शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:08 IST

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देनिवेदनाला केराची टोपली : विद्यार्थी, शेतकऱ्यांना सुमार फटका, पाथरी-पालांदूर मार्गावरील बांधकाम

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.पाच वर्षापूर्वी याच नाल्यावर पुलिया बांधण्यात आला होता. पण पूर्णत्वास जाऊ शकला नसल्याने आजही तो पुल अर्धवटच पडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावाने राज्य परिवहन महामंडळाची बस सुद्धा गावात पाहली नाही. १२ वर्षांपासून गावात प्रादेशिक नळ योजना खितपत पडली असून उपयोगात नव्हती. मागील महिन्यात ती पूर्ववत होत गावाला नळाचे पाणी घरपोच मिळाले. गावाला रुंद व स्वच्छ रस्ते नाही. गावाला खातकुडा नाही आदी विविध समस्यांनी पाथरी नाला खीतपत आहे.चुलबंद व नाल्याच्या किनाऱ्यावर गाव असल्याने भूजल बºयापैकी आहे. याच आरोग्यावर वार्षीक शेती हाच मुख्य व्यवसाय पाथरीवासीयांचा अधोरेखीत आहे. शेतीमुळे मुख्य बाजारपेठ पालांदूर आहे. मुलांना प्राथमिकस्तराच्या शिक्षणाकरिता पालांदुरचा आधार आहे. भर पावसात विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना नाल्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो. अन्यथा पाच कि.मी. चा फेरा घालत मऱ्हेगाव मार्गे किंवा खराशी लोहारा मार्गे पालांदूर गाठावे लागते. ही पाथरीवासीयांची व्यथा दूर करणारा देवदूत मिळेल का? प्रगत अत्याधुनिक काळात सुखसोयी गाववासीयांना मिळतील का? असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने व लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने पाथरीवासी विकासाच्या कोसो दूर आहेत. अर्धवट बांधून उभ्या असलेला पुल पुन्हा नव्याने बांधावा याकरिता निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष आहे.पाथरीवासीयांना नाल्यावरील अत्यंत महत्वाचा पुल आहे. पुलाच्या बांधकामाबाबत वारंवार प्रशासन, लोकप्रतिनिधींना सांगूनही फायदा झालेला नाही. गाव् ाविकासाकरिता शासकीय निधी अपेक्षित येत नसल्याने समस्या कायम आहेत.-तुळशीदास फुंडे, सरपंच, पाथरी.गाव विकासाकरिता वरिष्ठ नेते, पुढारी सहकार्य करीत नसल्याने विकासच नाही. आमदार, खासदारांना जागवल्याशिवाय मोठी निधी गावाला मिळू शकत नाही. केवळ निवडणुकांपूरतेच गावाला भेट देतात. आश्वासनांची खैरात वाटून पुन्हा पाच वर्ष विसरून जातात.-श्रावण सपाटे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता, पाथरी.पालांदूर -पाथरी पुलामुळे दोन्ही गावाच्या शेतकºयांना शेती कसायला मोठी मदत होईल. पुलाच्या बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींना वेठीस धरून कामाकरिता सातत्य महत्वाचे आहे. दोन गावांमध्ये नाळ जुळल्याने पालांदूर -पाथरी पुलाचे बांधकाम पुर्णत्वास येणे गरजेचे आहे.-पंकज खंडाईत, पालांदूर.