शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

उड्डाणपूल भरावातील फ्लायअ‍ॅशला पाण्याचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST

मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअ‍ॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअ‍ॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही.

ठळक मुद्देदेव्हाडी येथील उड्डाणपूल : संथगतीमुळे प्रवाशांना फटका, जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअ‍ॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअ‍ॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही. येथे कंत्राटदार व संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे.देव्हाडी येथे तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर उड्डानपुलाचे काम मागील चार वर्षापासून संथगतीने सुरु आहे. गोंदिया व तुमसर मार्गावर अ‍ॅप्रोच रस्ता तयार केला जात आहे. येथे अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अ‍ॅशचा वापर भरावाकरिता केला जात आहे. पीठासारखी अ‍ॅश ट्रकमधून सरावाकरिता घालतांना मोठा धुराळा उडतो. रेल्वे फाटकाजवळ शेवटचा भराव करतांना कंत्राटदाराने पाण्याचा मुलामा देण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु आहे. फाटकाशेजारी दूचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. फ्लाय अ‍ॅशचा धूराळा उडू नये म्हणून तात्काळ पाणी मारण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणी पाणी मारले जात नाही. येथील दोन्ही बाजूच्या पर्यायी रस्त्यावर फ्लाय अ‍ॅशचा थर अजूनही पडून आहे. कंत्राटदाराचे येथे मागील अनेक महिन्यापासून दुर्लक्ष होत आहे.उड्डाणपूलाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. त्यामुळे येथे नियमित अधिकारी येत नाही. परिणामी कंत्राटदाराचे फावत आहे. भेटीकरिता व निरीक्षणाकरीता वरिष्ठ अधिकारी येतात व निघून जातात. पर्यायी पोचमार्ग व इतर सुविधा पूरविण्याचा, खड्डे बुजविण्याचे, रस्त्याची देखभाल करण्याचे नियम आहे, परंतु येथे नियमाकडे कायम दुर्लक्ष दिसत आहे. पर्यायी रस्ता अक्षरश: खड्डेमय झाला आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य येथे दाखविण्यात येत नाही. यासंदर्भात जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा या उड्डाणपूलाशी संबंध नाही, नागपूर येथील मुख्यालयातून नियंत्रण सुरु आहे.सुमारे २४ कोटी रुपये किंमतीचा उड्डाणपूल असून जबाबदार अधिकाऱ्यांची येथे वाणवा दिसत आहे. प्रवाशांना येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. पर्यायी रस्ता ही अरुंद असल्याने व राखेचा धुरामुळे रस्ता दिसत नसल्याने वाहने अंदाजानेच पुढे न्यावे लागते.जिल्हाधिकाऱ्यांनी येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे. पर्यावरणाला धोक्यासोबतच नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. संथगतीने कामामुळे येथे डोकेदुखी वाढली आहे. रहदारी वाढल्यानेच येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आले होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीroad transportरस्ते वाहतूक