शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

जेएमसी कंपनीच्यावतीने काम केले जात आहे. लाखनी लगतच्या मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुरमाडी नाल्यावर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे ३.४५ वाजता पुलाच्या काँक्रीट भरावाचे काम सुरु असताना एका बाजूचा स्लॅब कोसळला. त्यामुळे खळबळ उडाली. यावेळी तीन कामगार काम करीत होते. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही.

ठळक मुद्देलाखनीतील घटना : मोठा अनर्थ टळला, निर्माणाधीन पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी येथे निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपूलाचा स्लॅब गुरुवारी पहाटे कोसळला. पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र तीन कामगार किरकोळ जखमी झाले. स्लॅब कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुंबई - कोलकात्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी येथे उड्डाणपूलाचे काम गत दीड वर्षांपासून सुरु आहे. जेएमसी कंपनीच्यावतीने काम केले जात आहे. लाखनी लगतच्या मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुरमाडी नाल्यावर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे ३.४५ वाजता पुलाच्या काँक्रीट भरावाचे काम सुरु असताना एका बाजूचा स्लॅब कोसळला. त्यामुळे खळबळ उडाली. यावेळी तीन कामगार काम करीत होते. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेथेच प्राथमिक उपचार करण्यात आले. .लाखनी येथील केसलवाडा फाटा व पोलीस ठाण्याजवळ काम उड्डाणपुलाचे काम केले जात आहे. त्याअंतर्गत मुरमाडी नाल्याच्या दोन्ही बाजूला पूल तयार करण्याचे काम सुरु आहे.मुरमाडी स्मशानभूमीच्या बाजूला पुलाचे काम सुरु असतांना अचानक स्लॅब पडल्याने कंपनीचे नुकसान झाले.सदर बांधकाम कंपनीच्या कामावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सदर अपघाताच्यावेळी कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी मोठी घटना घडण्याची यापुढे शक्यता नाकारता येत नाही.वाहतूक विस्कळीतलाखनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूलाचे काम संथगतीने सुरु आहे. रस्त्याच्या मधोमध पिल्लर उभारले असून रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य ठेवले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून याठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. पंरतु अतिव्यस्त राष्ट्रीय महामार्गावरुन अहोरात्र वाहने धावत असतात. त्यामुळे शहरात वाहतूकीची कोंडी होते. तासन्तास वाहनाची लांब रांग लागलेली असते. याचा फटका बसत आहे. अपघाताची कायम भीती आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणखी येथे उपाययोजना करण्याची गरज आहे.