शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मत्स्यबीज संवर्धन केंद्र कुलूपबंद

By admin | Updated: April 1, 2017 00:42 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते.

मासेमारांना जावे लागते परप्रांतात : पाणी व कर्मचाऱ्यांची वानवा, सदनिकाची दुर्दशामोहन भोयर तुमसरभंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. मासेमारांना स्थानिक पातळीवर मत्स्यबीज उपलब्ध व्हावे म्हणून नागठाणा येथे मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यात आले होते. सुमारे सात ते आठ वर्षापासून राज्य शासनाचे कोट्यवधींचे मत्स्यबीज केंद्र धुळखात पडून आहे. येथील साहित्याची नासधूस झाली असून काही साहित्य चोरीला गेले आहे. मनुष्यबळ तथा नियोजनाचा येथे अभाव आहे. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमेवर नागठाणा हे गाव आहे. गावाबाहेर राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मत्स्यबीज केंद्र सुरू केले होते. सुरवातीला हे मत्स्यबीज केंद्र सुरळीत सुरू होते. मागील सात ते आठ वर्षापासून हे मत्स्यबीज केंद्र कायम कुलूपबंद आहे. येथील अनेक साहित्यांची चोरी झाली. फाटक चोरीला गेले आहे. मत्स्यबिजाचे सिमेंट टाक्यांची तोडफोड झाली आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या चार सदनिका बांधल्या आहेत. त्यासुद्धा बेवारस पडून आहेत. १० ते १२ एकरात हे मत्स्यबिज संवर्धन केंद्र आहे. भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोळी बांधव करतात त्यांना स्वस्त व दर्जेदार मत्स्यबीज सहज उपलब्ध व्हावे याकरिता नागठाणा येथे राज्य शासनाने मत्स्यबीज केंद्र सुरू केले होते. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली होती हे विशेष. भंडारा जिल्ह्यात दुसरे मत्स्यबीज संवर्धन केंद्र साकोली येथील शिवनीबांध जलाशयाजवळ आहे, परंतु भंडारा जिल्ह्याकरिता हे संवर्धन केंद्र मत्स्यबीज उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे मासेमार छत्तीसगढ तथा पश्चिम बंगाल येथून मत्स्यबीज खरेदी करण्याकरिता जातात. सर्वसामान्य मासेमारांना हे परवडणारे नाही. त्यामुळे मासेमारांना व्यवसाय करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे.नागठाणा येथे पेंच प्रकल्पातून पाणी उपलब्ध होते, परंतु मागील काही वर्षापासून पाणी उपलब्ध होत नाही, अशी माहिती आहे. येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. कोट्यवधींची इमारत व मत्स्यबीजाकरिता मोठे टाके तयार करण्यात आले. त्यांचीही नासधूस करण्यात आली आहे. राज्य शासनाने हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र कुलूपबंद केले आहे. येथे मोठी ११ मत्स्यकुंभ तयार केले आहेत. मत्स्यबीज संवर्धन केंद्राकरिता अतिशय पोषक वातावरण आहे, परंतु शासनाने मत्स्यबीज संवर्धन केंद्र का बंद केले हा संशोधनाचा विषय आहे. शासनाने सदनिका व मत्स्यकुंभ देखरेखीखाली एक साधा चौकीदार येथे नियुक्त केला नाही. मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यापूर्वी नियमानुसार जागा हस्तांतरण करून कोट्यवधींचा खर्च केला. नागठाणा येथील मत्स्यबीज संवर्धन केंद्राकरिता मुबलक पाण्याची आवश्यकता असून कर्मचाऱ्यांची कमतरता या कारणामुळे हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र बंद आहे. येणाऱ्या काळात निश्चितच हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यात येईल. शासन वरिष्ठ स्तरावर येथे निर्णय घेणार आहे.-विश्वंभर पसारकर, प्रभारी सहायक आयुक्त मत्स्यविभाग भंडारा.मागील सात आठ नाही तर १२ ते १५ वर्षापासून नागठाणा येथील मत्स्यबीज संवर्धन केंद्र बंद आहे. येथे पाण्याची सुविधा नाही. सदनिका शेवटच्या घटका मोजत आहेत. मासेमार बांधवांना परप्रांतातून मत्स्यबीज खरेदी करायला जावे लागते. हे दुर्देव आहे. -संजय केवट, माजी राष्ट्रीय मत्स्यबीज सहकारी संघ नवी दिल्ली.