शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:08 IST

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देनिवेदनाला केराची टोपली : विद्यार्थी, शेतकऱ्यांना सुमार फटका, पाथरी-पालांदूर मार्गावरील बांधकाम

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.पाच वर्षापूर्वी याच नाल्यावर पुलिया बांधण्यात आला होता. पण पूर्णत्वास जाऊ शकला नसल्याने आजही तो पुल अर्धवटच पडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावाने राज्य परिवहन महामंडळाची बस सुद्धा गावात पाहली नाही. १२ वर्षांपासून गावात प्रादेशिक नळ योजना खितपत पडली असून उपयोगात नव्हती. मागील महिन्यात ती पूर्ववत होत गावाला नळाचे पाणी घरपोच मिळाले. गावाला रुंद व स्वच्छ रस्ते नाही. गावाला खातकुडा नाही आदी विविध समस्यांनी पाथरी नाला खीतपत आहे.चुलबंद व नाल्याच्या किनाऱ्यावर गाव असल्याने भूजल बºयापैकी आहे. याच आरोग्यावर वार्षीक शेती हाच मुख्य व्यवसाय पाथरीवासीयांचा अधोरेखीत आहे. शेतीमुळे मुख्य बाजारपेठ पालांदूर आहे. मुलांना प्राथमिकस्तराच्या शिक्षणाकरिता पालांदुरचा आधार आहे. भर पावसात विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना नाल्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो. अन्यथा पाच कि.मी. चा फेरा घालत मऱ्हेगाव मार्गे किंवा खराशी लोहारा मार्गे पालांदूर गाठावे लागते. ही पाथरीवासीयांची व्यथा दूर करणारा देवदूत मिळेल का? प्रगत अत्याधुनिक काळात सुखसोयी गाववासीयांना मिळतील का? असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने व लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने पाथरीवासी विकासाच्या कोसो दूर आहेत. अर्धवट बांधून उभ्या असलेला पुल पुन्हा नव्याने बांधावा याकरिता निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष आहे.पाथरीवासीयांना नाल्यावरील अत्यंत महत्वाचा पुल आहे. पुलाच्या बांधकामाबाबत वारंवार प्रशासन, लोकप्रतिनिधींना सांगूनही फायदा झालेला नाही. गाव् ाविकासाकरिता शासकीय निधी अपेक्षित येत नसल्याने समस्या कायम आहेत.-तुळशीदास फुंडे, सरपंच, पाथरी.गाव विकासाकरिता वरिष्ठ नेते, पुढारी सहकार्य करीत नसल्याने विकासच नाही. आमदार, खासदारांना जागवल्याशिवाय मोठी निधी गावाला मिळू शकत नाही. केवळ निवडणुकांपूरतेच गावाला भेट देतात. आश्वासनांची खैरात वाटून पुन्हा पाच वर्ष विसरून जातात.-श्रावण सपाटे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता, पाथरी.पालांदूर -पाथरी पुलामुळे दोन्ही गावाच्या शेतकºयांना शेती कसायला मोठी मदत होईल. पुलाच्या बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींना वेठीस धरून कामाकरिता सातत्य महत्वाचे आहे. दोन गावांमध्ये नाळ जुळल्याने पालांदूर -पाथरी पुलाचे बांधकाम पुर्णत्वास येणे गरजेचे आहे.-पंकज खंडाईत, पालांदूर.