शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पाच वर्षानंतरही उड्डाणपुलाचे बांधकाम अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:47 IST

देव्हाडी उड्डाणपूलाचे काम सुरू होवून पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु केवळ ४२ कोटींचा पूल अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सध्या अर्ध्यावरच पूलाचे कामे झाली आहेत. एकीकडे निवडणुकीचा जोर वाढला असून उड्डाणपूलाची कामे संथगतीने सुरू आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी पूलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दररोज येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. विकास कामांचा हाच धडाका काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देगत लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन : ४२ कोटींचा पूल, वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणपूलाचे काम सुरू होवून पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु केवळ ४२ कोटींचा पूल अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सध्या अर्ध्यावरच पूलाचे कामे झाली आहेत. एकीकडे निवडणुकीचा जोर वाढला असून उड्डाणपूलाची कामे संथगतीने सुरू आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी पूलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दररोज येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. विकास कामांचा हाच धडाका काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुंबई-हावडा महत्वपूर्ण रेल्वे मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य शासनाचा हा संयुक्त उड्डाणपूल आहे. केवळ ४२ कोटींचा हा भराव उड्डाणपूल आहे. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला येथे सुरूवात झाली. सन २०१९ ची लोकसभा निवडणूक आली तरी उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्णत्वास आले नाही.सध्या केवळ ६० टक्के उड्डाणपूलाचे बांधकाम झाल्याचा दावा संबंधित विभाग करीत आहे. नोटबंदी तथा जीएसटीमुळे या पूलाचे बांधकाम किमान सहा ते आठ महिने रखडले होते. निधीची कमतरता येथे भासली. कासवगतीने कामे सुरू असताना याकडे कुणीच लक्ष दिले नाही.अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अ‍ॅश येथे भरावात घालण्यात आले. त्यामुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढली. पोचमार्ग खड्डेमय बनले. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. सध्या पोचमार्गाची कामे सुरू करण्यात आली आहेत. रेल्वे सध्या दोन्ही बाजूला सिमेंटचे पिल्लर उभे करीत आहे. ही कामेही अत्यंत संथगतीने सुरू आहेत. संपूर्ण उड्डाणपूलांची कामे यंत्राने येथे सुरू आहेत तरी कामाची गती मात्र अतिशय मंद आहे. पाच वर्षात केवळ ४२ कोटींचा पूल बांधकाम पूर्णत्वास आले नाही हा संशोधनाचा विषय आहे.सध्या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाला साजेशा सोयी-सुविधा येथे दिसत नाही. केवळ वेळ मारून नेण्याचाच प्रकार येथे सुरू आहे.वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास येथे सहन करावा लागत आहे. रेल्वेचा वीज खांब येथील उड्डाणपूल खांबाला अडसर ठरत असल्याची माहिती आहे. याकरिता रेल्वेचे वीज अभियंते व स्थापत्य अभियंते या समस्येवर तोडगा काढत असल्याची माहिती आहे. अतिशय वर्दळीचा राष्ट्रीय महामार्गाची केवळ पोचमार्गावरून मागील पाच वर्षापासून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागते.