शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आधी लेखी परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:18 IST

पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपोलीस भरती : उत्तीर्ण उमेदवारच शारीरिक चाचणीस पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.शासनाच्या गृह विभागाने पोलीस भरती प्रक्रियेत बदल केला आहे. त्या संदर्भातील आदेश निर्गमीत केले आहेत. पोलीस शिपाई पदावर बुद्धीमान उमेदवारांची निवड होण्यासाठी हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी घेतली जात होती. अनेकदा शारीरिक चाचणीत विद्यार्थी जखमी होत होते. तसेच १५ ते २० दिवस चालणाऱ्या या शारीरिक चाचणीमुळे लेखी परीक्षेचा अभ्यासही होत नव्हता. त्यामुळे अनेक जण पोलीस भरतीपासून वंचित राहात होते. हा प्रकार टाळण्यासाठी भरतीप्रक्रियेत सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारापैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त वेळ ताटकळत राहावे लागणार नाही.पोलीस भरतीच्या जाहिरातीची उमेदवारांमध्ये प्रचंड उत्स्काता आहे. अनेक तरूण गत काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. पूर्वी शारीरिक चाचणी आधी घेतली जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांचा भर शारीरिक कसरतीकडेच अधिक असायचा. दररोज व्यायाम करून पोलीस भरतीची तयारी केली जायची. परंतु लेखी परीक्षा पास झाल्यानंतरच शारीरिक चाचणी होणार असल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भरतीसाठी तरुणांची जय्यत तयारीपोलीस दलात भरती होण्यासाठी अनेक तरुण दोन ते तीन वर्षापासून परिश्रम करतात. शारीरिक कसरतीसोबतच लेखी परीक्षेचाही अभ्यास करतात. प्रत्येक शहरात पोलीस भरतीसाठी विशेष मार्गदर्शन वर्गही सुरु करण्यात आले आहेत. यामुळे योग्य उमेदवार पोलीस भरतीत यशस्वी ठरत आहे.