शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन कोटीचा मदतनिधी शासनाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

लाखांदूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध ...

लाखांदूर :

गतवर्षीच्या खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग देखील करण्यात आला. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाती सदोष आढळून आल्याने पूरग्रस्त शेतकरी शासन मदतीपासून वंचित ठरले असतानाच विविध कारणांनी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सदर मदत नाकारल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन कोटीचा मदतनिधी शासनाला परत गेला आहे.

माहितीनुसार, गतवर्षीच्या खरिपात पीक पेरणी ते कापणी पर्यंतच्या हंगामात तीनदा पूर, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी शेतकऱ्यांनी शासनाकडे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.

सदर मागणीची दखल घेत शासनाने तालुक्यातील क्षतीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे १२ कोटी ६८ लक्ष ७ हजार रुपयाचा शासन मदत निधी तालुका प्रशासनाला उपलब्ध करुन दिला होता. सदर निधी उपलब्ध होताच खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनाम्याच्या आधारावर पीडित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

सदर याद्या प्रसिद्ध करतानाच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तालुका प्रशासना अंतर्गत सुमारे ९ कोटी २६ लाख ६० हजार १८९ रुपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी महसूल प्रशासनाकडे दिलेले बँक खाते क्रमांकात प्रशासकीय कारवाई दरम्यान नकळत चूक झाल्याने बँके अंतर्गत संबंधित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.

दरम्यान , तब्बल ६ महिन्यापासून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासन मदतनिधी जमा न झाल्याने तालुक्यातील सोनी, इंदोरा , सावरगाव यांसह अन्य काही गावातील शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी पासून वंचित ठरल्याच्या आरोप केला आहे. त्यानुसार येथील तहसील प्रशासनाने तत्काळ चौकशी प्रक्रिया आरंभून मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु केली आहे.

सदर कार्यवाही अंतर्गत येत्या काही दिवसात मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आहे. तथापि तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विविध कारणांनी सदर शासन मदत नाकारल्याने सुमारे ३ कोटी ४१ लाख ४६ हजार ८११ रुपयाचा शासन निधी शासनाला परत करण्यात आला.

प्रतिक्रिया : शासनाकडून उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यातील बँकांना निधी उपलब्ध केला आहे मात्र काही शेतकऱ्यांची बँक खाती सदोष आढळून येत असल्याने बँक खात्यातील दोष दूर करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरु करण्यात आली असून पुढील काही दिवसात वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध होणार आहे.

- अखिलभारत मेश्राम, तहसीलदार लाखांदूर.