शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पाच वर्षानंतरही उड्डाणपुलाचे बांधकाम अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:47 IST

देव्हाडी उड्डाणपूलाचे काम सुरू होवून पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु केवळ ४२ कोटींचा पूल अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सध्या अर्ध्यावरच पूलाचे कामे झाली आहेत. एकीकडे निवडणुकीचा जोर वाढला असून उड्डाणपूलाची कामे संथगतीने सुरू आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी पूलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दररोज येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. विकास कामांचा हाच धडाका काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देगत लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन : ४२ कोटींचा पूल, वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणपूलाचे काम सुरू होवून पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु केवळ ४२ कोटींचा पूल अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सध्या अर्ध्यावरच पूलाचे कामे झाली आहेत. एकीकडे निवडणुकीचा जोर वाढला असून उड्डाणपूलाची कामे संथगतीने सुरू आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी पूलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दररोज येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. विकास कामांचा हाच धडाका काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुंबई-हावडा महत्वपूर्ण रेल्वे मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य शासनाचा हा संयुक्त उड्डाणपूल आहे. केवळ ४२ कोटींचा हा भराव उड्डाणपूल आहे. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला येथे सुरूवात झाली. सन २०१९ ची लोकसभा निवडणूक आली तरी उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्णत्वास आले नाही.सध्या केवळ ६० टक्के उड्डाणपूलाचे बांधकाम झाल्याचा दावा संबंधित विभाग करीत आहे. नोटबंदी तथा जीएसटीमुळे या पूलाचे बांधकाम किमान सहा ते आठ महिने रखडले होते. निधीची कमतरता येथे भासली. कासवगतीने कामे सुरू असताना याकडे कुणीच लक्ष दिले नाही.अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अ‍ॅश येथे भरावात घालण्यात आले. त्यामुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढली. पोचमार्ग खड्डेमय बनले. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. सध्या पोचमार्गाची कामे सुरू करण्यात आली आहेत. रेल्वे सध्या दोन्ही बाजूला सिमेंटचे पिल्लर उभे करीत आहे. ही कामेही अत्यंत संथगतीने सुरू आहेत. संपूर्ण उड्डाणपूलांची कामे यंत्राने येथे सुरू आहेत तरी कामाची गती मात्र अतिशय मंद आहे. पाच वर्षात केवळ ४२ कोटींचा पूल बांधकाम पूर्णत्वास आले नाही हा संशोधनाचा विषय आहे.सध्या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाला साजेशा सोयी-सुविधा येथे दिसत नाही. केवळ वेळ मारून नेण्याचाच प्रकार येथे सुरू आहे.वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास येथे सहन करावा लागत आहे. रेल्वेचा वीज खांब येथील उड्डाणपूल खांबाला अडसर ठरत असल्याची माहिती आहे. याकरिता रेल्वेचे वीज अभियंते व स्थापत्य अभियंते या समस्येवर तोडगा काढत असल्याची माहिती आहे. अतिशय वर्दळीचा राष्ट्रीय महामार्गाची केवळ पोचमार्गावरून मागील पाच वर्षापासून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागते.