शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

आवळीतील पाच कुटुंब भोगताहेत नरकयातना

By admin | Updated: April 26, 2015 00:34 IST

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे आवळी. सन १९६२ च्या पुरामुळे सदर गाव हादरून गेले.

प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यथा नदीकाठावरील पुनर्वसनग्रस्तांची प्रमोद प्रधान लाखांदूरतालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे आवळी. सन १९६२ च्या पुरामुळे सदर गाव हादरून गेले. प्रशासनाने दखल घेवून आवळी गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन केले. मात्र येथील अजूनही पाच कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेले हे कुटुंब नरकयातना भोगत आहेत. विकासात्मक योजना या गावापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. चारही बाजूला नदी असल्यामुळे नावेच्या सहायाने जीवघेणा प्रवास करून येथील विद्यार्थी व शेतकरी रहदारी करीत असतात. पुरसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास तेव्हाच नागरिकांना बाहेर काढण्याचे सोपस्कार पार पाडले जाते. नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न केव्हा सुटणार हे निश्चित नाही. पुराचा विषय आवळी येथील नागरिकांसाठी नवीन नाही. लाखांदूरपासून १२ कि़मी. अंतरावर नदीकाठावर वसलेले आवळी गाव नागरी सुविधापासून वंचित आहे. सन १९६२ च्या पुरानंतर येथील ६३ भूमिधारी कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. आवळी येथील शेतजमिनीच्या मोबदल्यात तिपटीने व राहत्या घराच्या जागेएवढी इंदोरा येथे ७०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. पुनर्वसन म्हणून गावठान व खतकुळ्याची जागाही देण्यात आली. परंतु यावर अतिक्रमण झाल्यामुळे गावकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला. मात्र आठ भूमिहिनांना यातून वगळण्यात आले होते. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जमीन कसली. १९८८ ला शासकीय नियमानुसार सात बारावर नोंद घेण्यात आली. येथील रहिवासी ज्योतिराम शहारे, रामचंद्र कांबळी, उद्धव शहारे, निजाम मेश्राम, एकनाथ वकेकार यांनी वेळोवेळी पुनर्वसन संदर्भात प्रशासनाला निवेदने सादर केली. लोकप्रतिनिधींपुढेही समस्या मांडल्या. मात्र काहीही उपयोग झाला नाही. पुनर्वसनग्रस्तांना १८ नागरिक सुविधा मिळाल्या पाहिजे, असा शासकीय नियम आहे. परंतु या नियमांना बगल दिली जात आहे.पाच कुटुंब वंचितआवळी येथील ६३ शेतकरी कुटुंबाचे पुनर्वसन असले तरी अजूनही दोन कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. या गावात रस्ते नाहीत, पाण्याची व शिक्षणाचीही सुविधा नाही. अशा स्थितीत या पाच कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.गावात रस्ते नसल्याने जिथून मार्ग निघेल तिथून वाट काढली जाते. चुलबंद नदी ओलांडून गावात यावे लागत असल्याने विद्यार्थी व शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली शोधूनही सापडत नाही. परिणामी येथे साथीच्या रोगाची लागण होत असते. अनेक वर्षापासून रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना बोरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. जिल्हा परिषद क्षेत्र लाभलेल्या या भागातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा आहे.