शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन कोटीचा मदतनिधी शासनाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

लाखांदूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध ...

लाखांदूर :

गतवर्षीच्या खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग देखील करण्यात आला. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाती सदोष आढळून आल्याने पूरग्रस्त शेतकरी शासन मदतीपासून वंचित ठरले असतानाच विविध कारणांनी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सदर मदत नाकारल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन कोटीचा मदतनिधी शासनाला परत गेला आहे.

माहितीनुसार, गतवर्षीच्या खरिपात पीक पेरणी ते कापणी पर्यंतच्या हंगामात तीनदा पूर, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी शेतकऱ्यांनी शासनाकडे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.

सदर मागणीची दखल घेत शासनाने तालुक्यातील क्षतीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे १२ कोटी ६८ लक्ष ७ हजार रुपयाचा शासन मदत निधी तालुका प्रशासनाला उपलब्ध करुन दिला होता. सदर निधी उपलब्ध होताच खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनाम्याच्या आधारावर पीडित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

सदर याद्या प्रसिद्ध करतानाच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तालुका प्रशासना अंतर्गत सुमारे ९ कोटी २६ लाख ६० हजार १८९ रुपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी महसूल प्रशासनाकडे दिलेले बँक खाते क्रमांकात प्रशासकीय कारवाई दरम्यान नकळत चूक झाल्याने बँके अंतर्गत संबंधित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.

दरम्यान , तब्बल ६ महिन्यापासून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासन मदतनिधी जमा न झाल्याने तालुक्यातील सोनी, इंदोरा , सावरगाव यांसह अन्य काही गावातील शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी पासून वंचित ठरल्याच्या आरोप केला आहे. त्यानुसार येथील तहसील प्रशासनाने तत्काळ चौकशी प्रक्रिया आरंभून मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु केली आहे.

सदर कार्यवाही अंतर्गत येत्या काही दिवसात मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आहे. तथापि तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विविध कारणांनी सदर शासन मदत नाकारल्याने सुमारे ३ कोटी ४१ लाख ४६ हजार ८११ रुपयाचा शासन निधी शासनाला परत करण्यात आला.

प्रतिक्रिया : शासनाकडून उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यातील बँकांना निधी उपलब्ध केला आहे मात्र काही शेतकऱ्यांची बँक खाती सदोष आढळून येत असल्याने बँक खात्यातील दोष दूर करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरु करण्यात आली असून पुढील काही दिवसात वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध होणार आहे.

- अखिलभारत मेश्राम, तहसीलदार लाखांदूर.