शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

मासेमारीची ‘पिंजरा प्रणाली’ पद्धत अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:15 IST

तलावांचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ....

शिवणीबांध येथे एकमेव मत्स्यबीज केंद्र : संसाधनाअभावी मत्स्योत्पादनात जिल्हा माघारलालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पिंजरा प्रणालीने मत्स्यपालन (केज कल्चर) योजनेला मासेमारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना अयशस्वी ठरली आहे. परिणामी प्रचलित पद्धतीनुसारच मत्स्यपालन सुरू आहे. मत्स्यव्यवसाय विकास विभागाकडून वर्षाकाठी ७२ कोटी रूपयांचे १२ हजार मेट्रीक टन माशांचे उत्पादन होत आहे. यात १० हजारावर मासेमारांना लाभ होत आहे. भंडारा जिल्ह्यात सुरू केलेल्या ‘केज कल्चर’ या योजनेअंतर्गत विशिष्ट आकाराचे पिंजरे जलाशयात टाकून मत्स्य पालन करण्याची योजना आखण्यात आली होती. सन २०१४ मध्ये गोसेखुर्द प्रकल्पात एक पिंजरा टाकून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु त्यानंतर या पिजऱ्यांची संख्या वाढली नाही. जिल्ह्यात दोनशे हेक्टेर क्षेत्राच्या चांदपूर तलावात लावण्याजागे हे तीन-तीन लाख रूपये किंमतीचे पिंजरे ५० टक्के अनुदानावर देण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला होता. परंतु मत्स्य सहकारी संस्थांकडून या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही योजना अधांतरी राहिली.मत्स्य विकास विभागात तांत्रिक अधिकाऱ्यांचे मंजूर सहा पदांसह सहायक आयुक्त हे पद रिक्त आहे. पवनी, साकोली, तुमसर, भंडारा या ठिकाणी मत्स्योत्पादनाच्या दृष्टिने महत्वपूर्ण आहे. परंतु याठिकाणी सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नाहीत. नागठाणा येथेही मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी हे पद खूप दिवसांपासून रिक्त आहे.तलाव तिथे मासोळीसाठी निधीमत्स्यव्यवसाय विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. यात मासेमारांसाठी ५० टक्के अनुदानावर नायलॉनचे जाळे आणि धागे उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मत्स्य संस्थांना तत्त्कालिक खर्चासाठी मागणी करताच १० हजार रूपयांचे बिनब्याजी कर्ज दिले जाते. ते पाच वर्षांपर्यत फेडू शकतात. ‘केज कल्चर’च्या अपयशानंतर जिल्हा परिषदेने मालगुजारी तलावात ‘मत्स्यतळे’ विकसित करण्याची योजना आखली आहे. राज्य सरकारची ‘जिथे तलाव तिथे मासोळी’ योजनेला गती देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दोन कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता नोंदविली असल्याचे सहायक आयुक्त (प्रभारी) वी. के. पसारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आतापर्यंत सहा कोटी मत्स्यबीज तयारभंडारा जिल्ह्यात सिंचन विभाग (राज्य) च्या अधिनस्थ येणाऱ्या ७२ आणि जिल्हा परिषदेच्या १,२०० तलावात दरवर्षी सरासरी १२ हजार मेट्रिक टन माशांचे उत्पादन होते. एकूण १२७ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या माध्यमातून नोंदणीकृत १० हजार मासेमार सुमारे ७२ कोटी रूपयांचा व्यवसाय करतात. यावर्षी या संस्थांना ३१ कोटी मत्स्यबीज निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले. २० जुलैपर्यंत सहा कोटी मत्स्य बीज निर्मिती झाली आहे. मत्स्यबीजासाठी शिवनीबांध येथे मत्स्यबीज केंद्र आहे. ज्यात पाच कोटी मत्स्यबीज उद्दिष्ठाच्या तुलनेत दोन कोटी मत्स्यबीज तयार करण्यात आले आहे.