शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन कोटीचा मदतनिधी शासनाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

लाखांदूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध ...

लाखांदूर :

गतवर्षीच्या खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग देखील करण्यात आला. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाती सदोष आढळून आल्याने पूरग्रस्त शेतकरी शासन मदतीपासून वंचित ठरले असतानाच विविध कारणांनी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सदर मदत नाकारल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन कोटीचा मदतनिधी शासनाला परत गेला आहे.

माहितीनुसार, गतवर्षीच्या खरिपात पीक पेरणी ते कापणी पर्यंतच्या हंगामात तीनदा पूर, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी शेतकऱ्यांनी शासनाकडे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.

सदर मागणीची दखल घेत शासनाने तालुक्यातील क्षतीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे १२ कोटी ६८ लक्ष ७ हजार रुपयाचा शासन मदत निधी तालुका प्रशासनाला उपलब्ध करुन दिला होता. सदर निधी उपलब्ध होताच खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनाम्याच्या आधारावर पीडित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

सदर याद्या प्रसिद्ध करतानाच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तालुका प्रशासना अंतर्गत सुमारे ९ कोटी २६ लाख ६० हजार १८९ रुपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी महसूल प्रशासनाकडे दिलेले बँक खाते क्रमांकात प्रशासकीय कारवाई दरम्यान नकळत चूक झाल्याने बँके अंतर्गत संबंधित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.

दरम्यान , तब्बल ६ महिन्यापासून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासन मदतनिधी जमा न झाल्याने तालुक्यातील सोनी, इंदोरा , सावरगाव यांसह अन्य काही गावातील शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी पासून वंचित ठरल्याच्या आरोप केला आहे. त्यानुसार येथील तहसील प्रशासनाने तत्काळ चौकशी प्रक्रिया आरंभून मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु केली आहे.

सदर कार्यवाही अंतर्गत येत्या काही दिवसात मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आहे. तथापि तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विविध कारणांनी सदर शासन मदत नाकारल्याने सुमारे ३ कोटी ४१ लाख ४६ हजार ८११ रुपयाचा शासन निधी शासनाला परत करण्यात आला.

प्रतिक्रिया : शासनाकडून उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यातील बँकांना निधी उपलब्ध केला आहे मात्र काही शेतकऱ्यांची बँक खाती सदोष आढळून येत असल्याने बँक खात्यातील दोष दूर करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरु करण्यात आली असून पुढील काही दिवसात वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध होणार आहे.

- अखिलभारत मेश्राम, तहसीलदार लाखांदूर.