शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अंडरपास पुलात पाच फूट पाणी,१०० शेतकऱ्यांचा रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

तुमसर रोड - तिरोडी या रेल्वे मार्गावर देव्हाडी, शिवनी, कोष्टी शिवारातील शेतकऱ्यांना जाण्याकरिता रेल्वे प्रशासनाने अंडरपास पुलाचे बांधकाम केले ...

तुमसर रोड - तिरोडी या रेल्वे मार्गावर देव्हाडी, शिवनी, कोष्टी शिवारातील शेतकऱ्यांना जाण्याकरिता रेल्वे प्रशासनाने अंडरपास पुलाचे बांधकाम केले आहे. सध्या पुलात सुमारे पाच फूट पाणी साचले आहे. त्यामुळे देव्हाडी येथील सुमारे १०० शेतकरी अंडरपास पुलातून जाणे-येणे करू शकत नाही. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतीवर जाण्याकरिता या पुलातून मार्गक्रमण करावे लागते. शेतकरी खरीप हंगामात ट्रॅक्टर व इतर साहित्य घेऊन या पुलातून जाऊ शकत नाही. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे गत पाच वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अंडरपास पुलातून पाणी काढण्यास जागा नाही. त्यामुळे हे पाणी अनेक दिवस येथे साचून राहते. पाण्याचे निकासी करण्याचे कोणतेही नियोजन प्रशासनाने केले नाही. हा अंडरपास पूल शेतशिवारात असल्यामुळे पाण्याचा निचरा येथे मोठ्या प्रमाणात होतो. रेल्वेच्या स्थापत्य अभियंत्यांनी पाणी निकासीचे नियोजन येथे चुकल्याचे दिसून येते. रेल्वे प्रशासनाने लक्षावधी रुपये खर्च करून हा अंडरपास पूल शेतकऱ्यांना जाण्याकरिता तयार केला. परंतु त्याचा कोणताच फायदा होताना दिसत नाही. रेल्वेच्या अनेक अंडरपास पुलात पाणी जमा राहते, अशी माहिती आहे.

अंडरपास पुलातून महिला शेतकरी वर्ग जाणे-येणे करू शकत नाही. सुमारे दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होते. शेती कामावर जाण्याकरिता दूरवरून शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जावे लागते. अंडरपास पूल बांधकामाचा कोणताच फायदा येथे होताना दिसत नाही. उलट शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून देण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.