शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

आधी लेखी परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:18 IST

पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपोलीस भरती : उत्तीर्ण उमेदवारच शारीरिक चाचणीस पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.शासनाच्या गृह विभागाने पोलीस भरती प्रक्रियेत बदल केला आहे. त्या संदर्भातील आदेश निर्गमीत केले आहेत. पोलीस शिपाई पदावर बुद्धीमान उमेदवारांची निवड होण्यासाठी हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी घेतली जात होती. अनेकदा शारीरिक चाचणीत विद्यार्थी जखमी होत होते. तसेच १५ ते २० दिवस चालणाऱ्या या शारीरिक चाचणीमुळे लेखी परीक्षेचा अभ्यासही होत नव्हता. त्यामुळे अनेक जण पोलीस भरतीपासून वंचित राहात होते. हा प्रकार टाळण्यासाठी भरतीप्रक्रियेत सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारापैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त वेळ ताटकळत राहावे लागणार नाही.पोलीस भरतीच्या जाहिरातीची उमेदवारांमध्ये प्रचंड उत्स्काता आहे. अनेक तरूण गत काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. पूर्वी शारीरिक चाचणी आधी घेतली जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांचा भर शारीरिक कसरतीकडेच अधिक असायचा. दररोज व्यायाम करून पोलीस भरतीची तयारी केली जायची. परंतु लेखी परीक्षा पास झाल्यानंतरच शारीरिक चाचणी होणार असल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भरतीसाठी तरुणांची जय्यत तयारीपोलीस दलात भरती होण्यासाठी अनेक तरुण दोन ते तीन वर्षापासून परिश्रम करतात. शारीरिक कसरतीसोबतच लेखी परीक्षेचाही अभ्यास करतात. प्रत्येक शहरात पोलीस भरतीसाठी विशेष मार्गदर्शन वर्गही सुरु करण्यात आले आहेत. यामुळे योग्य उमेदवार पोलीस भरतीत यशस्वी ठरत आहे.