शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आवळीतील पाच कुटुंब भोगताहेत नरकयातना

By admin | Updated: April 26, 2015 00:34 IST

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे आवळी. सन १९६२ च्या पुरामुळे सदर गाव हादरून गेले.

प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यथा नदीकाठावरील पुनर्वसनग्रस्तांची प्रमोद प्रधान लाखांदूरतालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे आवळी. सन १९६२ च्या पुरामुळे सदर गाव हादरून गेले. प्रशासनाने दखल घेवून आवळी गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन केले. मात्र येथील अजूनही पाच कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेले हे कुटुंब नरकयातना भोगत आहेत. विकासात्मक योजना या गावापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. चारही बाजूला नदी असल्यामुळे नावेच्या सहायाने जीवघेणा प्रवास करून येथील विद्यार्थी व शेतकरी रहदारी करीत असतात. पुरसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास तेव्हाच नागरिकांना बाहेर काढण्याचे सोपस्कार पार पाडले जाते. नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न केव्हा सुटणार हे निश्चित नाही. पुराचा विषय आवळी येथील नागरिकांसाठी नवीन नाही. लाखांदूरपासून १२ कि़मी. अंतरावर नदीकाठावर वसलेले आवळी गाव नागरी सुविधापासून वंचित आहे. सन १९६२ च्या पुरानंतर येथील ६३ भूमिधारी कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. आवळी येथील शेतजमिनीच्या मोबदल्यात तिपटीने व राहत्या घराच्या जागेएवढी इंदोरा येथे ७०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. पुनर्वसन म्हणून गावठान व खतकुळ्याची जागाही देण्यात आली. परंतु यावर अतिक्रमण झाल्यामुळे गावकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला. मात्र आठ भूमिहिनांना यातून वगळण्यात आले होते. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जमीन कसली. १९८८ ला शासकीय नियमानुसार सात बारावर नोंद घेण्यात आली. येथील रहिवासी ज्योतिराम शहारे, रामचंद्र कांबळी, उद्धव शहारे, निजाम मेश्राम, एकनाथ वकेकार यांनी वेळोवेळी पुनर्वसन संदर्भात प्रशासनाला निवेदने सादर केली. लोकप्रतिनिधींपुढेही समस्या मांडल्या. मात्र काहीही उपयोग झाला नाही. पुनर्वसनग्रस्तांना १८ नागरिक सुविधा मिळाल्या पाहिजे, असा शासकीय नियम आहे. परंतु या नियमांना बगल दिली जात आहे.पाच कुटुंब वंचितआवळी येथील ६३ शेतकरी कुटुंबाचे पुनर्वसन असले तरी अजूनही दोन कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. या गावात रस्ते नाहीत, पाण्याची व शिक्षणाचीही सुविधा नाही. अशा स्थितीत या पाच कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.गावात रस्ते नसल्याने जिथून मार्ग निघेल तिथून वाट काढली जाते. चुलबंद नदी ओलांडून गावात यावे लागत असल्याने विद्यार्थी व शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली शोधूनही सापडत नाही. परिणामी येथे साथीच्या रोगाची लागण होत असते. अनेक वर्षापासून रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना बोरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. जिल्हा परिषद क्षेत्र लाभलेल्या या भागातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा आहे.