शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

फुले दाम्पत्याचे कर्तृत्व प्रेरणादायी

By admin | Updated: December 14, 2015 00:40 IST

शिक्षणाचे आद्यगुरु महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीसाठी स्वत:ला वाहून घेतले. ....

नाना पटोले यांचे प्रतिपादन : माळी समाज वधूवर परिचय मेळावाभंडारा : शिक्षणाचे आद्यगुरु महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीसाठी स्वत:ला वाहून घेतले. फुले दाम्पत्याचे कर्तृत्व हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.महात्मा फुले बहुउद्देशिय मित्र मंडळ भंडाराच्या वतीने आयोजित माळी समाज वधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रसंगी ते बोलत होते. शनिवारला पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. डी. चिचमलकर, उद्घाटक म्हणून केशवराव निर्वाण हे होते. यावेळी नगराध्यक्ष बाबुराव बागडे, खासदार नाना पटोले, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, अरुण रंधे, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर, डॉ. श्रीकांत भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले यांनी समाजातील नागरिक लग्न, बारसे व तेरवी इथपर्यंत संबंध ठेवतात. मात्र समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न करणे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. इंग्रज काळात महात्मा फुलेंनी मोफत शिक्षणासंबंधी मागणी रेटून धरली होती. सध्या शिक्षणाचा बाजारीकरण सुरु असल्याने महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली मिळत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण होतो व यातून आर्थिक खर्चाची बचत होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.आमदार अवसरे यांनी माळी समाजबांधवात शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. महात्मा फुलेंनी दिलेले मूलमंत्र शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने जागृत होण्याची गरज प्रतिपादन केले. मंजूषा ठवकर यांनी समाजातील मुलामुलींनी स्पर्धात्मक परीक्षेतून यश संपादन करुन स्वत:चा विकास साधण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी रांगोळी व भावगीत स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कविता राऊत, द्वितीय ऋतुजा कांबळे तर तृतीय विशाखा गाणार यांना देण्यात आले. तर भावगीत स्पर्धेत प्रथम मालती राऊत, द्वितीय रक्षा पवनकर तर तृतीय हिमांशू भूते यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.वधू-वर परिचय मेळाव्यात २५० युवक युवतीनी नावे नोंदवून सहभाग घेतला. संचालन जयश्री सातोकर, प्रास्ताविक अशोक बनकर तर आभार रमेश गोटेफोडे यांनी मानले. संजय बनकर, रमेश बनकर, ईश्वर निकुळे, रामरतन मोहुर्ले, नरेंद्र पवनकर, संगिता बनकर, माधुरी देशकर, वृंदा गायधने, सुशीला निर्वाण, योगेश्वरी उमप, अनिल नंदूरकर, दिनेश देशकर यांच्यासह माळी समाज बांधवानी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)