शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

उड्डाणपूल भरावातील फ्लायअ‍ॅशला पाण्याचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST

मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअ‍ॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअ‍ॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही.

ठळक मुद्देदेव्हाडी येथील उड्डाणपूल : संथगतीमुळे प्रवाशांना फटका, जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअ‍ॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअ‍ॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही. येथे कंत्राटदार व संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे.देव्हाडी येथे तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर उड्डानपुलाचे काम मागील चार वर्षापासून संथगतीने सुरु आहे. गोंदिया व तुमसर मार्गावर अ‍ॅप्रोच रस्ता तयार केला जात आहे. येथे अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अ‍ॅशचा वापर भरावाकरिता केला जात आहे. पीठासारखी अ‍ॅश ट्रकमधून सरावाकरिता घालतांना मोठा धुराळा उडतो. रेल्वे फाटकाजवळ शेवटचा भराव करतांना कंत्राटदाराने पाण्याचा मुलामा देण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु आहे. फाटकाशेजारी दूचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. फ्लाय अ‍ॅशचा धूराळा उडू नये म्हणून तात्काळ पाणी मारण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणी पाणी मारले जात नाही. येथील दोन्ही बाजूच्या पर्यायी रस्त्यावर फ्लाय अ‍ॅशचा थर अजूनही पडून आहे. कंत्राटदाराचे येथे मागील अनेक महिन्यापासून दुर्लक्ष होत आहे.उड्डाणपूलाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. त्यामुळे येथे नियमित अधिकारी येत नाही. परिणामी कंत्राटदाराचे फावत आहे. भेटीकरिता व निरीक्षणाकरीता वरिष्ठ अधिकारी येतात व निघून जातात. पर्यायी पोचमार्ग व इतर सुविधा पूरविण्याचा, खड्डे बुजविण्याचे, रस्त्याची देखभाल करण्याचे नियम आहे, परंतु येथे नियमाकडे कायम दुर्लक्ष दिसत आहे. पर्यायी रस्ता अक्षरश: खड्डेमय झाला आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य येथे दाखविण्यात येत नाही. यासंदर्भात जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा या उड्डाणपूलाशी संबंध नाही, नागपूर येथील मुख्यालयातून नियंत्रण सुरु आहे.सुमारे २४ कोटी रुपये किंमतीचा उड्डाणपूल असून जबाबदार अधिकाऱ्यांची येथे वाणवा दिसत आहे. प्रवाशांना येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. पर्यायी रस्ता ही अरुंद असल्याने व राखेचा धुरामुळे रस्ता दिसत नसल्याने वाहने अंदाजानेच पुढे न्यावे लागते.जिल्हाधिकाऱ्यांनी येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे. पर्यावरणाला धोक्यासोबतच नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. संथगतीने कामामुळे येथे डोकेदुखी वाढली आहे. रहदारी वाढल्यानेच येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आले होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीroad transportरस्ते वाहतूक