शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पूर आले अन् गेले पण समस्या कायमच!

By admin | Updated: August 18, 2015 00:38 IST

तीन दशकापूर्वी मोहाडी तालुक्यात पुल व रस्त्याच्या गरजा जनतेच्या संघर्षातून पूर्ण झाल्या.

पूल व रस्त्यांची दैनावस्था : ३० वर्षापूर्वीच्या रस्त्यावर रहदारीराजू बांते मोहाडी तीन दशकापूर्वी मोहाडी तालुक्यात पुल व रस्त्याच्या गरजा जनतेच्या संघर्षातून पूर्ण झाल्या. तीन दशकानंतर झालेली स्थितंतरे बघता पुलांची दशा अन् रस्त्याची जीवघेणी अवस्था कायमच असल्याचे चित्र आजघडीला दिसून येत आहे.३० वर्षापूर्वी मोहाडी तालुक्याला जोडणारा महालगाव मोरगाव मधातल्या गायमुख नदीवर जनतेच्या लढ्याने पुल तयार झाला. पश्चिम दिशाकडील अनेक गावे मोहाडीला जोडल्या गेली. त्यानंतर चौंडेश्वरी देवी मंदिराशेजारी असलेल्या त्याच नदीवर पुल तयार करण्यात आले. त्यामुळे मांडेसर, खमारी या भागातील नागरिकांना मोहाडी येथे येण्यास सरळ मार्ग मिळाला. पंधरा वर्षापूर्वी मांडेसर मार्ग, कन्हाळगाव मार्ग याचे खडीकरण नंतर डांबरीकरणही झाले. मोहाडीला दिवसा व रात्री बेरात्री जाणे येणे नागरिकांना सोयीचे होवू लागले. काळ बदलत गेला. गावात दुचाकी, चारचाकी गाड्या आल्या. शेतीउद्योग वाढीला लागली. व्यवसायाकरिता जनता बाहेर पडू लागली. विद्यार्थी बाहेर शिकायला जावू लागले. शेती, दुग्ध व्यवसाय, खासगी व्यवसाय, व्यापार, शिक्षण बदलत गेले. परंतु ३० वर्षापूर्वीच्या तात्पुरती झालेल्या सोयी त्याच आहेत. मोरगाव महालगावच्या पुलाने कितीतरी पुल बघितले आहेत. चौंडेश्वरी देवी शेजारच्याही पुलाने कितीतरी पुर सहन केले. रपट्यासमान असणारे हे पुल त्या काळी लाभाचे ठरले. पण आज हेच पुल विद्यार्थी, जनतेचे कर्दनकाळ ठरले आहेत. आज गरज आहे मोरगाव - महालगाव, चौंडेश्वरी देवी शेजारील पुलांची उंची वाढविण्याची. कमी पावसातही या दोन्ही पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे मोहाडीच्या पश्चिमेकडील पूर्ण गावाचे व्यवहार बंद पडतात. विद्यार्थी शाळेत मोहाडीला, तुमसरला, भंडारा येथे जात नाही. बांधकाम विभागाचे दुर्लक्षमोहाडी तालुक्यातील कान्हळगाववासी येथील लढावू नेत्यांच्या संघर्षामुळे मोरगाव सूर नदी (नेरीवरचा) पुल तयार झाला. कान्हळगाव, मोहाडी रस्त्याचे तीस दशकापूर्वी खडीकरण कम्युनिष्ट विचारसरणींच्या नेत्यांच्या लढ्यामुळेच झाले. मोरगावच्या पुलाचा वरचा सिमेंटचा काही भाग तीन वर्षापूर्वी वाहून गेला. पण ना नेत्यांचे ना बांधकाम विभागाचे लक्ष आहे.रोहणा पुलाची उंची वाढविण्याची गरज शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्याने खडड्यांचा अतिशय त्रास सहन करावा लागतो. जेव्हापासून हे रस्ते डांबरीकरण झाले तेव्हापासून केवळ तात्पुरती मुरम टाकून रस्ते दुरुस्त करण्यात आली. पण खड्डेच एवढे की त्या मुरमाची माती होवून पूर्ववत खड्डे तयार होतात. रोहणा येथील पुलही पावसाळ्यात जीवघेणा ठरणारा आहे. पुलावर पाणी असले तर विद्यार्थी बंधाऱ्यावरून सायकलने येतात. त्यामुळे रोहणा पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे.पूर गेला की सगळे विसरतात ४पूर, पाणी गेला की सगळे विसरले जाते. त्यानंतर पुलाच्या व रस्त्याच्या समस्या त्याच ठिकाणी राहतात. पुल व रस्त्याच्य दयनीय अवस्थेविषयी प्रशासन व शासनाशी लढायला तयार नाहीत. सामान्य माणसांनी काय करावे? रस्त्याच्या खडड्यातून गाड्या चालवाव्या? लक्ष नसले तर खाली पडावे. रस्त्याचा मार खावा. अन् पावसाळ्यात पुलाच्या वरून पाणी वाहत असेल तर जीव धोक्यात घालून पुलाच्या बाहेर पडावे. अन् जमले नाही तर पुलाच्या खाली यावे. हेच आता सामान्य जनतेच्या हातात राहिले आहे. प्रशासनाने प्रतिक्षा करावी हे दुर्देव सामान्यांच्या नशिबी आले आहे.