शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:08 IST

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देनिवेदनाला केराची टोपली : विद्यार्थी, शेतकऱ्यांना सुमार फटका, पाथरी-पालांदूर मार्गावरील बांधकाम

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.पाच वर्षापूर्वी याच नाल्यावर पुलिया बांधण्यात आला होता. पण पूर्णत्वास जाऊ शकला नसल्याने आजही तो पुल अर्धवटच पडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावाने राज्य परिवहन महामंडळाची बस सुद्धा गावात पाहली नाही. १२ वर्षांपासून गावात प्रादेशिक नळ योजना खितपत पडली असून उपयोगात नव्हती. मागील महिन्यात ती पूर्ववत होत गावाला नळाचे पाणी घरपोच मिळाले. गावाला रुंद व स्वच्छ रस्ते नाही. गावाला खातकुडा नाही आदी विविध समस्यांनी पाथरी नाला खीतपत आहे.चुलबंद व नाल्याच्या किनाऱ्यावर गाव असल्याने भूजल बºयापैकी आहे. याच आरोग्यावर वार्षीक शेती हाच मुख्य व्यवसाय पाथरीवासीयांचा अधोरेखीत आहे. शेतीमुळे मुख्य बाजारपेठ पालांदूर आहे. मुलांना प्राथमिकस्तराच्या शिक्षणाकरिता पालांदुरचा आधार आहे. भर पावसात विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना नाल्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो. अन्यथा पाच कि.मी. चा फेरा घालत मऱ्हेगाव मार्गे किंवा खराशी लोहारा मार्गे पालांदूर गाठावे लागते. ही पाथरीवासीयांची व्यथा दूर करणारा देवदूत मिळेल का? प्रगत अत्याधुनिक काळात सुखसोयी गाववासीयांना मिळतील का? असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने व लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने पाथरीवासी विकासाच्या कोसो दूर आहेत. अर्धवट बांधून उभ्या असलेला पुल पुन्हा नव्याने बांधावा याकरिता निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष आहे.पाथरीवासीयांना नाल्यावरील अत्यंत महत्वाचा पुल आहे. पुलाच्या बांधकामाबाबत वारंवार प्रशासन, लोकप्रतिनिधींना सांगूनही फायदा झालेला नाही. गाव् ाविकासाकरिता शासकीय निधी अपेक्षित येत नसल्याने समस्या कायम आहेत.-तुळशीदास फुंडे, सरपंच, पाथरी.गाव विकासाकरिता वरिष्ठ नेते, पुढारी सहकार्य करीत नसल्याने विकासच नाही. आमदार, खासदारांना जागवल्याशिवाय मोठी निधी गावाला मिळू शकत नाही. केवळ निवडणुकांपूरतेच गावाला भेट देतात. आश्वासनांची खैरात वाटून पुन्हा पाच वर्ष विसरून जातात.-श्रावण सपाटे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता, पाथरी.पालांदूर -पाथरी पुलामुळे दोन्ही गावाच्या शेतकºयांना शेती कसायला मोठी मदत होईल. पुलाच्या बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींना वेठीस धरून कामाकरिता सातत्य महत्वाचे आहे. दोन गावांमध्ये नाळ जुळल्याने पालांदूर -पाथरी पुलाचे बांधकाम पुर्णत्वास येणे गरजेचे आहे.-पंकज खंडाईत, पालांदूर.