पटोले म्हणाले की, भंडारा जिल्हयात आरोग्य, शिक्षण व रोजगार या क्षेत्रात भरीव कार्य करण्याची गरज आहे. येत्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्यात याव्यात. चौदाव्या वित्त आयोगातून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाविण्यपूर्ण योजनेतून ५० शाळा डिजिटल करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. मानव विकास मिशनमधुन आणखी ५० शाळांसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. खासगी शाळांमध्ये गरीबांच्या मुलांना २५ टक्के प्रवेश राखून ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत याची अंलबजावणी शिक्षण विभागांनी करावी आणि ज्या शाळा यांचे पालन करणार नाहीत त्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी असे ते म्हणाले.स्वच्छ भारत मिशन अभियान स्वरुपात राबवावे, शहर व गावांचे घनकचरा व्यवस्थापन योग्य करावे, जिल्हयाचे कृषी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हावे, डिजिटल इंडिया योजनेत शासकीय कर्यालय पेपरलेस करावी अशा सुचना त्यांनी केल्या. भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असुन पाण्याच्या योग्य नियोजनाबरोबरच सर्व विभागांनी पाणी अडविण्याचा आपापला आराखडा तयार करावा असे निर्देश त्यांनी दिले.साकोली-लाखनी साठी असलेली पाणी पुरवठा योजना पुढील आठवड्यात कार्यान्वित करण्याच्या सुचना त्यांनी सबंधित विभागाला दिल्या.राष्ट्रीय पाणलोट योजनेमध्ये वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. गरिबांचे कल्याण या योजनेच्या माध्यमातून साधता येते. पाणलोट अंतर्गत जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना राबवाव्यात. आपण विविध तालुक्यात जनता दरबार घेतले आहेत. जनता दरबारात प्राप्त झालेली सर्व निवेदन त्या त्या विभागाला पाठविण्यात आली असुन त्यावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश खासदारांनी दिले. पाणलोट योजनेचा कृषी विभागाने गाव खेड्यात प्रसार -प्रचार करावा असे त्यांनी सांगीतले.गरीब कुटुंबातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु करण्यात आली असुन या योजनेतून एकही कुटुंब सूटता कामा नये असे त्यांनी सांगितले. पिक विम्याबाबत अनेक तक्रारी असुन विमा कंपनीची बैठक घेण्यात येऊन त्यांना आढावा घ्यावा, अशा सुचना त्यांनी केल्या. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सुरक्षा सहाय्य कार्यक्रम,  प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ), राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भूमी अभिलेख व्यवस्थापन कार्यक्रम, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, शामाप्रसाद मुखर्जी रुअर्बन मिशन, राष्ट्रीय वारसा शहरी विकास आणि संवर्धन योजना, अटल नविनीकरण शहर परिवर्तन योजना, स्मार्ट शहर योजना, उज्जवल डिस्कॉम एश्योरेंश योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ अभियान,एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री उजाला योजना, प्रधानमंत्री कुशल विकास योजना, जल मार्ग विकास प्रकल्प, डिजीटल इंडिया या सर्व केंद्र पुरस्कृत योजनांचा माहे फेब्रुवारी २०१७ अखेरचा भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सर्व खाते प्रमुख व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी या सभेला उपस्थित होते. (प्रतिनिधी)